शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

कविता करताना कवीने भान ठेवावे

By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST

राजा शिरगुप्पे : कणकवलीत ‘उगवाई काव्य’ पुरस्कारांचे वितरण

कणकवली : केशवसूत यांनी आपल्या कवितेतून जी बंडाची तुतारी पुकारली, त्याचेच पडसाद आजच्या कवींच्या कवितांमध्ये उमटत आहेत. भविष्यात शस्त्राने नाहीतर शब्दशस्त्रानेच जगाला जिंकता येणार आहे. यासाठी आपण का लिहितो याचे भान कवीने ठेवायला हवे, असे प्रतिपादन दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. राजा शिरगुप्पे यांनी येथे ‘आवानओल प्रतिष्ठान’ आयोजित पाचव्या वसंत सावंत स्मृती उगवाई काव्योत्सवात केले. कणकवली नगरवाचनालयाच्या पू. पटवर्धन सभागृहात प्रा. शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कवी नारायण लाळे, आवानओल प्रतिष्ठानचे अजय कांडर, विनायक सापळे, प्रा. मोहन कुंभार, राजेश कदम, अ‍ॅड. विलास परब, अच्युत देसाई, कल्पना मलये, आदी उपस्थित होते.औरंगाबादचे कवी श्रीधर नांदेडकर यांना त्यांच्या ‘परतीचा रस्ता नाहीय’ या काव्यसंग्रहासाठी वसंत सावंत स्मृती उगवाई काव्य पुरस्कार, तसेच बीड-आंबेजोगाईचे कवी बालाजी सुतार यांना द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना प्रा. शिरगुप्पे म्हणाले, वर्तमानकाळ माणसाला उद्ध्वस्त करायच्या वाटेवर आहे. माणूस माणसालाच शत्रू बनवत चालला आहे. अशावेळी साहित्यिकांची तसेच साहित्य चळवळीची जबाबदारी मोठी आहे. याच जबाबदारीने आवानओल प्रतिष्ठान साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देतानाच माणसाच्या मनातील ओल जपण्याचे काम करत आहे, हे आजच्या बदलत्या काळात फार मोलाचे आहे. कवी नारायण लाळे म्हणाले, कवीच्या जगण्याची नितळता कवितेत दिसायला हवी. अर्थात कवीचे जगणेच प्रामाणिक असेल तर तो कवितेत प्रामाणिक दिसत असतो. कारण आपण विचार करतो तसेच लिहित असतो. आवानओल प्रतिष्ठानच्यावतीने वसंत सावंत यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहेत, हे चांगले काम आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या नावाने गुणवान नव्या कवीला पुरस्कार देण्यात येत असल्याने नव्या कवींना प्रेरणाच मिळणार आहे.श्रीधर नांदेडकर म्हणाले, वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, हा कोकणच्या मातीने केलेला माझा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. बालाजी सुतार म्हणाले, घर उठून बाजारात आले आणि बाजार घरात आला. अशा विचित्र काळात आपण जगत आहोत. जगण्यातला निरागसपणा संपून गेला आहे. आजच्या काळातील ताप माझ्या कवितेत आला पाहिजे, असे मला वाटत असल्याने माझ्या कवितेत वर्तमानकाळ लिहीत असतो. कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ श्रीधर पाचंगे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतगायनाने करण्यात आला.यावेळी दर्पण सांस्कृतिक मंचचे उत्तम पवार, राजेश कदम, तसेच श्रीधर पाचंगे यांचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. विलास परब यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)काव्यसंमेलनाने रंगतखुल्या काव्यसंमेलनात श्रीधर नांदेडकर, डॉ. अनिल कांबळी, वीरधवल परब, डॉ. अनुजा जोशी, प्रा. मोहन कुंभार, बालाजी सुतार, प्रा. अनिल फराकटे, सुजाता गायकवाड, नीलम सावंत-पालव, मंजुनाथ पाचंगे, सागर होळकर, कल्पना मलये, समृद्धी मलये, उदय सर्पे, राजस रेगे, नीता कामत, समीक्षा येडवे, महेश वालावलकर, सिद्धार्थ तांबे, बाळा शिरसाट, आदींनी कविता सादर केल्या. या कार्यक्रमात काव्यसंमेलनाने आणखीनच रंगत आणली.