शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
3
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
4
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
5
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
6
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
7
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
8
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
11
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
12
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
13
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
14
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
15
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
16
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
17
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
18
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

राजकीय नैराश्यामुळे राणेंची टीका

By admin | Updated: August 19, 2015 22:54 IST

वैभव नाईक : रेडी पोर्टची चौकशी लावल्यामुळे राणेंचा तळतळाट

कुडाळ : मुख्यमंत्र्यांनी रेडी पोर्टची चौकशी लावल्यामुळेच नारायण राणे यांचा तळतळाट होत असून, केवळ नैराश्यापोटी सरकार, माझ्यावर व पालकमंत्र्यांवर आरोप करीत असल्याचा टोला आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत बोलताना लगावला. जनता सांगेल तेव्हा निवडणूक लढविणार, असे म्हणणाऱ्या राणेंनी बांद्राची निवडणूक का लढविली, असा सवालही त्यांनी यावेळी केला.काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी युती शासनासह आमदार वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याकरिता आमदार नाईक यांनी येथील शिवसेना कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, युवा सेना जिल्हाप्रुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक म्हणाले, रेडी पोर्टची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावल्यामुळे राणेंचा तळतळाट होत आहे. तसेच ते बांद्रात पराभूत झाले. आता ते माजी मुख्यमंत्र्यांपासून माजी आमदार झाले आहेत. अशाप्रकारे त्यांच्या कारकिर्दीला आता उतरती कळा लागली आहे. त्यामुळे नैराश्येपोटी आमच्या सरकारावर, पालकमंत्र्यांवर आणि माझ्यावर ते आरोप करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमच्या सरकार स्थापनेच्या दहा महिन्यांच्या कालावधीत मी नगरपंचायत, कुडाळ रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरण, सोनवडे-घोटगे घाटाची मान्यता, ओरोस एसटी स्थानकासाठी प्रस्ताव केला आहे. याशिवाय एमआयडीसी येथे बंधारा नूतनीकरणासाठी पाच कोटीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाला सादर केला. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून हत्ती प्रश्न सोडविला. तसेच कुडाळ मच्छिमार्केटचे लवकरच भूमीपूजन होणार आहे. कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी पदे भरली. तेथे ब्लड बँक बनविण्यासाठी विचार आहे. युती शासन स्थापन झाल्यावर येथील अधिस्थगन व वाळूबंदी प्रश्न आम्ही महिन्यात सोडविले. पर्यटन अंतर्गत शंभर कोटीचा आराखडा आपणच मंजूर केला, असे म्हणून राणे दिशाभूल करीत आहेत. कारण हा निधी आम्हीच मंजूर केला आहे. कालच यासंदर्भात केंद्रीय पर्यटन समिती याठिकाणी पाहणी करून गेली. (प्रतिनिधी)राणेंच्या मुलांपेक्षा जास्त बोललो..!मला अबोल म्हणणाऱ्या राणेंच्या मुलांपेक्षा विधीमंडळात नक्कीच जास्त बोललो आहे. १५० नवीन आमदार आहेत. यापैकी विकासात्मकदृष्ट्या बोलणाऱ्यांमध्ये पहिल्या दहांमध्ये माझा समावेश असून, तसे प्रोसेडींग असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.