शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

आरोसबाग पुलाचा प्रश्न निकाली

By admin | Updated: June 17, 2016 23:24 IST

शीतल राऊळ, मंदार कल्याणकर यांची माहिती : १६ कोटीचा निधी मंजूर, वर्षाअखेरीस कामास सुरूवात

बांदा : भाजपाच्या माध्यमातून बांदा शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आरोसबाग येथील पूलाचा आराखडा तयार करण्यात आला असून या पूलासाठी १६ कोटि रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पूलाची भूगर्भ चाचणी पूर्ण झाली असून या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूलाच्या कामाची पायाभरणी होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शितल राऊळ व बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.बांदा शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आरोसबाग पुलासाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. पुलासाठी १३ कोटी रुपये तर दोन्ही जोडरस्त्यांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.शहरातील मिठगुडी, लकरकोट परिसरात तेरेखोल नदिपात्रालगतचा बराचसा भाग कोसळल्याने याठिकाणी धुपप्रतिबंधक बंधारा बांधावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. येथे ३00 मीटर संरक्षक भिंत बांधण्यासाठी दिड कोटी रुपयांचा निधी मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मंजूूर करण्यात आला आहे. बांदा-वाफोली मार्गावरील निमजगा येथील पाटो पुलासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ९0 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निमजगा-गवळीटेंब वाडीसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५0 लाख निधी मिळाला असूून या नळयोजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील पाणीटंचाई दुर होणार असून भविष्यात बांदा शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचा आमचा संकल्प आहे. तुळसाण पुल येथे पक्का बंधारा बांधण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. याचा फायदा या नदिपात्रातील १२ गावांच्या नळपाणीयोजनेला होणार आहे. बांदा शहरात १00 एलईडी पथदिप बसविण्यात येणार आहेत.शहरातील निजमगा येथे तालुुका क्रिडा संकुलाला मंजुरी मिळाली असून क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी यासाठी ५ कोटि रुपयांचा निधी मंजुर केला आहे. वाढिव तिन कोटि रुपये निधी विशेष बाब म्हणून देण्यात आले आहेत. या संकुलाचे आॅक्टोबर महिन्यात भुमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच १४ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदांना थेट जमा करण्याचा निर्णय घेतल्याने याअंतर्गत बांदा ग्रामपंचायतीला यावर्षी १६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण होणारराज्यात शिवसेना-भाजपाच्या युतीचे सरकार असताना १९९७-९८ साली तत्कालिन बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर आघाडी शासनाच्या कालावधीत पंधरा वर्षे या पुलाचे काम पूर्णत: रखडले होते.आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्यानंतर पुन्हा या कामासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे काम झाल्यास आरोसबाग येथील १000 लोकवस्तीचा रहदारीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.