शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

राज्यात वन क्षेत्रात रत्नागिरीचा दुसरा क्रमांक

By admin | Updated: July 22, 2014 23:58 IST

पेटंट कायम : स्थानिकांना लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न

सुभाष कदम -चिपळूणजंगले वाढावीत, त्यांचे संवर्धन व्हावे, जंगलातील लहान लहान जीव सुखाने नांदावेत, जंगलातील पेटंट कायम राहून त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यात गडचिरोलीनंतर वनक्षेत्राच्या बाबतीत रत्नागिरीचा दुसरा क्रमांक लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र आहे. खेड तालुक्यात २५९४ हेक्टर, तर संगमेश्वरमध्ये २६७ हेक्टर वनक्षेत्र आहे. सर्वांत जास्त वनक्षेत्र खेडमध्ये, तर सर्वांत कमी वनक्षेत्र संगमेश्वरमध्ये आहे. येथे वन वाढवून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात. दरवर्षी लाखो नवीन झाडे लावली जातात. शासनस्तरावर जंगले वाचवण्यासाठी वनसंवर्धन अधिनियम १९८० तयार झाला आहे. याअंतर्गत जंगल कसे असावे, याबाबत मार्गदर्शक तत्त्व आहे. वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत वृक्षतोडीस परवानगी देणे व दंड आकारणे आदी गोष्टी येतात. या अधिनियमात १९८९मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. भारतीय वन अधिनियम १९२७नुसार तोडलेला माल वाहतुकीस परवानगी देता येते. १९६६चा जमीन महसूल अधिनियम महसूल विभागाकडे येतो. बिगर मनाई झाडांची तोड झाल्यास या अधिनियमाद्वारे कारवाई केली जाते. जैविक विविधता संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये कायदा केला आहे.या अधिनियमानुसार जंगल संवर्धनाचा हक्क स्थानिकांना मिळतो. नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद आता ग्रामस्तरावर ठेवली जाणार आहे. ५\४रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र. ४ दरवर्षी लाखो झाडांची होते लागवड. ४वन वणव्याचा कोकणाला शाप.४ फासकीचे प्रमाण घटल्याने वन्य प्राण्यांना दिलासा. ४ जैविक विविधता कायद्यामुळे वनसंरक्षणाला मिळणार गती. ४ ग्रामपातळीवर वनसंवर्धनासाठी होणार समिती स्थापन. ४ गावागावात लोकजैविक नोंदवही तयार होणार. ४ वनसंवर्धन अधिनियमाचे होतेय काटेकार पालन. कोकणात वणव्याचे प्रमाण मोठे आहे. गवत जाळल्यानंतर किंवा जमिनीची मशागत केल्यानंतर चांगले पीक येते, असा समज आहे. त्यासाठी जंगलाला दरवर्षी आग लावली जाते. त्यामुळे आंबा, काजू बागांबरोबरच दुर्मीळ जातीच्या औषधी वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. सरपटणारे प्राणी, मुंग्या व लहान प्राणी जळून खाक होतात. यामुळे जैविक विविधतेला धोका निर्माण झाला आहे. वणवामुक्त गाव अभियान राबवून ग्रामस्थांनी शासनाला सहकार्य करायला हवे. वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी आता ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. - अमर साबळे,उपविभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण)