शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

बाहेरच्या माणसांनीच कोकणचा उठविला लाभ

By admin | Updated: December 31, 2015 00:29 IST

महेंद्र नाटेकर : कणकवलीतील स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीच्या सभेत प्रतिपादन

कणकवली : धरणे, पाटबंधारे झाले, चौपदरी महामार्ग झाला, इंजिनिअरिंग, मेडिकल महाविद्यालये झाली, उद्योगधंदे आले व कोकणी माणसाला वंचित ठेवून बाहेरच्या माणसांनी लाभ उठवला. कोकण विकास झाला असे म्हणता येणार नाही. कोकण विकास म्हणजे कोकणी माणसांचा विकास आणि असा विकास स्वतंत्र कोकण राज्यातच होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. कणकवली येथील वृक्षमित्र हॉलमध्ये स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीची सभा आयोजित केली होती. यावेळी नाटेकर बोलत होते. वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, मोतीराम गोठीवडेकर, संजय हंडोरे, सुरेश हाटे उपस्थित होते.नाटेकर म्हणाले की, आज ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या लोकांची होते. स्वतंत्र राज्य असल्यास गोव्याप्रमाणे १०० टक्के नोकरभरती कोक णी तरुणांचीच होईल. ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या बेरोजगारांची होत असल्याने कोकणातील एस.टी., एन.टी., ओ.बी.सी. आदी मागासवर्गीयांना याचा लाभ होत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले तरी या आरक्षणापासून कोकणातील मराठे वंचित राहणार. कोकणात औष्णिक, आण्विक इत्यादी विनाशकारी प्रकल्प कोकणात येऊ घातले आहेत. त्याच्या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत. तरी विनाशकारी प्र्रकल्प सुरूच आहेत. सुरूच राहणार! परराज्यातील मच्छिमार कोकणात येऊन कोकणी मच्छिमारांना उद्ध्वस्त करून माशांची लूट करत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पाठींब्यानेच हे सारे घडत आहे. केंद्र सरकार राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विनाशकारी प्रकल्प आणूच शकत नाही. हे प्रकल्प रोेखायचे असतील तर स्वतंत्र कोकण राज्यच पाहिजे. यावेळी वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, संजय हंडोरे यांनी भाषणे केली. सुरेश हांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)