शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मळेवाड येथे पाणी नियोजन आवश्यक

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

नदीकाठांची वाढती धूप : नदीवर पक्क्या बंधाऱ्यांची गरज

सुनील गोवेकर - आरोंदा  -मळेवाड गावातून वाहणाऱ्या नदीचे पात्र दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे रुंदावत जात आहे. तसेच उन्हाळ्यात या नदीचे पाणी लवकर आटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या नियोजनावर व नदीपात्राच्या दोन्ही बाजूने होणारी धूप यावर योग्य तोडगा न निघाल्यास भविष्यात शेती, तसेच बागायतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत नाही. मळेवाड गावचा विचार करता, गावातील लोकांची उपजीविका मुख्यत्वेकरून शेती व बागायतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. गावातून वाहणारी नदी हीच शेती बागायतीसाठी स्त्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नदीचा काठ दुतर्फा तुटत चालल्याने नदीच्या दुतर्फा असणाऱ्या माड बागायतीला धोका निर्माण झाला आहे. मळेवाड- भटवाडीतील काही शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सद्य:स्थितीत पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात या नदीला येणारे पूर हे नदीपात्र रुंदावण्याचे मुख्य कारण असले, तरी नदीपात्रात काही ठिकाणी साचलेला गाळ, तसेच नदीपात्राच्या मध्येच वाढलेली तृणयुक्त झाडी यामुळेही नदीपात्राचे काठ दुतर्फा तुटत असल्याचे दिसून येत आहे. ही तृणयुक्त असलेली झाडी व साचलेला गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असून, संबंधित विभागाकडून लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा येणाऱ्या काळात नदीपात्राच्या दुतर्फा असलेली माडबागायती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रमाणे रुंद झालेल्या नदीपात्रामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग आल्याने उन्हाळ्यात पाण्याची चणचण जाणवते. मळेवाड परिसरात उन्हाळी शेतीच्या कामांना वेग आला असून, त्यादृष्टीने वाड्यांवाड्यांमधून नदीवर बंधारे बांधण्याची कामेही सुरू झाली आहेत. मळेवाड परिसरात पावसाळी शेतीच्या तुलनेत उन्हाळी शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येत आहे. उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, मिरची, नाचणी तसेच पालेभाज्या अशी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात.मळेवाडमधून वाहणारी नदी उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्याने गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी शेतीसाठी भासणारा पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच श्रमदानातून बंधारे उभारून शेतकऱ्यांमार्फत पाणी अडविले जाते व उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांकडून घेतली जाते. मात्र, या नदीच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच पक्के बंधारेही बांधणे आवश्यक आहे. मळेवाड गावातील इतर वाड्यांच्या तुलनेत भटवाडीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतात.