शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मळेवाड येथे पाणी नियोजन आवश्यक

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

नदीकाठांची वाढती धूप : नदीवर पक्क्या बंधाऱ्यांची गरज

सुनील गोवेकर - आरोंदा  -मळेवाड गावातून वाहणाऱ्या नदीचे पात्र दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे रुंदावत जात आहे. तसेच उन्हाळ्यात या नदीचे पाणी लवकर आटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या नियोजनावर व नदीपात्राच्या दोन्ही बाजूने होणारी धूप यावर योग्य तोडगा न निघाल्यास भविष्यात शेती, तसेच बागायतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत नाही. मळेवाड गावचा विचार करता, गावातील लोकांची उपजीविका मुख्यत्वेकरून शेती व बागायतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. गावातून वाहणारी नदी हीच शेती बागायतीसाठी स्त्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नदीचा काठ दुतर्फा तुटत चालल्याने नदीच्या दुतर्फा असणाऱ्या माड बागायतीला धोका निर्माण झाला आहे. मळेवाड- भटवाडीतील काही शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सद्य:स्थितीत पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात या नदीला येणारे पूर हे नदीपात्र रुंदावण्याचे मुख्य कारण असले, तरी नदीपात्रात काही ठिकाणी साचलेला गाळ, तसेच नदीपात्राच्या मध्येच वाढलेली तृणयुक्त झाडी यामुळेही नदीपात्राचे काठ दुतर्फा तुटत असल्याचे दिसून येत आहे. ही तृणयुक्त असलेली झाडी व साचलेला गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असून, संबंधित विभागाकडून लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा येणाऱ्या काळात नदीपात्राच्या दुतर्फा असलेली माडबागायती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रमाणे रुंद झालेल्या नदीपात्रामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग आल्याने उन्हाळ्यात पाण्याची चणचण जाणवते. मळेवाड परिसरात उन्हाळी शेतीच्या कामांना वेग आला असून, त्यादृष्टीने वाड्यांवाड्यांमधून नदीवर बंधारे बांधण्याची कामेही सुरू झाली आहेत. मळेवाड परिसरात पावसाळी शेतीच्या तुलनेत उन्हाळी शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येत आहे. उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, मिरची, नाचणी तसेच पालेभाज्या अशी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात.मळेवाडमधून वाहणारी नदी उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्याने गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी शेतीसाठी भासणारा पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच श्रमदानातून बंधारे उभारून शेतकऱ्यांमार्फत पाणी अडविले जाते व उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांकडून घेतली जाते. मात्र, या नदीच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच पक्के बंधारेही बांधणे आवश्यक आहे. मळेवाड गावातील इतर वाड्यांच्या तुलनेत भटवाडीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतात.