शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

परवडत नसल्याने केवळ ७६ प्रस्ताव

By admin | Updated: March 25, 2017 21:41 IST

ठिबक सिंचन योजना : कोरडवाहू शेतीमुळे खर्च आवाक्याबाहेर; अकरा लाख अनुदान

मेहरून नाकाडे-- रत्नागिरी  --पावसाळ्यानंतरच्या प्रखर ऊन्हात कलमे जगविण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नव्हते. अशावेळी शासनाकडून ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. गतवर्षीपासून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. यावर्षी या योजनेंतर्गत ७६ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली असून, ११ लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. परंतु, कोरडवाहू शेतीमुळे ठिबक सिंचनचा खर्च परवडेनासा झाला आहे. पाणवठ्याजवळ असणाऱ्या बागांना पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मात्र, पाण्याअभावी कातळावरील लागवडीचा प्रश्न होता. ही झाडे जगत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आर्थिक डोलारा पेलून शेतकऱ्यांनी बागांची निर्मिती केल्यानंतर या बागांना पाणीच मिळत नसल्याने नुकसानाला सामोरे जावे लागत होते. त्यावर शासनाने मार्ग काढून विहीर असलेल्या फळबागांसाठी ठिबक, तुषार सिंचन योजना अनुदानावर उपलब्ध करून दिली. गतवर्षीपासूून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. गतवर्षी आॅनलाईनद्वारे अर्ज सादर करण्यासाठी केवळ एक महिना वेळ देण्यात आली होती. त्यासाठी दि. ६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या काळात आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात होते. मात्र, शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करणे जमले नाही. शिवाय एक महिनाच वेळ असल्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातून एकही अर्ज या योजनेसाठी आला नव्हता. यावर्षी मात्र आॅनलाईनद्वारे ७६ अर्ज शेतकऱ्यांनी पाठवल्यामुळे त्यांना मान्यता देण्यात आली. यासाठी ११ लाख रूपयांचे अनुदानही शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले.मात्र, डोंगरउताराच्या जागेमुळे विहिरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अंतर जास्त असल्याने पाणी नेण्यासाठी पाईपचा खर्चही वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांचा या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. डोंगराळ भागात ठिबक सिंचन बसवणे फायदेशीर असले, तरी डोंगराळ भागात यासाठी अतिरिक्त खर्च होत असल्याने तो परवडत नाही. या योजनेंतर्गत सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व महिला शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. मात्र, ठिबक यंत्रणा बसविण्याचे प्रमाण ठरलेले असल्याने ही बाब अधिक खर्चिक बनली आहे. नारळ, आंबा, काजू आदी फळबागा तसेच याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या आंतरपिकाला ठिबक पध्दतीने पाणी देणे सोपे होते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. सध्या पावसाळ्यानंतरही भाजीपाला तसेच फळभाज्यांची शेती केली जाते. बागायतीमधूनही आंतरपीक घेतल्याने ठिबक योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.फलोत्पादन जिल्हा : डोंगरासह, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडरत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर येथील फळबाग लागवडीस चालना मिळाली. येथील डोंगरावर, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करण्यात आली. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा हा डोंगरदऱ्यांतून विभागलेला आहे. डोंगरउताराची जागा असल्याने या जागेची निगा राखण्यासाठी भरपूर खर्च असल्याने बँकेचे अर्थसहाय्य घेऊन शासनाच्या विविध अनुदानांचा लाभ घेत कलमबागा विकसित केल्या जातात. यामध्ये रस्त्यालगत, पाणवठ्यालगत असलेल्या क्षेत्रांना पाण्याची समस्या उद्भवली नाही. मात्र, कातळावरील बागांसाठी ठिबक सिंचन योजना अंमलात आणण्यात आली.