शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आचऱ्यातील घटनेचा ग्रामस्थांकडून निषेध

By admin | Updated: November 2, 2015 00:23 IST

व्यापारी सोमवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध करणार

आचरा : आचरा पारंपरिक मच्छिमार व पर्ससीनधारक यांच्यात वादाचा उद्रेक होऊन शनिवारी त्याचे राड्यात रुपांतर झाले. या घटनेप्रकरणी आचरा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. तसेच पत्रकारांवरील हल्ला प्रकरणाचा आचरा येथील व्यापारी सोमवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध करणार आहेत. शनिवारी सायंकाळी घडलेल्या राड्याचा आचरा सर्वपक्षीय ग्रामस्थांनी निषेध करत आचरा पोलीस व आचरा पत्रकार यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध केला व आचरा पोलिसांना पाठिंबा दर्शविला. अशा प्रकारची घटना आचऱ्यात घडली नव्हती. यापुढे घडता कामा नये जर तसा प्रयत्न झाल्यास आचरावासीय जशास तसे उत्तर देतील असा इशारा आचरावासीयांनी दिला. यावेळी सरपंच मंगेश टेमकर, राजन गावकर, अशोक गावकर, श्रीकांत सांबारी, जेरोन फर्नांडिस, जगदीश पांगे, विजय कदम, छोटू पांगे, चंदन पांगे, अभिजीत सावंत, विद्यानंद परब, श्याम घाडी, धोंडी चिंदरकर, संतोष कोदे आदी उपस्थित होते. शनिवारी बाहेरच्या मच्छिमारांनी आचऱ्यात घुसून केलेला राडा व त्यात पोलीस, पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या निषेध म्हणून सोमवारी पूर्ण दिवस आचरा बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी संघटना निषेध नोंदविणार आहेत. मनसे मच्छिमारांच्या पाठिशी राडा प्रकरणानंतर मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आचरा पिरावाडी येथे भेट देत घडलेला राडा तसेच पोलीस आणि पत्रकार यांना झालेली मारहाण निंदनीय असली तरी याचे कर्ताकरविता हे शासन आहे. तत्कालीन पालकमंत्री व आताचे पालकमंत्री यांनी मच्छिमारांच्या भावनेशी खेळ केला. स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन जणू काय मच्छिमारांचा प्रश्न सोडविला असा आव आणत त्यांची दिशाभूल केली. पारंपरिक मच्छिमार हे गुन्हेगार नसून त्यांचा रोजीरोटीसाठी असलेला लढा आहे. महाराष्ट्र शासनाने चांगला वकील दिला असता तर पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय करणारा निर्णय झाला नसता. यापुढे आंदोलन व न्यायालयीन लढ्यात मनसे ही पारंपरिक मच्छिमारांच्या पाठिशी राहणार असल्याचे यावेळी उपरकर म्हणाले. (वार्ताहर) वादास शिवसेना जबाबदार : काँग्रेस राडा प्रकरणानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, अशोक सावंत, मंदार केणी यांनी आचऱ्यात भेट दिली. यावेळी सतीश सावंत यांनी या पारंपरिक व पर्ससीन मच्छिमारांचा वाद चिघळल्यास पालकमंत्री जबाबदार आहेत. हा मच्छिमारांचा प्रश्न चिघळवून त्याला खतपाणी घालण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोप केला. भविष्यात मच्छिमार एकत्र येवून एकोप्याने व्यवसाय करतील यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे सावंत म्हणाले.