शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

परवडत नसल्याने केवळ ७६ प्रस्ताव

By admin | Updated: March 25, 2017 21:41 IST

ठिबक सिंचन योजना : कोरडवाहू शेतीमुळे खर्च आवाक्याबाहेर; अकरा लाख अनुदान

मेहरून नाकाडे-- रत्नागिरी  --पावसाळ्यानंतरच्या प्रखर ऊन्हात कलमे जगविण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नव्हते. अशावेळी शासनाकडून ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. गतवर्षीपासून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. यावर्षी या योजनेंतर्गत ७६ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली असून, ११ लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. परंतु, कोरडवाहू शेतीमुळे ठिबक सिंचनचा खर्च परवडेनासा झाला आहे. पाणवठ्याजवळ असणाऱ्या बागांना पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मात्र, पाण्याअभावी कातळावरील लागवडीचा प्रश्न होता. ही झाडे जगत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आर्थिक डोलारा पेलून शेतकऱ्यांनी बागांची निर्मिती केल्यानंतर या बागांना पाणीच मिळत नसल्याने नुकसानाला सामोरे जावे लागत होते. त्यावर शासनाने मार्ग काढून विहीर असलेल्या फळबागांसाठी ठिबक, तुषार सिंचन योजना अनुदानावर उपलब्ध करून दिली. गतवर्षीपासूून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. गतवर्षी आॅनलाईनद्वारे अर्ज सादर करण्यासाठी केवळ एक महिना वेळ देण्यात आली होती. त्यासाठी दि. ६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या काळात आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात होते. मात्र, शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करणे जमले नाही. शिवाय एक महिनाच वेळ असल्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातून एकही अर्ज या योजनेसाठी आला नव्हता. यावर्षी मात्र आॅनलाईनद्वारे ७६ अर्ज शेतकऱ्यांनी पाठवल्यामुळे त्यांना मान्यता देण्यात आली. यासाठी ११ लाख रूपयांचे अनुदानही शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले.मात्र, डोंगरउताराच्या जागेमुळे विहिरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अंतर जास्त असल्याने पाणी नेण्यासाठी पाईपचा खर्चही वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांचा या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. डोंगराळ भागात ठिबक सिंचन बसवणे फायदेशीर असले, तरी डोंगराळ भागात यासाठी अतिरिक्त खर्च होत असल्याने तो परवडत नाही. या योजनेंतर्गत सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व महिला शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. मात्र, ठिबक यंत्रणा बसविण्याचे प्रमाण ठरलेले असल्याने ही बाब अधिक खर्चिक बनली आहे. नारळ, आंबा, काजू आदी फळबागा तसेच याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या आंतरपिकाला ठिबक पध्दतीने पाणी देणे सोपे होते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. सध्या पावसाळ्यानंतरही भाजीपाला तसेच फळभाज्यांची शेती केली जाते. बागायतीमधूनही आंतरपीक घेतल्याने ठिबक योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.फलोत्पादन जिल्हा : डोंगरासह, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडरत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर येथील फळबाग लागवडीस चालना मिळाली. येथील डोंगरावर, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करण्यात आली. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा हा डोंगरदऱ्यांतून विभागलेला आहे. डोंगरउताराची जागा असल्याने या जागेची निगा राखण्यासाठी भरपूर खर्च असल्याने बँकेचे अर्थसहाय्य घेऊन शासनाच्या विविध अनुदानांचा लाभ घेत कलमबागा विकसित केल्या जातात. यामध्ये रस्त्यालगत, पाणवठ्यालगत असलेल्या क्षेत्रांना पाण्याची समस्या उद्भवली नाही. मात्र, कातळावरील बागांसाठी ठिबक सिंचन योजना अंमलात आणण्यात आली.