शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

मच्छिमार हक्कांचे रक्षण हव

By admin | Updated: January 29, 2015 00:10 IST

भाई वैद्य : मालवणात साथी किशोर पवार स्मृती पुरस्काराचे वितरणे

मालवण : कल्याणकारी राज्य आज शिल्लक राहिलेले नसून कारखानदारांचे कल्याण करणारे राज्य बनले आहे. एकीकडे पर्यावरण आणि जैवविविधता वाचविली जात असताना नैसर्गिक साधन संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या मच्छिमारांच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी न्याय मार्गाने वैचारिक लढा सुरुच ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी मालवण येथील साथी किशोर पवार स्मृती पुरस्कार वितरणप्रसंगी केले.एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने साथी किशोर पवार स्मृती समारंभाचे आयोजन मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. कामगार कायद्याची मोडतोड करुन कारखानदारांना अधिकाधिक सवलती देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अमेरिका सांगते म्हणून आपण जागतिकिकरण करणे चुकीचे ठरेल. असेही वैद्य यांनी सांगितले. सरकारचे आर्थिक धोरण सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येत असेल तर त्याविरुद्ध लढा दिलाच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार शेतकऱ्यांना अनेक प्रश्नावर लढावे लागत आहे. विचारांचा लढा असाच सुरु ठेवा. असे आवाहनही भाई वैद्य यांनी केले.यावेळी साहित्यिक प्रविण बांदेकर, माजी आमदार जयानंद मठकर, एस. एम. जोशी, सोशालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष मधुकर पाटील, सचिव सुभाष वारे, रमेश धुरी, छोटू सावजी, रवीकिरण तोरसकर यांच्यासह मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)धरणे आंदोलन छेडणार : पौर्णिमा मेहेरपौर्णिमा मेहेर म्हणाल्या, मत्स्य व्यवसायात महिलांचे योगदान मोठे आहे. याची कोठेही नोंद होत नाही. अशा महिलांना आधाराची गरज आहे. तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना ३५ वर्ष झाली तरीही न्याय मिळाला नाही. देशाला ऊर्जेचा प्रश्न असला तरीही या प्रकल्पग्रस्तांनी परिणाम सोसले आहेत. नियमावली तयार करण्यात आली असली तरीही त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जैतापूरचा प्रश्नही असाच आहे. अच्छे दिनांमध्ये असे प्रश्न समाविष्ट असतील तर मच्छिमारांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. मच्छिमारांच्या प्रश्नासाठी मार्च महिन्यात नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. ५८ टक्के शेतकऱ्यांचे काय करणार?सत्ताधाऱ्यांना आपला देश अमेरिकेच्या दावणीला बांधायचा आहे. याच विचाराने सत्ताधारी पछाडले आहेत. त्यांना कष्टकरी शेतकऱ्यांची पर्वा नाही. अमेरिकेत केवळ २ टक्केच शेतकरी आहेत. भारतात ही संख्या ६0 टक्के आहे. तेथील लोकसंख्या ३0 कोटी तर भारताची लोकसंख्या १00 कोटींहून अधिक आहे. यामुळे भारताची तुलना अमेरिकेशी करताना येथील शेतकऱ्यांची संख्या २ टक्क्यांवर आणणार का? उर्वरित ५८ टक्के शेतकऱ्यांचे काय करणार? - भाई वैद्य,ज्येष्ठ समाजवादी विचारवंत