शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

धरण भागात जमीनमाफियांचं ‘राज’

By admin | Updated: December 14, 2014 23:53 IST

पाचल विभाग : शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचे प्रयत्न सुरु, पाण्याचा प्रश्न तसाच...

पाचल : कोकणातील धरणांच्या प्रश्नांवर गदारोळ माजलेला असतानाच राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण परिसरात जमीनमाफियांचा सुळसुळाट सुरु आहे. महसूल खात्याने वेळीच लक्ष घालून याला पायबंद घालावा, अन्यथा हे माफीया अनेक व्यवहारांमध्ये अडचणीचे ठरु शकतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.अर्जुना धरणग्रस्त भागातील ग्रामस्थांनी अनेक वर्षे मागणी करुनही त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्न सध्या गाजतो आहे. कोकणात सिंचन क्षमता असली तरी ते व्हावे, यासाठी छोटी धरणे बांधून शेतीसाठी त्यातील पाण्याचा वापर करावा. हा मूळ हेतू येथील मध्यम प्रकल्प उभारणीमध्ये होता. दक्षिण रत्नागिरीच्या सर्व तालुक्यांना वीजपुरवठा व्हावा व तालुक्यातील वीजसाठा मोठ्या स्वरुपामध्ये निर्माण व्हावा, ही दोन कारणे यामागे असली तरी अनेक गोष्टींसाठी प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर आहेत. धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, धरणाच्या कालव्याचे काम सुरु आहे. धरण क्षेत्रात येणाऱ्या पांगरी व करक गावच्या ग्रामस्थांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी करण्यात आल्याचेही सांगण्यात येत असले तरी धरणग्रस्तांच्या मूलभूत सुविधा तशाच आहेत. पुनर्वसन दूर ठिकाणी होत असल्याने मूळ जमिनीपासून दूरचे अंतर तयार झाले .त्यामुळे आपल्या मालकी हक्काच्या जमिनीत लक्ष देता येत नाही. त्यामुळे स्थानिक शेतकरी हलाखीच्या छायेखाली आहेत. या सर्व परिस्थितीचा फायदा घेत परराज्यातील अनेक जमीनमाफियांनी संबंधित शासकीय यंत्रणेशी हातमिळवणी करत या परिसरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यामध्ये महसूल यंत्रणेचे काही अधिकारी सामील असल्याचे बोलले जाते.अर्जुना धरणाच्या पाण्याद्वारे ४३ मेगावॅट ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट आहे. या धरणामधून मोठ्या प्रमाणावर ऊर्जानिर्मिती होऊ शकते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी एकतर धरणाची उंची वाढवावी लागेल किंवा या धरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु करावे लागेल, अशी शक्यता आहे. हे करीत असताना करक, पांगरी गावांचे मूळ जमीन भोगवटदार आपल्या ७/१२ सदरी कायम राहिले, तर पहिल्या टप्प्यात मिळालेल्या मोबदल्यात काही साध्य करु न शकणारे शेतकरी भविष्यात मोठे उत्पन्न मिळविण्याची शक्यता आहे.धरण परिसरात असलेल्या स्थितीचा फायदा घेत शेतकऱ्यांसाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवून मदतीचा हात दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन उंचावेल. गरिबीमुळे शेतकऱ्यांच्या हातून जमिनीही निसटून जाणार नाही, असा सुवर्णमध्य काढून अर्जुना धरण परिसरातील जमीन माफियांच्या तोंडी न घालता शासनाने विविध योजना राबवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. राजापूरला लागलेले जमीनमाफियांचे ग्रहण सुटणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)