शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
2
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
3
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
4
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
5
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...
6
घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर
7
Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’
8
१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा
9
मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
10
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
11
उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
12
'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन
13
आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!
14
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
15
...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका
16
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
17
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
18
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
19
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
20
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

भातशेती पाण्याखाली

By admin | Updated: July 31, 2014 23:20 IST

पावसाचा फटका : शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी नुकसानी

चौके : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी, धामापूर, काळसे गावांना बसला असून या गावांतील सुमारे १५० एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे कर्ली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे त्या नदीकाठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, गुरुवारी पावसाचा काहीशा जोर ओसरला असला तरी भातशेतीतील पाणी तसेच होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.मालवण तालुक्यातील या तिन्ही गावांना जोडणारी कर्ली नदीचे पात्र छोटे असल्याने या नदीचे पाणी आजूबाजूच्या भात शेतीत घुसते. प्रत्येक वर्षी या भागातील शेतकऱ्यांना हा फटका सहन कराला लागतो. यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.या भातशेतीमध्ये घुसलेले पाणी वेळीच न ओसरल्यास भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाया जाऊन त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गुरूवारी पहाटे धामापूर भगवती मंदिरानजिक रस्त्याशेजारी दरडीचा काही भाग कोसळला, परंतु त्यामुळे हानी झाली नाही. रस्त्यावर आलेले दगड स्थानिक ग्रामस्थांनी बाजूला केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही. परंतु, दिवसभर विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत होता. त्याचा त्रास ग्रामस्थांना दिवसभर सहन करावा लागला. (वार्ताहर)