शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

हानीचा आकडा तीन कोटींच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 00:17 IST

नैसर्गिक आपत्तीत दोघांचा मृत्यू : २४२ घरे, २५ गोठ्यांची पडझड, मदत मात्र तुटपुंजी

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ३ कोटी १५ लाख एवढ्या नुकसानीसह दोन व्यक्ती मृत झाल्याचे प्रशासनाकडे नोंद झाली आहे. नुकसानीमध्ये २४२ घरांची तर २५ गोठ्यांची पडझड झाली आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत १२ लाख ५ हजार रुपयांची मदत संंबंधितांना करण्यात आली आहे. नुकसानीचा आकडा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमालीचा पाऊस पडतो. पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी कोट्यवधीची नुकसानी होत असते. तसेच मनुष्यहानी देखील होते. शासकीय निकषात बसणाऱ्या नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून मदतही दिली जाते. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रशासनाला नेहमी सतर्क रहावे लागते. कधी कुठे काही आपत्ती उद्भवेल याचा काही नेम नसतो. ८ जूनपासून सिंधुदुर्गात मान्सूनला सुरुवात झाली. पेरणीयोग्य पुरेसा पाऊस सुरुवातीला पडला. नंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. या दरम्यानपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शासकीय व खासगी मालमत्तेचे ५ ते ६ लाखांपर्यंत नुकसान झाले होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरात पडलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत करून टाकले. यात घरांची पडझड, गोठ्यांचे नुकसान, वीज खांब उन्मळून पडणे, झाडे विद्युत तारांवर उन्मळून पडणे यामुळे अद्यापपर्यंत ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे. २४२ घरांची पडझड; ३ कोटी ३ लाख नुकसानीजिल्ह्यात २४२ घरांची पडझड झाली असून त्याचे एकूण ३ कोटी ३ लाख ५० हजार ३०६ रुपये एवढे नुकसान झाले आहे. झालेल्या एकूण नुकसानीत घरांची पडझड होऊन झालेली नुकसानी ही जास्त आहे. वादळी वाऱ्यांचा फटका याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.प्रथमच एवढी मोठी नुकसानी?जूनच्या एका महिन्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत तब्बल ३ कोटी १५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही जाणकारांच्या मते गेल्या पाच ते सहा वर्षात एका महिन्यात एवढी मोठी नुकसानी आपण बघितली नसल्याचे त्यांनी सांगितले. १२ लाख, ५ हजारांची नुकसान भरपाईनैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात ३ कोटी १५ लाख ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या तुलनेत नुकसान भरपाई मात्र १२ लाख ५ हजार ३३ रुपये एवढी करण्यात आली आहे. यात वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या गावडे व वरक यांच्या नातेवाईकांना शासनामार्फत ५ लाख ५० हजार एवढी मदत देण्यात आली आहे. तर घराची पडझड झालेल्या ९५ जणांना २ लाख ५० हजार ८०३ रुपये तर गोठ्यांची पडझड झालेल्या १० जणांना २३ हजार रुपये अशी मदत देण्यात आली आहे. या दरम्यान २ जनावरे मृत झाल्याने त्यांच्या मालकांना ४० हजार रुपये एवढी मदत देण्यात आली आहे.