शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण नको

By admin | Updated: December 22, 2014 00:20 IST

नीतेश राणे : कणकवलीतील पाणीटंचाई आढावा बैठकीत आवाहन

कणकवली : पाणी हे जीवन आहे. त्यावरून कोणीही राजकारण करू नये. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक घरात २४ तास पाणी असावे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक असून त्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करा, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी कणकवली तालुका संभाव्य पाणीटंचाई आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती भिवा वर्देकर, जिल्हा परिषद सदस्य मधुसूदन बांदिवडेकर, विभावरी खोत, पंचायत समिती सदस्य संतोष कानडे, महेश गुरव, संजय देसाई, दादा कर्ले, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. एम. शिंदे, नायब तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासह अन्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नीतेश राणे म्हणाले, प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी आजपासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीटंचाईच्या संदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील तसेच संबंधित प्रश्नांबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. गावपातळीवर काम करणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. असा सुसंवाद असेल तरच विकासही निश्चितच होईल. त्यासाठी सर्वांनीच सकारात्मकपणे विचार करणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रश्न सोडविताना कोणत्याही प्रकारचे राजकारण अथवा पक्षभेद करण्यात येणार नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहणार असून प्रशासनाचे तसेच आपलेही त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर यांनी मानले. रमाकांत राऊत, हेमंत परुळेकर, विजय भोगटे, बबलू सावंत, संजय पाताडे, प्रकाश भालेकर आदींनी विविध समस्या तसेच प्रस्ताव यावेळी मांडले. (वार्ताहर)