शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नैराश्यामुळे राणेंची टीका

By admin | Updated: August 19, 2015 22:54 IST

वैभव नाईक : रेडी पोर्टची चौकशी लावल्यामुळे राणेंचा तळतळाट

कुडाळ : मुख्यमंत्र्यांनी रेडी पोर्टची चौकशी लावल्यामुळेच नारायण राणे यांचा तळतळाट होत असून, केवळ नैराश्यापोटी सरकार, माझ्यावर व पालकमंत्र्यांवर आरोप करीत असल्याचा टोला आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत बोलताना लगावला. जनता सांगेल तेव्हा निवडणूक लढविणार, असे म्हणणाऱ्या राणेंनी बांद्राची निवडणूक का लढविली, असा सवालही त्यांनी यावेळी केला.काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी युती शासनासह आमदार वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याकरिता आमदार नाईक यांनी येथील शिवसेना कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, युवा सेना जिल्हाप्रुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक म्हणाले, रेडी पोर्टची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावल्यामुळे राणेंचा तळतळाट होत आहे. तसेच ते बांद्रात पराभूत झाले. आता ते माजी मुख्यमंत्र्यांपासून माजी आमदार झाले आहेत. अशाप्रकारे त्यांच्या कारकिर्दीला आता उतरती कळा लागली आहे. त्यामुळे नैराश्येपोटी आमच्या सरकारावर, पालकमंत्र्यांवर आणि माझ्यावर ते आरोप करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमच्या सरकार स्थापनेच्या दहा महिन्यांच्या कालावधीत मी नगरपंचायत, कुडाळ रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरण, सोनवडे-घोटगे घाटाची मान्यता, ओरोस एसटी स्थानकासाठी प्रस्ताव केला आहे. याशिवाय एमआयडीसी येथे बंधारा नूतनीकरणासाठी पाच कोटीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाला सादर केला. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून हत्ती प्रश्न सोडविला. तसेच कुडाळ मच्छिमार्केटचे लवकरच भूमीपूजन होणार आहे. कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी पदे भरली. तेथे ब्लड बँक बनविण्यासाठी विचार आहे. युती शासन स्थापन झाल्यावर येथील अधिस्थगन व वाळूबंदी प्रश्न आम्ही महिन्यात सोडविले. पर्यटन अंतर्गत शंभर कोटीचा आराखडा आपणच मंजूर केला, असे म्हणून राणे दिशाभूल करीत आहेत. कारण हा निधी आम्हीच मंजूर केला आहे. कालच यासंदर्भात केंद्रीय पर्यटन समिती याठिकाणी पाहणी करून गेली. (प्रतिनिधी)राणेंच्या मुलांपेक्षा जास्त बोललो..!मला अबोल म्हणणाऱ्या राणेंच्या मुलांपेक्षा विधीमंडळात नक्कीच जास्त बोललो आहे. १५० नवीन आमदार आहेत. यापैकी विकासात्मकदृष्ट्या बोलणाऱ्यांमध्ये पहिल्या दहांमध्ये माझा समावेश असून, तसे प्रोसेडींग असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.