शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लक्षवेधी शोधमोहीम...लक्ष्य नसलेली... अंत नसलेली!

By admin | Updated: August 7, 2016 01:01 IST

महाड दुर्घटना : निश्चित आकडेवारीच नाही, मध्यरात्रीच्या दुर्घटनेमुळे ‘बेपत्तां’चे आकडे अधांतरी

विहार तेंडुलकर -- रत्नागिरी --महाड येथील दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध चौथ्या दिवशीही सुरुच आहे. अद्यापही अनेक लोक बेपत्ता आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने किती वाहने आणि किती लोक बेपत्ता झाले आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही. प्रशासनाकडे असलेल्या बेपत्ता लोकांच्या यादीवरून ढोबळ मनाने ४८ लोक या दुर्घटनेत बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. २००९ साली झालेल्या फयान वादळानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेतही अशीच स्थिती उद्भवली होती. त्यामुळे महाडचे रेस्क्यू आॅपरेशन कोणतेही ‘लक्ष्य’ नसल्यामुळे कधी थांबवणार? याबाबत अजूनही द्विधाच स्थिती आहे.महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याला आता चार दिवस उलटले आहेत. आत्तापर्यंत केवळ २५ मृतदेह सापडले आहेत. उर्वरितांचा शोध सुरु आहे. रेस्क्यू आॅपरेशनसाठी आलेल्या सर्व टीम या महाड परिसरातच शोध मोहीम राबवत आहे. दुसरीकडे मंडणगड, दापोली परिसरातील किनारपट्टीच्या गावांना शोध मोहिमेबाबत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सध्याच्या घडीला या दुर्घटनेत एकूण ४८ लोक बेपत्ता झाल्याची प्रशासनाकडे माहिती आहे. त्यापैकी २५ जणांचे मृतदेह शनिवारी सायंकाळपर्यंत मिळाले आहेत. उर्वरितांचा शोध सुरु आहे. मात्र, या दुर्घटनेत आणखी एक कार गायब झाल्याची माहिती शुक्रवारी हाती आली. त्यामुळे आत्तापर्यंत नेमकी किती वाहने या दुर्घटनेची शिकार झाली, त्याचा केवळ अंदाज बांधणेच प्रशासनाच्या हाती आहे.नेमकी रात्रीची घटना घडल्याने किती वाहने या पुराच्या पाण्यात वाहून गेली, याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. मंडणगडमध्ये मृतदेह सापडू लागल्यानंतर याठिकाणी शनिवारी एक टीम दाखल झाली तर एनसीआरएफच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. मात्र, केवळ स्थानिक लोकच मृतदेह गोळा करण्याचे काम करत आहेत. या साऱ्या गडबडीत आणखी किती काळ रेस्क्यू आॅपरेशन चालणार आणि किती जणांचा शोध घेतला जाणार? याबाबत शासनाकडून अजूनतरी उत्तर नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या दोन बस, तवेरा गाडी यांचा शोध लागल्यावर हे आॅपरेशन थांबविण्यात येणार असल्याची माहिती सध्यातरी मिळत आहे.फयान अन् महाडची दुर्र्घटना३६ वर्षानंतर नोव्हेंबर २००९मध्ये झालेल्या फयानसारख्या चक्रीवादळात अनेक मच्छीमार बेपत्ता झाले होते. या चक्रीवादळात २६ खलाशी मृत पावल्याचा आकडा होता. वादळाच्या कचाट्यात ३२ नौका सापडल्या होत्या. त्यापैकी केवळ तीन नौका किनारी परतल्या. उर्वरित नौकांची मोडतोड झाली, काही फुटल्या. २३० खलाशांना याचा फटका बसला. त्यातील ३९ खलाशी अनेक महिने झाले तरी बेपत्ताच होते. १६५ खलाशी सुखरुप होते तर २६ मृत झाले. प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रारींवरुन हा आकडा कमीजास्त होत होता. महाड येथील दुर्घटनेतही कुणी बेपत्ता झाल्याची खबर आल्यानंतर प्रशासनाकडील आकडेवारी ‘अपडेट’ होत आहे.अजूनही तर्कवितर्कचही घटना घडल्यानंतर तब्बल पाऊण तासांनी ती उघडकीस आली असावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पाऊण तासात अनेक वाहने या दुर्घटनेत बेपत्ता झालेली असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्षात कितीजण बेपत्ता झाले, याबाबत अजूनही तर्कवितर्कच लढविले जात आहेत.