शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रत्नागिरी : शिवसेना, राष्ट्रवादी संमिश्र

By admin | Updated: October 20, 2014 00:58 IST

विधानसभा निकाल : दापोलीवगळता विद्यमान आमदार कायम, भाजप-काँग्रेसच्या खात्यात भोपळाच

रत्नागिरी : चार प्रमुख पक्षांनी स्वबळ आजमावण्यासाठी केलेल्या प्रयत्नात रत्नारिी जिल्ह्यात शिवसेनाच पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. विजयाचा विचार केल्यास शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार विजयी झाले आहेत. मात्र मतांचा विचार केल्यास शिवसेनेची मते जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीनेही आपला मतांचा टक्का वाढवला आहे. स्वबळावर लढलेल्या भाजपनेही लाखाच्यावर मते मिळवली आहेत. काँग्रेसची अवस्था मात्र बिकटच होत चालली आहे. गेल्या निवडणुकीत ४६ हजाराच्या मताधिक्याने विजयी झालेले आणि या निवडणुकीत सर्वात ‘सेफ’ समजले जाणारे दापोलीतील शिवसेना आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव ही या निवडणुकीतील सर्वात मोठी लक्षवेधी घटना ठरली.जिल्ह्यातील पाच जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते. दापोली आणि चिपळूण मतदार संघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी, गुहागर मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप, राजापूर मतदार संघात शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशी काहीशी पारंपरिक लढत झाली. केवळ रत्नागिरी मतदार संघात शिवसेना विरूद्ध भाजप अशी लढत झाली.दरवेळेप्रमाणे याहीवेळी एकाही अपक्षाला किंवा बंडखोराला दखल घेण्याजोगी मते मिळालेली नाहीत. जवळजवळ प्रत्येक मतदार संघात पहिले दोन उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्हा परिषदेने महाराष्ट्राच्या विधानसभेत तीन सदस्य दिले. भास्कर जाधव जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना आमदार झाले. सुभाष बने यांनाही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. ते विजयी झाले होते. या दोघांच्याही पावलांवर पाऊल ठेवून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनलेले विद्यमान सदस्य संजय कदम हे दापोली -मंडणगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.रत्नागिरीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची पाटी कोरी राहिली आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादी व भाजप यांना एकही जागा न मिळाल्याने तेथे या दोन्ही पक्षांची पाटी कोरी राहिली. दुसरा योगायोग सिंधुदुर्गात नारायण राणे पराभूत झाले, तर पुत्र नितेश विजयी झाले. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघात शेखर निकम व सदानंद चव्हाण यांच्या बाबतीत नात्याचाच योगायोग ठरला. सदानंद चव्हाण हे विजयी झाले व त्यांच्या जावयाचे मामा असलेले शेखर निकम पराभूत झाले.विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रत्नागिरीत होऊनही जिल्हाभरात भाजपला खातेही खोलता आले नाही, एवढी पक्षाची केविलवाणी स्थिती झाली आहे. काँग्रेसचाही दारूण पराभव झाला आहे.पाचही मतदारसंघात तब्बल ३१ उमेदवारांची अनामत रक्कम या निवडणुकीत जप्त झाली आहे. एकूण मतदानाच्या किमान १/८ मते मिळालेल्या उमेदवाराचीच अनामत रक्कम सुरक्षित राहाते. त्यामुळे या निवडणुकीत १/८ एवढी किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळालेल्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांमध्ये विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत आणि भाजपाचे उमेदवार बाळ माने यांचाच समावेश असल्याने उर्वरित ९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १० हजार, तर मागासवर्गीय उमेदवाराला ५ हजार अनामत जमा करावी लागते.