शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

मच्छिमार हक्कांचे रक्षण हव

By admin | Updated: January 29, 2015 00:10 IST

भाई वैद्य : मालवणात साथी किशोर पवार स्मृती पुरस्काराचे वितरणे

मालवण : कल्याणकारी राज्य आज शिल्लक राहिलेले नसून कारखानदारांचे कल्याण करणारे राज्य बनले आहे. एकीकडे पर्यावरण आणि जैवविविधता वाचविली जात असताना नैसर्गिक साधन संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या मच्छिमारांच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी न्याय मार्गाने वैचारिक लढा सुरुच ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी मालवण येथील साथी किशोर पवार स्मृती पुरस्कार वितरणप्रसंगी केले.एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने साथी किशोर पवार स्मृती समारंभाचे आयोजन मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. कामगार कायद्याची मोडतोड करुन कारखानदारांना अधिकाधिक सवलती देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अमेरिका सांगते म्हणून आपण जागतिकिकरण करणे चुकीचे ठरेल. असेही वैद्य यांनी सांगितले. सरकारचे आर्थिक धोरण सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येत असेल तर त्याविरुद्ध लढा दिलाच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार शेतकऱ्यांना अनेक प्रश्नावर लढावे लागत आहे. विचारांचा लढा असाच सुरु ठेवा. असे आवाहनही भाई वैद्य यांनी केले.यावेळी साहित्यिक प्रविण बांदेकर, माजी आमदार जयानंद मठकर, एस. एम. जोशी, सोशालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष मधुकर पाटील, सचिव सुभाष वारे, रमेश धुरी, छोटू सावजी, रवीकिरण तोरसकर यांच्यासह मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)धरणे आंदोलन छेडणार : पौर्णिमा मेहेरपौर्णिमा मेहेर म्हणाल्या, मत्स्य व्यवसायात महिलांचे योगदान मोठे आहे. याची कोठेही नोंद होत नाही. अशा महिलांना आधाराची गरज आहे. तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना ३५ वर्ष झाली तरीही न्याय मिळाला नाही. देशाला ऊर्जेचा प्रश्न असला तरीही या प्रकल्पग्रस्तांनी परिणाम सोसले आहेत. नियमावली तयार करण्यात आली असली तरीही त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जैतापूरचा प्रश्नही असाच आहे. अच्छे दिनांमध्ये असे प्रश्न समाविष्ट असतील तर मच्छिमारांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. मच्छिमारांच्या प्रश्नासाठी मार्च महिन्यात नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. ५८ टक्के शेतकऱ्यांचे काय करणार?सत्ताधाऱ्यांना आपला देश अमेरिकेच्या दावणीला बांधायचा आहे. याच विचाराने सत्ताधारी पछाडले आहेत. त्यांना कष्टकरी शेतकऱ्यांची पर्वा नाही. अमेरिकेत केवळ २ टक्केच शेतकरी आहेत. भारतात ही संख्या ६0 टक्के आहे. तेथील लोकसंख्या ३0 कोटी तर भारताची लोकसंख्या १00 कोटींहून अधिक आहे. यामुळे भारताची तुलना अमेरिकेशी करताना येथील शेतकऱ्यांची संख्या २ टक्क्यांवर आणणार का? उर्वरित ५८ टक्के शेतकऱ्यांचे काय करणार? - भाई वैद्य,ज्येष्ठ समाजवादी विचारवंत