शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सह्याद्रीच्या जंगल संवर्धनासाठी दौड

By admin | Updated: December 26, 2015 00:03 IST

‘मेरा तेरह रन’ उपक्रम : गतवर्षी १३ दिवसात १३ शहरात १३ मैल धावून निधी जमा

चिपळूण : कोयना घाटमाथा ते चिपळूण हे २२ कि. मी. अंतर सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘मेरा तेरह रन’, सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरु यांच्यातर्फे जगदीश दमानिया यांच्या नेतृत्वाखाली ९ सदस्यांनी पूर्ण केले. या दौडमधून सदस्यांनी जंगल संवर्धनाचा संदेश दिला. यामध्ये मोहीत रायसोनी, अविनेश सैनी, ब्रिजेश गजारिया, भरत रामनाथ, अजय चौधरी, भरत श्रीनिवासमूर्ती, कर्नल श्रीकृष्ण, अरुंधती राव, जगदीश दमानिया हे सदस्य होते. नेहल जोशी व त्यांच्या १२ व ९ वर्षाच्या लय व ओवी या मुलानी ११ कि. मी. अंतर धावून आपली जंगलाप्रती आस्था व्यक्त केली. सह्याद्रीचे नितीन तांबे, उदय पंडित, सुहास पंडित, विश्वास जोशी यांनी ११ कि. मी. दौड पूर्ण करत जंगल संवर्धनाचा नारा दिला. बहादूरशेख ते चिपळूण या जनजागृती दौड रॅली रुद्र अ‍ॅकॅडमीच्या ५० मुले व मुली यांनी संचालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी कोले सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे डॉ. विक्रम घाणेकर यांनी रॅलीला भेट दिली. त्यांच्याहस्ते ‘मेरा तेरह दौड’चे जगदीश दमानिया यांना तर परिक्षेत्र वन अधिकारी कोले यांच्याहस्ते कर्नल श्रीकृष्ण यांचा सत्कार करण्यात आला. संजीव अणेराव, भाऊ पवार, कमलाकर बेंडके यांच्याहस्ते मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सह्याद्री निसर्ग मित्रचे सर्व सभासद या जनजागृती दौडमध्ये सहभागी झाले होते. कैलास देवळेकर व योगीराज राठोड यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. ‘मेरा तेरह रन’ या उपक्रमाअंतर्गत गेल्यावर्षी १३ दिवसात १३ शहरांमध्ये दररोज १३ मैल धावून सामाजिक संस्थांसाठी निधी उभा केला. या उपक्रमातून जमा होणारा निधी सह्याद्रीच्या माझं जंगल या लोकसहभागातून ‘जंगल संवर्धन’ या उपक्रमासाठी खर्च करण्यात येणार आहे. जंगलाचे महत्त्व माणसाला पटू लागले आहे. दरवर्षी येणारे दुष्काळ, महापूर, ढगफुटी हे जंगलाच्या नाशामुळे झाले आहे. जंगलाचे संवर्धन केले तरच यातून माणूस बाहेर पडू शकेल. हे सारे या दौडदरम्यान नागरिकांना सांगण्यात येत आहे. जंगल संवर्धनाचे महत्व सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमात १२५ लोक सहभागी झाले होते. रामाशीष जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोयना घाटमाथा ते चिपळूण अंतर पार.सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरू संस्थेचा सहभाग.दुष्काळ, महापूर, ढगफुटी जंगल नाशामुळे.रूद्र अ‍ॅकॅडमीच्या ५० मुले आणि मुलींचा सहभाग.दौडदरम्याने जंगल संवर्धनाचे महत्व.