शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

भातशेती पाण्याखाली

By admin | Updated: July 31, 2014 23:20 IST

पावसाचा फटका : शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी नुकसानी

चौके : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी, धामापूर, काळसे गावांना बसला असून या गावांतील सुमारे १५० एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे कर्ली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे त्या नदीकाठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, गुरुवारी पावसाचा काहीशा जोर ओसरला असला तरी भातशेतीतील पाणी तसेच होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.मालवण तालुक्यातील या तिन्ही गावांना जोडणारी कर्ली नदीचे पात्र छोटे असल्याने या नदीचे पाणी आजूबाजूच्या भात शेतीत घुसते. प्रत्येक वर्षी या भागातील शेतकऱ्यांना हा फटका सहन कराला लागतो. यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.या भातशेतीमध्ये घुसलेले पाणी वेळीच न ओसरल्यास भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाया जाऊन त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गुरूवारी पहाटे धामापूर भगवती मंदिरानजिक रस्त्याशेजारी दरडीचा काही भाग कोसळला, परंतु त्यामुळे हानी झाली नाही. रस्त्यावर आलेले दगड स्थानिक ग्रामस्थांनी बाजूला केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही. परंतु, दिवसभर विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत होता. त्याचा त्रास ग्रामस्थांना दिवसभर सहन करावा लागला. (वार्ताहर)