शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

कविता करताना कवीने भान ठेवावे

By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST

राजा शिरगुप्पे : कणकवलीत ‘उगवाई काव्य’ पुरस्कारांचे वितरण

कणकवली : केशवसूत यांनी आपल्या कवितेतून जी बंडाची तुतारी पुकारली, त्याचेच पडसाद आजच्या कवींच्या कवितांमध्ये उमटत आहेत. भविष्यात शस्त्राने नाहीतर शब्दशस्त्रानेच जगाला जिंकता येणार आहे. यासाठी आपण का लिहितो याचे भान कवीने ठेवायला हवे, असे प्रतिपादन दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. राजा शिरगुप्पे यांनी येथे ‘आवानओल प्रतिष्ठान’ आयोजित पाचव्या वसंत सावंत स्मृती उगवाई काव्योत्सवात केले. कणकवली नगरवाचनालयाच्या पू. पटवर्धन सभागृहात प्रा. शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कवी नारायण लाळे, आवानओल प्रतिष्ठानचे अजय कांडर, विनायक सापळे, प्रा. मोहन कुंभार, राजेश कदम, अ‍ॅड. विलास परब, अच्युत देसाई, कल्पना मलये, आदी उपस्थित होते.औरंगाबादचे कवी श्रीधर नांदेडकर यांना त्यांच्या ‘परतीचा रस्ता नाहीय’ या काव्यसंग्रहासाठी वसंत सावंत स्मृती उगवाई काव्य पुरस्कार, तसेच बीड-आंबेजोगाईचे कवी बालाजी सुतार यांना द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना प्रा. शिरगुप्पे म्हणाले, वर्तमानकाळ माणसाला उद्ध्वस्त करायच्या वाटेवर आहे. माणूस माणसालाच शत्रू बनवत चालला आहे. अशावेळी साहित्यिकांची तसेच साहित्य चळवळीची जबाबदारी मोठी आहे. याच जबाबदारीने आवानओल प्रतिष्ठान साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देतानाच माणसाच्या मनातील ओल जपण्याचे काम करत आहे, हे आजच्या बदलत्या काळात फार मोलाचे आहे. कवी नारायण लाळे म्हणाले, कवीच्या जगण्याची नितळता कवितेत दिसायला हवी. अर्थात कवीचे जगणेच प्रामाणिक असेल तर तो कवितेत प्रामाणिक दिसत असतो. कारण आपण विचार करतो तसेच लिहित असतो. आवानओल प्रतिष्ठानच्यावतीने वसंत सावंत यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहेत, हे चांगले काम आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या नावाने गुणवान नव्या कवीला पुरस्कार देण्यात येत असल्याने नव्या कवींना प्रेरणाच मिळणार आहे.श्रीधर नांदेडकर म्हणाले, वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, हा कोकणच्या मातीने केलेला माझा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. बालाजी सुतार म्हणाले, घर उठून बाजारात आले आणि बाजार घरात आला. अशा विचित्र काळात आपण जगत आहोत. जगण्यातला निरागसपणा संपून गेला आहे. आजच्या काळातील ताप माझ्या कवितेत आला पाहिजे, असे मला वाटत असल्याने माझ्या कवितेत वर्तमानकाळ लिहीत असतो. कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ श्रीधर पाचंगे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतगायनाने करण्यात आला.यावेळी दर्पण सांस्कृतिक मंचचे उत्तम पवार, राजेश कदम, तसेच श्रीधर पाचंगे यांचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. विलास परब यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)काव्यसंमेलनाने रंगतखुल्या काव्यसंमेलनात श्रीधर नांदेडकर, डॉ. अनिल कांबळी, वीरधवल परब, डॉ. अनुजा जोशी, प्रा. मोहन कुंभार, बालाजी सुतार, प्रा. अनिल फराकटे, सुजाता गायकवाड, नीलम सावंत-पालव, मंजुनाथ पाचंगे, सागर होळकर, कल्पना मलये, समृद्धी मलये, उदय सर्पे, राजस रेगे, नीता कामत, समीक्षा येडवे, महेश वालावलकर, सिद्धार्थ तांबे, बाळा शिरसाट, आदींनी कविता सादर केल्या. या कार्यक्रमात काव्यसंमेलनाने आणखीनच रंगत आणली.