शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सचिवांच्या शिफारशी शाळांच्या मुळावर

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

शाळा बंद होणार : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा.

टेंभ्ये : शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नवीन आकृती बंधाबाबतच्या शिफारशी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या शिफारशींमुळे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शिफारशी इतक्या परिणामकारक आहेत की, त्या जशाच्या तशा स्वीकारल्या तर माध्यमिक शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दि. ६ एप्रिल २०१५ रोजी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक, उपसचिव शाळा व्यवस्थापन व कक्ष अधिकारी उपस्थित होते. या समितीने दि. ०२ फेब्रुवारी २००९, १३ फेब्रुवारी २०१३, २० नोव्हेंबर २०१३, १३ डिसेंबर २०१३ हे शासन निर्णय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९चा अभ्यास करुन काही शिफारशी सादर केल्या आहेत. परंतु यातील काही शिफारशी माध्यमिक शाळांच्या मुळावर येणाऱ्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील शाळाना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या शिफारशींचा पुनर्विचार करण्याची मागणी माध्यमिक स्तरावरुन केली जात आहे. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता पाचवी ते दहावीच्या माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचा वर्ग काढून टाकण्यात येणार आहे. माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचा वर्ग काढून टाकून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळांना हा वर्ग जोडण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी आरटीईमधील अंतराचा कोणताही निकष विचारात घेतलेला नाही. इयत्ता आठवी ते दहावीच्या माध्यमिक शाळांना इयत्ता सहावी व सातवीचा वर्ग जोडण्याची शिफारस केली आहे. प्रत्येक वर्गामध्ये किमान ३५ विद्यार्थी संख्या बंधनकारक करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये एका वर्गासाठी ३५ विद्यार्थी मिळणे दुरापास्त आहे. यातील अन्यायकारक शिफारस म्हणजे आठवी ते दहावीच्या वर्गाना शैक्षणिक वर्ष २०१५-१६मध्ये प्रत्येकी किमान ३५ विद्यार्थ्यांचा सहावी व सातवीचा वर्ग जोडता न आल्यास सन २०१६ - १७मध्ये त्या शाळेचा इयत्ता आठवीचा वर्ग बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग जोडताना विद्यार्थी संख्येचे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. माध्यमिक शाळांसाठी मात्र प्रत्येक ठिकाणी विद्यार्थीसंख्येचे बंधन घालण्यात आले आहे. पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक ही पदे विद्यार्थीसंख्येवर निश्चित न करता शिक्षकसंख्येवर निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. इयत्ता नववी व दहावीचे प्रत्येकी एक वर्ग असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या ४० पेक्षा कमी झाल्यास ती शाळा बंद करण्याची शिफारस या समितीने केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा उभा राहणार आहे. (वार्ताहर)