शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कणकवलीत पुन्हा अतिक्रमण हटाव

By admin | Updated: June 7, 2015 00:45 IST

मुख्याधिकाऱ्यांचे नेतृत्व : संदेश पारकरांनी विक्रेत्यांची बाजू मांडली

कणकवली : कणकवली शहरात नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने शनिवारी पुन्हा महामार्गाच्या दुतर्फा असलेले तसेच पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, काँग्रेसचे युवा नेते संदेश पारकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे विक्रेत्यांची बाजू मांडली. मात्र, अतिक्रमणाबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण तसेच पदपथावर काही विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने हटविण्यात येत आहे. बुधवारी या अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. काही विक्रेत्यांकडून दंडही वसूल करण्यात आला. शनिवारी सायंकाळी पुन्हा अतिक्रमण हटविण्यासाठी शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी आले होते. यावेळी काही विक्रेत्यांनी या मोहिमेबाबत संदेश पारकर यांना माहिती दिल्याने ते आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल झाले. तसेच विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांची बाजू मुख्याधिकाऱ्यांकडे त्यांनी मांडली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याने महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या विक्रेत्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने माणुसकीच्या भावनेतून तोपर्यंत विक्रेत्यांना महामार्गाच्या दुतर्फा व्यवसाय करु द्यावा. अशी मागणी पारकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमणाबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण हटवित असल्याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण अतिक्रमण हटावबाबत चर्चा करा, असेही मुख्याधिकाऱ्यांनी पारकर यांना सांगितले. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, बाळा बांदेकर यांच्यासह भाजी विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)