शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

देवगड पाणी प्रश्नाला प्राधान्य

By admin | Updated: December 3, 2015 23:54 IST

नीतेश राणे : तालुका पाणीटंचाई आढावा बैठकीत आश्वासन

देवगड : देवगडचा पाणी प्रश्न हा गेली कित्येक वर्षापासून प्रलंबितच राहिला आहे. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगदान देऊन सरपंच, ग्रामसेवक व जनतेने जबाबदारी घेऊन संघटीतपणे काम केले पाहिजे. देवगडचा पाणी प्रश्न सोडवणे ही माझी मुख्य जबाबदारी आहे. पाणी प्रश्नाबद्दल पाठविलेल्या प्रस्तावाला निधी मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात देवगड तालुका पाणी टंचाई निवारण कृती आराखडा समन्वय बैठकीच्यावेळी व्यक्त केली.जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये देवगड तालुक्याची पाणी टंचाई निवारण कृती आराखडा समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद वित्त बांधकाम सभापती संजय बोंबडी, देवगड सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे, तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, शेखर जाधव, ग्रामीण पाणी पुरवठाचे अधिकारी, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार नीतेश राणे म्हणाले की, येथील अधिकारी वर्गाची मानसिकता काम करण्याची दिसून येत नाही यामुळेही पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यामुळे अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे वा आत्मयितेने काम केले पाहीजे. गेली कित्येक वर्षे देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न हा तसाच राहिला आहे. याकडे २५ वर्षे आमदारकी मिळूनही जीवनाशी निगडीत असलेला पाणी प्रश्न युतीच्या आमदारांना सोडविता आला नाही.मात्र, मी आमदार झाल्यानंतर देवगड तालुक्यामध्ये होणाऱ्या पाणी टंचाईवरती लक्ष केंद्रीत केले असून हा प्रश्न जबाबदारीने मी सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून जनतेला देण्यात येणारी पाणी प्रश्नाबद्दलची उडवाउडवीची उत्तरे थांबली पाहिजेत. असा कडक इशारा आमदार राणे यांनी अधिकारी वर्गाला दिला. नुसते प्रस्ताव पाठवून काम मंजूरी होत नाही. अधिकारी वर्गांनी त्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला पाहीजे. गावातील जनतेने व सरपंच, ग्रामसेवकांनी जबाबदारीने व जनतेने एक जबाबदारी म्हणून संघटीतपणे काम केले तर देवगडचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो. यामुळे संघटितपणे काम केले पाहीजे. कामामध्ये नियोजनबद्धता बसणे गरजेचे आहे. विकासाच्या वातावरणाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून आत्मियतेने काम केले पाहिजे. यामुळे खांद्याला खांदा लावून देवगडचा पाणी प्रश्न सर्वांनी एकत्रित येऊन सोडविला पाहिजे असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)गावच्या सरपंचांनी उपस्थित केले प्रश्नया पाणी टंचाई निवारण कृती आराखड्यामध्ये चांदोशी गावचे सरपंच यांनी आपल्या गावातील होत असलेल्या पाणी टंचाईवरती उपाययोजना करण्यासाठी प्रश्न उपस्थित केला. मोंडपारचे सरपंच दिनेश राणे यांनी मोंडपारमध्ये दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे यामुळे येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील नळ योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. टेंबवली गावचे सरपंच यांनी टेंबवलीमधील विंंधन विहिरीमधील गाळ साफ करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी केली. पाटथर गावचे सरपंच यांनी पाटथर गावामध्ये जुनी नळपाणी योजना जीर्ण झाली असून त्या नळयोजनेची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच मिठबांव गावचे सरपंच यांनी मिठबांवमधिल विहिरींचा व नदीचा गाळ उपसण्यासाठी निधीची गरज असल्याचे त्यांनी हा निधी मिळण्यासाठी कृती आराखड्याच्या बैठकीमध्ये ठराव सूचित केला आहे. याबाबत आता योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.