शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची गुणवत्ता वाढली

By admin | Updated: January 5, 2015 18:59 IST

जिल्हा परिषद : जिल्ह्यातील २९३ प्राथमिक शाळा अ श्रेणीत

रहिम दलाल- रत्नागिरी -ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावत आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या २९३ प्राथमिक शाळांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांची तपासणी सुरू आहे. विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन याद्वारे करण्यात येत आहे. हे मूल्यांकन २०० गुणांचे ठेवण्यात आले आहे. यामध्ये शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता आदींचा समावेश करण्यात आला आहे. शाळा व विद्यार्थ्यांचे मुल्यांकन वर्षातून एकदा करण्यात येते. या मुल्यांकनामध्ये शाळा व्यवस्थापन समितीसमोर विद्यार्थी व शिक्षकांचे कथाकथन, काव्य वाचन, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, शिक्षकांच्या सहाकार्याने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, फळे आदींची विक्री शाळेच्या क्रीडांगणावर प्रदर्शन भरवून ग्रामस्थांना निमंत्रित करणे, त्यातून खरेदी - विक्री, आर्थिक व्यवहार आदींच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक माहिती समजण्यामध्ये मोठा हातभार लावगण्यात येईल. शाळांना मुल्यांकनानुसार अ, ब, क, ड, ई अशी श्रेणी देण्यात येते. तालुका व जिल्हास्तरावर शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी अशा दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. गतवर्षीपेक्षा यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दर्जामध्ये वाढ झाली आहे. गत शैक्षणिक वर्षामध्ये अ श्रेणीमध्ये ४५ शाळा, ब श्रेणीमध्ये ८९८ शाळा, क श्रेणीमध्ये १७७७ आणि ड श्रेणीमध्ये २३ शाळांचा समावेश होता. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असली तरी शैक्षणिक दर्जा मात्र उंचावत आहे. त्यामुळे प्रत्येक श्रेणीतील शाळांची संख्याही आता वाढू लागली आहे. (शहर वार्ताहर)तालुकास्तरावर मूल्यांकन समित्या...तालुकाअबकडमंडणगड३७११२१९००दापोली३९१४३११०००खेड१३९३३०९चिपळूण२८१६६१७१२गुहागर१९१४७४००रत्नागिरी८२२१२४३१संगमेश्वर७१४९२४१२लांजा६३१४७१७०राजापूर१७२८५६१०एकूण२९३१४००१०३२१४ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळांच्या मुल्यांकनासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आणि जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची तालुका व जिल्हास्तरावरची शाळांच्या गुणवत्तेची पाहणी केल्यानंतर शाळांची श्रेणी ठरविण्यात आली आहे.गुणांच्या आधारे शाळांचे वर्गीकरणअ९० ते १०० टक्केब८० ते ८९ टक्केक६० ते ७९ टक्केड४० ते ५९ टक्केइ ० ते ३९ टक्के