शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

मळेवाड येथे पाणी नियोजन आवश्यक

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

नदीकाठांची वाढती धूप : नदीवर पक्क्या बंधाऱ्यांची गरज

सुनील गोवेकर - आरोंदा  -मळेवाड गावातून वाहणाऱ्या नदीचे पात्र दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे रुंदावत जात आहे. तसेच उन्हाळ्यात या नदीचे पाणी लवकर आटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या नियोजनावर व नदीपात्राच्या दोन्ही बाजूने होणारी धूप यावर योग्य तोडगा न निघाल्यास भविष्यात शेती, तसेच बागायतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत नाही. मळेवाड गावचा विचार करता, गावातील लोकांची उपजीविका मुख्यत्वेकरून शेती व बागायतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. गावातून वाहणारी नदी हीच शेती बागायतीसाठी स्त्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नदीचा काठ दुतर्फा तुटत चालल्याने नदीच्या दुतर्फा असणाऱ्या माड बागायतीला धोका निर्माण झाला आहे. मळेवाड- भटवाडीतील काही शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सद्य:स्थितीत पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात या नदीला येणारे पूर हे नदीपात्र रुंदावण्याचे मुख्य कारण असले, तरी नदीपात्रात काही ठिकाणी साचलेला गाळ, तसेच नदीपात्राच्या मध्येच वाढलेली तृणयुक्त झाडी यामुळेही नदीपात्राचे काठ दुतर्फा तुटत असल्याचे दिसून येत आहे. ही तृणयुक्त असलेली झाडी व साचलेला गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असून, संबंधित विभागाकडून लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा येणाऱ्या काळात नदीपात्राच्या दुतर्फा असलेली माडबागायती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रमाणे रुंद झालेल्या नदीपात्रामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग आल्याने उन्हाळ्यात पाण्याची चणचण जाणवते. मळेवाड परिसरात उन्हाळी शेतीच्या कामांना वेग आला असून, त्यादृष्टीने वाड्यांवाड्यांमधून नदीवर बंधारे बांधण्याची कामेही सुरू झाली आहेत. मळेवाड परिसरात पावसाळी शेतीच्या तुलनेत उन्हाळी शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येत आहे. उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, मिरची, नाचणी तसेच पालेभाज्या अशी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात.मळेवाडमधून वाहणारी नदी उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्याने गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी शेतीसाठी भासणारा पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच श्रमदानातून बंधारे उभारून शेतकऱ्यांमार्फत पाणी अडविले जाते व उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांकडून घेतली जाते. मात्र, या नदीच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच पक्के बंधारेही बांधणे आवश्यक आहे. मळेवाड गावातील इतर वाड्यांच्या तुलनेत भटवाडीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतात.