शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

सह्याद्रीच्या जंगल संवर्धनासाठी दौड

By admin | Updated: December 26, 2015 00:03 IST

‘मेरा तेरह रन’ उपक्रम : गतवर्षी १३ दिवसात १३ शहरात १३ मैल धावून निधी जमा

चिपळूण : कोयना घाटमाथा ते चिपळूण हे २२ कि. मी. अंतर सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘मेरा तेरह रन’, सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरु यांच्यातर्फे जगदीश दमानिया यांच्या नेतृत्वाखाली ९ सदस्यांनी पूर्ण केले. या दौडमधून सदस्यांनी जंगल संवर्धनाचा संदेश दिला. यामध्ये मोहीत रायसोनी, अविनेश सैनी, ब्रिजेश गजारिया, भरत रामनाथ, अजय चौधरी, भरत श्रीनिवासमूर्ती, कर्नल श्रीकृष्ण, अरुंधती राव, जगदीश दमानिया हे सदस्य होते. नेहल जोशी व त्यांच्या १२ व ९ वर्षाच्या लय व ओवी या मुलानी ११ कि. मी. अंतर धावून आपली जंगलाप्रती आस्था व्यक्त केली. सह्याद्रीचे नितीन तांबे, उदय पंडित, सुहास पंडित, विश्वास जोशी यांनी ११ कि. मी. दौड पूर्ण करत जंगल संवर्धनाचा नारा दिला. बहादूरशेख ते चिपळूण या जनजागृती दौड रॅली रुद्र अ‍ॅकॅडमीच्या ५० मुले व मुली यांनी संचालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी कोले सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे डॉ. विक्रम घाणेकर यांनी रॅलीला भेट दिली. त्यांच्याहस्ते ‘मेरा तेरह दौड’चे जगदीश दमानिया यांना तर परिक्षेत्र वन अधिकारी कोले यांच्याहस्ते कर्नल श्रीकृष्ण यांचा सत्कार करण्यात आला. संजीव अणेराव, भाऊ पवार, कमलाकर बेंडके यांच्याहस्ते मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सह्याद्री निसर्ग मित्रचे सर्व सभासद या जनजागृती दौडमध्ये सहभागी झाले होते. कैलास देवळेकर व योगीराज राठोड यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. ‘मेरा तेरह रन’ या उपक्रमाअंतर्गत गेल्यावर्षी १३ दिवसात १३ शहरांमध्ये दररोज १३ मैल धावून सामाजिक संस्थांसाठी निधी उभा केला. या उपक्रमातून जमा होणारा निधी सह्याद्रीच्या माझं जंगल या लोकसहभागातून ‘जंगल संवर्धन’ या उपक्रमासाठी खर्च करण्यात येणार आहे. जंगलाचे महत्त्व माणसाला पटू लागले आहे. दरवर्षी येणारे दुष्काळ, महापूर, ढगफुटी हे जंगलाच्या नाशामुळे झाले आहे. जंगलाचे संवर्धन केले तरच यातून माणूस बाहेर पडू शकेल. हे सारे या दौडदरम्यान नागरिकांना सांगण्यात येत आहे. जंगल संवर्धनाचे महत्व सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमात १२५ लोक सहभागी झाले होते. रामाशीष जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोयना घाटमाथा ते चिपळूण अंतर पार.सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरू संस्थेचा सहभाग.दुष्काळ, महापूर, ढगफुटी जंगल नाशामुळे.रूद्र अ‍ॅकॅडमीच्या ५० मुले आणि मुलींचा सहभाग.दौडदरम्याने जंगल संवर्धनाचे महत्व.