शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हानीचा आकडा तीन कोटींच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 00:17 IST

नैसर्गिक आपत्तीत दोघांचा मृत्यू : २४२ घरे, २५ गोठ्यांची पडझड, मदत मात्र तुटपुंजी

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ३ कोटी १५ लाख एवढ्या नुकसानीसह दोन व्यक्ती मृत झाल्याचे प्रशासनाकडे नोंद झाली आहे. नुकसानीमध्ये २४२ घरांची तर २५ गोठ्यांची पडझड झाली आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत १२ लाख ५ हजार रुपयांची मदत संंबंधितांना करण्यात आली आहे. नुकसानीचा आकडा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमालीचा पाऊस पडतो. पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी कोट्यवधीची नुकसानी होत असते. तसेच मनुष्यहानी देखील होते. शासकीय निकषात बसणाऱ्या नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून मदतही दिली जाते. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रशासनाला नेहमी सतर्क रहावे लागते. कधी कुठे काही आपत्ती उद्भवेल याचा काही नेम नसतो. ८ जूनपासून सिंधुदुर्गात मान्सूनला सुरुवात झाली. पेरणीयोग्य पुरेसा पाऊस सुरुवातीला पडला. नंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. या दरम्यानपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शासकीय व खासगी मालमत्तेचे ५ ते ६ लाखांपर्यंत नुकसान झाले होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरात पडलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत करून टाकले. यात घरांची पडझड, गोठ्यांचे नुकसान, वीज खांब उन्मळून पडणे, झाडे विद्युत तारांवर उन्मळून पडणे यामुळे अद्यापपर्यंत ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे. २४२ घरांची पडझड; ३ कोटी ३ लाख नुकसानीजिल्ह्यात २४२ घरांची पडझड झाली असून त्याचे एकूण ३ कोटी ३ लाख ५० हजार ३०६ रुपये एवढे नुकसान झाले आहे. झालेल्या एकूण नुकसानीत घरांची पडझड होऊन झालेली नुकसानी ही जास्त आहे. वादळी वाऱ्यांचा फटका याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.प्रथमच एवढी मोठी नुकसानी?जूनच्या एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत तब्बल ३ कोटी १५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही जाणकारांच्या मते गेल्या पाच ते सहा वर्षात एका महिन्यात एवढी मोठी नुकसानी आपण बघितली नसल्याचे त्यांनी सांगितले. १२ लाख, ५ हजारांची नुकसान भरपाईनैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या तुलनेत नुकसान भरपाई मात्र १२ लाख ५ हजार ३३ रुपये एवढी करण्यात आली आहे. यात वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या गावडे व वरक यांच्या नातेवाईकांना शासनामार्फत ५ लाख ५० हजार एवढी मदत देण्यात आली आहे. तर घराची पडझड झालेल्या ९५ जणांना २ लाख ५० हजार ८०३ रुपये तर गोठ्यांची पडझड झालेल्या १० जणांना २३ हजार रुपये अशी मदत देण्यात आली आहे. या दरम्यान २ जनावरे मृत झाल्याने त्यांच्या मालकांना ४० हजार रुपये एवढी मदत देण्यात आली आहे.