शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडींची संख्या घटतेय

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

वनविभागाने दखल घ्यावी : शिकारीला आळा घालण्याची गरज

सुरेश बागवे - कडावल -मुळातच दुर्मीळ असलेल्या घोरपडींची संख्या शिकारीमुळे दिवसेंदिवस अधिकच घटत आहे. शिकारीचे प्रमाण कमी झाले नाही तर या प्रजातीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे. घोरपडींचे अस्तित्व वाचविण्यासाठी वाढत्या शिकारीला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. याबाबत वनविभागाने दखल घेण्याची गरज आहे. घोरपडीचे मांस चविष्ट म्हणून तर प्रसिद्ध आहेच, शिवाय ते औषधीही मानले जाते. त्यामुळे या प्राण्याच्या शिकारीचेही प्रमाण अधिक आहे. सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये आणि डोंगर दऱ्यांमधील बिळांमध्ये वास्तव्य करणारी ही प्रजाती मुळातच अतिशय दुर्मीळ आहे. शिकार तसेच अन्य कारणांमुळे घोरपडींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. पुढील काळात शिकारीचे प्रमाण असेच राहिल्यास प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. घोरपडींची शिकार करण्याची एक पद्धत पूर्वापारपासून प्रचलित आहे. घोरपडी प्रामुख्याने बिळांमध्ये वास्तव्य करतात. शिकारी लोक सायंकाळच्यावेळी बिळांच्या तोंडावर खुणेसाठी बोटभर लांबीच्या लहान काट्या लावतात. दुसऱ्या दिवशी पाहणी करून लावलेल्या काठ्या कुठच्या दिशेला पडल्या आहेत, यावरून घोरपड बिळात आहे की बाहेर, याचा अंदाज घेतला जातो. हा अंदाज परिपूर्ण होण्यासाठी शिकारी व्यक्तीचा अनुभव व तर्क तेवढाच महत्त्वाचा असतो. घोरपड बिळातच आहे, याची खात्री पटल्यास बिळाच्या तोंडावर आगीचा जाळ केला जातो. धूर आत गेल्यानंतर कासाविस झालेली घोरपड धडपडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बिळाच्या तोंडावरच तिला अलगद पकडले जाते. काहीवेळा धुरामुळे गुदमरून घोरपड बिळातच मृत होते. अशावेळी बिळ खोदून तिला बाहेर काढले जाते. सध्या सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात चरण्यासाठी घोरपडी आपला अधिवास सोडून माळरानावर येत आहेत. घोरपडीची चरण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. तिला स्थानिक ‘चरल’ असे म्हटले जाते. चाणाक्ष शिकाऱ्यांच्या लक्षात घोरपडीची ‘चरल’ आल्यानंतर ‘डाव’ टाकून तिला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. एखाद्या ठिकाणी घोरपड चरून गेली की, अनुभवी शिकाऱ्यांच्या ते सहज लक्षात येते. त्याअर्थी तिचा अधिवास जवळच असणार व ती उद्या येथे पुन्हा चरण्यासाठी येणार, हे पक्के हेरू न शिकारीसाठी फिल्डिंग लावली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळे ऊन पडल्यानंतर दोन-चार कु त्रे घेऊन शिकारी लोक तिचा माग काढतात. मनसोक्त चरत असलेली घोरपड दृष्टीस पडली की, कुत्रे तिला चारही बाजूंनी घेरतात व अलगदपणे टिपतात. अशा रीतीने आपला अधिवास सोडून चरण्यासाठी आलेल्या घोरपडींना जीव गमवावा लागतो. कोवळे ऊन त्यांच्या जीवावर बेतते. घोरपडीची शेपूट अतिशय विषारी असल्याचे मानले जाते. तिने आपल्या शेपटीचा प्रहार माणसाच्या बेंबीवर केल्यास तो तत्काळ गतप्राण होतो, असा समज ग्रामीण भागात असल्याने घोरपड पकडल्यानंतर प्रथम तिची शेपूट कापली जाते. माणसाच्या मोहाला आवर घालामुळातच दुर्मीळ असलेल्या घोरपडींची संख्या शिकारीमुळे दिवसेंदिवस अधिकच घटत आहे. त्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले नाही, तर या प्रजातीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. घोरपड या एका प्रजातीचे अस्तित्व पृथ्वीतलावरून नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. या पातकापासून माणसाला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला घोरपडीच्या शिकारीच्या मोहाला आवर घालावाच लागेल. यासाठी आता प्राणीमित्रांबरोबरच सजग नागरिकांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे.