शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

बाहेरच्या माणसांनीच कोकणचा उठविला लाभ

By admin | Updated: December 31, 2015 00:29 IST

महेंद्र नाटेकर : कणकवलीतील स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीच्या सभेत प्रतिपादन

कणकवली : धरणे, पाटबंधारे झाले, चौपदरी महामार्ग झाला, इंजिनिअरिंग, मेडिकल महाविद्यालये झाली, उद्योगधंदे आले व कोकणी माणसाला वंचित ठेवून बाहेरच्या माणसांनी लाभ उठवला. कोकण विकास झाला असे म्हणता येणार नाही. कोकण विकास म्हणजे कोकणी माणसांचा विकास आणि असा विकास स्वतंत्र कोकण राज्यातच होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. कणकवली येथील वृक्षमित्र हॉलमध्ये स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीची सभा आयोजित केली होती. यावेळी नाटेकर बोलत होते. वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, मोतीराम गोठीवडेकर, संजय हंडोरे, सुरेश हाटे उपस्थित होते.नाटेकर म्हणाले की, आज ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या लोकांची होते. स्वतंत्र राज्य असल्यास गोव्याप्रमाणे १०० टक्के नोकरभरती कोक णी तरुणांचीच होईल. ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या बेरोजगारांची होत असल्याने कोकणातील एस.टी., एन.टी., ओ.बी.सी. आदी मागासवर्गीयांना याचा लाभ होत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले तरी या आरक्षणापासून कोकणातील मराठे वंचित राहणार. कोकणात औष्णिक, आण्विक इत्यादी विनाशकारी प्रकल्प कोकणात येऊ घातले आहेत. त्याच्या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत. तरी विनाशकारी प्र्रकल्प सुरूच आहेत. सुरूच राहणार! परराज्यातील मच्छिमार कोकणात येऊन कोकणी मच्छिमारांना उद्ध्वस्त करून माशांची लूट करत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पाठींब्यानेच हे सारे घडत आहे. केंद्र सरकार राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विनाशकारी प्रकल्प आणूच शकत नाही. हे प्रकल्प रोेखायचे असतील तर स्वतंत्र कोकण राज्यच पाहिजे. यावेळी वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, संजय हंडोरे यांनी भाषणे केली. सुरेश हांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)