शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

देवरूखजवळील ‘पांगरी’ ग्रामस्थांनी तंट्यांना केले हद्दपार!

By admin | Updated: January 2, 2015 00:10 IST

जिल्ह्यातील एकमेव गाव : गेल्या तीन वर्षात तंटेच नसल्यामुळे गावात समित्या नाहीत

मेहरुन नाकाडे- रत्नागिरी -देवरूखपासून अवघ्या १९ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी गावात गेल्या तीन वर्षांपासून तंटेच नसल्यामुळे येथे तंटामुक्त समितीची स्थापना झालेली नाही. किरकोळ किंवा अंतर्गत उद्भवणारे वाद सामोपचाराने गावपातळीवरच मिटविले जात असल्याने गावात समितीची स्थापना करण्यात आलेली नाही. न्यायालयीन प्रलंबित खटले निकाली काढून गावातील वाद तडजोडीने मिटवून गावात शांतता नांदावी, यासाठी तंटामुक्त अभियान सुरू झाले. या अभियानाच्या माध्यमातून आदर्श समाजनिर्मिती करून गावाची वाटचाल ‘शांततेकडून समृध्दीकडे होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकचळवळीवर आधारित असलेल्या या अभियानाला पांगरी गावातील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गावाची लोकसंख्या १२५७ इतकी असून, ४४७ घरे, तर १० वाड्या आहेत. तीन शाळा असून, दोन अंगणवाड्या व एक मिनी अंगणवाडी आहे. गावामध्ये शिमगा सण सार्वजनिक, तर गणेशोत्सव घरगुती स्वरूपात साजरा करण्यात येतो. गावामध्ये सुरूवातीच्या काळात ५ ते ७ दारूभट्ट्या होत्या. मात्र, दोन तरूणांचा ऐन उमेदीच्या काळात व्यसनामुळे झालेल्या निधनाचा बोध घेत गावाने महात्मा गांधी जयंतीदिवशी ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेतला. गेल्या २२ वर्षापासून गावात दारूबंदी आहे. शिवाय गुटखाबंदीसुध्दा करण्यात आली आहे. गावामध्ये १९६० साली ग्रामपंचायत अस्तित्त्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत गावातील सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत. लोकसभा, विधानसभा वा ग्रामपंचायतीची निवडणूक असो गावामध्ये राजकीय धुमश्चक्री होत नसल्यामुळे पोलीस प्रशासनावरही ताण येत नाही. सणासुदीच्या कालावधीतही खास पोलीस बंदोबस्त मागवण्याची आवश्यकता भासत नाही. तीन वर्षे तंटेच नाहीत! कोणतेही सार्वजनिक कार्य असो वा वैयक्तिक, ग्रामस्थ सहभागी होत असल्याने गावामध्ये शांतता आहे. गावामध्ये जमिनीचे काही दावे होते. मात्र, सामोपचाराने ते मिटविले आहेत. गेल्या तीन वर्षात तंटेच उद्भवत नसल्यामुळे गावामध्ये तंटामुक्त समितीची स्थापना केलेली नाही. आतापर्यंत सर्वच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. - रामचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, तंटामुक्त समिती, पांगरी. गावात शंभर टक्के दारूबंदी गावात शंभर टक्के दारूबंदी, गुटखाबंदी राबविण्यात येत आहे. व्यसनामुळे होणारे परिणाम लक्षात घेता गावच्या हितार्थ निर्णय घेण्यात आला. गावातील दारूभट्ट्या बंद केल्या आहेत. ग्रामस्थ एकत्र येऊन सामोपचाराने उद्भवणारे वाद मिटवित असल्यामुळे गावात शांतता आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या तीन वर्षात तंटेच निर्माण झालेले नाहीत. - जयवंत रामचंद्र मुळ्ये, पोलीसपाटील. पोलीस प्रशासनाशिवाय उत्सव कोकणात शिमगा व गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. गणेशोत्सव घरगुती असला तरी शिमगा मात्र सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येतो. परंतु दोन्ही सण शांततेत साजरे करण्यात येत असल्यामुळे पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता भासत नाही. आतापर्यंत सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. - राजश्री पानगले, सरपंच, पांगरी. शांततेचे श्रेय ग्रामस्थांना तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन घेतलेल्या निर्णयामुळे येथील अंतर्गत वाद संपुष्टात आले आहेत. त्यामुळे शांतता हेच गावाचे वैशिष्ट्य आहे. शासकीय उपक्रमातही ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे कोणत्याही उपक्रमांची अंमलबजावणी करणे सोपे होते. - सारिका पवार, ग्रामसेविका, ग्रामपंचायत पांगरी.