शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भातशेती पाण्याखाली

By admin | Updated: July 31, 2014 23:20 IST

पावसाचा फटका : शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी नुकसानी

चौके : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी, धामापूर, काळसे गावांना बसला असून या गावांतील सुमारे १५० एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे कर्ली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे त्या नदीकाठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, गुरुवारी पावसाचा काहीशा जोर ओसरला असला तरी भातशेतीतील पाणी तसेच होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.मालवण तालुक्यातील या तिन्ही गावांना जोडणारी कर्ली नदीचे पात्र छोटे असल्याने या नदीचे पाणी आजूबाजूच्या भात शेतीत घुसते. प्रत्येक वर्षी या भागातील शेतकऱ्यांना हा फटका सहन कराला लागतो. यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.या भातशेतीमध्ये घुसलेले पाणी वेळीच न ओसरल्यास भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाया जाऊन त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गुरूवारी पहाटे धामापूर भगवती मंदिरानजिक रस्त्याशेजारी दरडीचा काही भाग कोसळला, परंतु त्यामुळे हानी झाली नाही. रस्त्यावर आलेले दगड स्थानिक ग्रामस्थांनी बाजूला केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही. परंतु, दिवसभर विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत होता. त्याचा त्रास ग्रामस्थांना दिवसभर सहन करावा लागला. (वार्ताहर)