शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

तक्रार द्या, न्याय मिळेल

By admin | Updated: December 23, 2014 23:44 IST

आज राष्ट्रीय ग्राहक दिन : फसवणुकीबाबत आवाज उठविण्याचे आवाहन--लोकमत विशेष

रजनीकांत कदम - कुडाळ --आपली आर्थिक व्यवहारात फसवणूक झाली आहे काय? झाली असेल, तर निश्चितपणे आपण यासंदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लेखी तक्रार करा. आपल्याला ९० दिवसांच्या आत जलदगतीने न्याय मिळेल. नुकसान भरपाईही मिळवून दिली जाईल. त्यामुळे ग्राहकांनो, जागे व्हा आणि अन्याय, फसवणुकीविरोधात तक्रार द्या, असे आवाहन ग्राहक मंचातर्फे प्रबंधक आनंद सावंत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले. ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शासनाने ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ अंमलात आणला, तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ग्राहक दिन साजरा करताना आपल्या जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कांसंदर्भात किती जागरू क आहेत, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. लहान-मोठ्या खरेदी-विक्रीमधून आपली विविध पद्धतीने फसवणूक होत असते. आपण पैसे मोजून सेवा घेतो. मात्र, ती सेवा आपल्याला योग्य पध्दतीने मिळत नाही. आपली फसवणूक होते. तरीही आपण याकडे कानाडोळा करतो. या लहान-सहान फसवणुकीतून आपण आपले हक्क आणि कायदे मात्र विसरून जात आहोत. ग्राहकांच्या बाजूने शासनाने अनेक कायदे करून ठेवले आहेत. परंतु आपण मात्र अशा कायद्यांची ओळख करून घेत नाही. आता मात्र असे करून चालणार नाही. झालेली फसवणूक व अन्यायाविरोधात पेटून उठले पाहिजे. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, हे विसरून चालणार नाही. ग्राहकांना तक्रार द्यायची असल्यास जिल्हा ग्राहक संरक्षण मंच, ओरोस येथेच यावे लागते. यासाठी लागणाऱ्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे काही ग्राहक तक्रार देण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात तक्रार देण्यासंदर्भात कार्यालय असणे आवश्यक आहे. येथील मंचाचे कार्यालय ई-फायलिंग झालेले नाही. लवकरच हे कार्यालय ई-फायलिंग होणे गरजेचे आहे. जेणेकरून ई-सेवेच्या वापरातून ग्राहकांना आपल्या तक्रारी नोंदविणे सोयीस्कर होईल. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या कार्यालयाच्या इमारतीचेही काम हे निधी अभावी अपूर्णावस्थेत आहे. यामुळे हे कार्यालय सिंधुुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत सुरू आहे. त्यामुळे ग्राहक मंचची स्वतंत्र इमारत केव्हा पूर्ण होणार, हा प्रश्न पडत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून आता वर्षे वाढत गेल्यामुळे निधीमध्येही वाढ होत गेली असून आता हा आकडा ३० लाखाच्या घरात पोहोचल्याचे समजते.अधिकतर प्रकरणे बांधकाम जमिनी संदर्भातग्राहक मंचाकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे बांधकाम जमीन, घरबांधणी यासंदर्भातील आहेत.यावर्षी बांधकाम जमिनीसंदर्भात २१ प्रकरणे, विमा ६, वीज वितरण २, घरगुती साधनांसंदर्भात ६, बँक, पतपेढ्यांसदर्भात ७ आणि इतर ८ प्रकरणे दाखल झाली. ग्राहक मंचाचे कार्य आणि ग्राहकांना यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ग्रामीण स्तरापर्यंत जनजागृती करणे आवश्यक आहे, मात्र ती होताना दिसत नाही.सर्र्वानी चौकस रहावे : सावंतग्राहक कोणीही असो, कुठच्याही आर्थिक व्यवहारात मोबदला देऊनही फसवणूक होत असेल, सेवा अपुरी पडत असेल, तर ग्राहकांनी चौकस रहावे व ग्राहक मंचाकडे लेखी तक्रार द्यावी. त्यांना योग्य तो न्याय निश्चितच मिळेल. असा विश्वास जिल्हा तक्रार निवारण मंचचे प्रबंधक आनंद सावंत यांनी सांगितले.इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतींमध्ये होणारी फसवणूक ग्लोबल मार्केटींगमुळे आता काही प्रमाणात कमी झाली आहे. तरीही ग्राहकांनी जागृत राहून ग्राहक कायदा आत्मसात करावा व अन्यायाविरोधात ग्राहक मंचकडे दाद मागावी.- धनाजी तोरस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारीजनजागृती हवीग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी असलेल्या कायद्यांबाबत प्रशासनाकडून योग्य प्रकारे जनजागृती आवश्यक आहे. जनजागृती होत नसल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये या योजनेबाबत अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. पथनाट्ये, भित्तीपत्रके, विविध शालेय स्पर्धा, वृत्तपत्रे आदी माध्यमांच्या आधारे ग्राहक मंचची कार्यप्रणाली व फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचविता येऊ शकतात.