शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा जिल्हा चौपदरीकरणासाठी रायगडकडे

By admin | Updated: October 19, 2015 23:47 IST

मुंबई-गोवा महामार्ग : उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकाराने संताप

प्रकाश वराडकर --रत्नागिरी--मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. खेड, चिपळूण आणि संगमेश्वर हे तीन तालुके चौपदरीकरणाच्या देखरेखीसाठी रायगड जिल्ह्याकडे देण्यात आल्याने येथील कामावर महाड व पेण विभागाचे अधिकारी देखरेख करणार आहेत. उंटावरून शेळ्या हाकण्याच्या या प्रकारामुळे या कामाच्या दर्जावर नियंत्रण राहील का आणि भविष्यात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पेण विभागाकडेच जावे लागेल का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.राज्याच्या मंत्रालय पातळीवर हा निर्णय घेण्यात आला असून, १ आॅक्टोबरला तसा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. चौपदरीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत आधी जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले होते. चौपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या प्रत्येक उपविभागाकडे दोन तालुके देखरेखीसाठी देण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम हे त्याच जिल्ह्यातील महामार्ग विभागाच्या देखरेखीखाली व्हावे, असेही ठरविण्यात आले होते. मात्र, त्यात काही अधिकाऱ्यांनी राज्यपातळीवर ढवळाढवळ केल्याची चर्चा असून, त्यांचा यामागील हेतू काय, असा प्रश्न विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकारामागे नेमके कोण आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे. आधीच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियोजनानुसार चौपदरीकरणाच्या कामावर देखरेख व्यवस्था याप्रमाणे होती : चिपळूण उपविभाग (१६१-०० ते २४१-०० किलोमीटर) खेड व चिपळूण तालुका. एकूण अंतर ८१ किलोमीटर. रत्नागिरी उपविभाग : (२४१.०० ते ३०५.५०० किलोमीटर) संगमेश्वर व रत्नागिरी तालुका. एकूण अंतर ६४.५०० किलोमीटर. खारेपाटण उपविभाग : (३०५.५०० ते ३६७.३०० किलोमीटर) कार्यक्षेत्र लांजा व राजापूर तालुका. एकूण अंतर ६१.८० किलोमीटर. सावंतवाडी उपविभाग : (३६७.३० ते ४७५.२१० किलोमीटर). कार्यक्षेत्र-कणकवली, कुडाळ व सावंतवाडी तालुका. आता जिल्ह्यातील खेड, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांचे चौपदरीकरण काम चिपळूण उपविभागासह रायगड जिल्ह्यास जोडले गेले आहे.हातचलाखीचा विषय केंद्रापर्यंतमंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या सुरात सूर मिसळून चौपदरीकरणाबाबत करण्यात आलेली ही ‘हातचलाखी’ लक्षात आल्याने व जिल्ह्यावर अन्याय होऊ नये म्हणून जिल्ह्यातीलच एका मोठ्या नेत्याने हा वादग्रस्त विषय केंद्राकडे पोहोचविला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागालाही याबाबत विश्वासात घेतले गेलेले नाही तसेच झालेली कामाची विभागणी ही अयोग्य असून पूर्वीसारखेच नियोजन न ठेवल्यास चौपदरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होतील, असा इशारा या नेत्याने संबंधितांना दिला आहे.विभागणी अडचणीचीच...चौपदरीकरणाच्या नवीन आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बावनदीपर्यंतच्या कामाची जबाबदारी ही महाड व पेण रस्ते विभागाकडे सोपविण्यात आली आहे. हे काम झाले तरी पुढे दुरुस्तीचा विषय येईल तेव्हाही संगमेश्वरच्या लोकांना रत्नागिरी विभागाकडे तक्रार देता येणार नाही तर ती पेण विभागाकडे द्यावी लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाशी चर्चा न करता घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे चौपदरीकरणात अनेक अडचणी निर्माण होण्याचीच भीती आहे.