शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

नीलेश राणेंच्याच हाती सूत्र द्यालक्ष्मण खेतले :

By admin | Updated: December 26, 2015 00:01 IST

जिल्हा कॉँग्रेस वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात कॉँग्रेसच्या संघटना वाढीला माजी खासदार नीलेश राणे हेच योग्य न्याय देऊ शकतात. दांडगा संपर्क आणि त्यांच्यामागे असलेली युवक कार्यकर्त्यांची फळी या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यात कॉँग्रेस पुन्हा मजबूत होऊ शकते. मात्र, त्यासाठी जिल्हाध्यक्षपदाची धुरा नीलेश राणे यांच्याकडे देणे गरजेचे आहे. याबाबतचा निर्णय घेतल्यास कॉँग्रेसला सुगीचे दिवस येतील. त्यामुळे जिल्ह्यात कॉँग्रेस वाढवायची असेल तर माजी खासदार नीलेश राणे यांच्या हाती सूत्र द्या, अशी मागणी कॉँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण खेतले यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.माजी खासदार नीलेश राणे हेच रत्नागिरी जिल्ह्यात कॉँग्रेस संघटना बांधणीसाठी सक्षम नेतृत्व आहे. गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा कॉँग्रेस सक्षम नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात कॉँग्रेस पक्ष आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याचे अस्तित्व दिसून येत नाही. प्रांतिकच्या नेत्यांनीदेखील रत्नागिरी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठीच सबळ नेतृत्वाची गरज आहे. माजी खासदार नीलेश राणे यांना जिल्हाध्यक्षपद दिल्यास जिल्ह्यात कॉँग्रेस भरारी घेऊ शकते. कारण त्यांच्याकडे सामाजिक, राजकीय, सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिकरण अशा सर्वच क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाची जबाबदारी दिल्यास पक्षाला चांगले दिवस येतील. यावर पक्षश्रेष्ठींची गंभीर विचार करायला हवा.याआधी रत्नागिरी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पी. के. सावंत, श्यामराव पेजे, केशवराव राणे, भाई सावंत, टी. के. शेट्ये, लक्ष्मणराव हातणकर आणि माजी खासदार गोविंदराव निकम अशा उत्तुंग व्यक्तींनी भूषवले आहे. नीलेश राणे हेदेखील माजी खासदार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या नेतृत्वाची सूत्रे भविष्यात त्यांच्याकडेच द्यायला हवीत. गेल्या निवडणुकीत त्यांनी मोठी मते घेतली आहेत. सर्वदृष्टीने एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सातत्याने जिल्ह्याशी असणारा त्यांचा संपर्क, त्यांच्यामागे असणारी युवकांची फळी आणि प्रत्येक तालुक्यातील संघटनेशी त्यांचा असणारा संपर्क या जोरावर ते कॉँग्रेसचे संघटन चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतील आणि जिल्ह्यात कॉँग्रेस जोमाने काम करु शकेल. जिल्ह्यातील कॉँगे्रस कार्यकर्त्यांचे माजी खासदार नीलेश राणे हे स्फूर्तीस्थान आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीची निवड झाल्यास जिल्ह्यात कॉँग्रेस नव्याने भरारी घेईल. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे त्यांच्याकडे कौशल्य आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्ते आहेत. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कॉँग्रेस संघटनेबरोबरच राज्यातदेखील ते कॉँग्रेस उभी करू शकतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे नीलेश राणे यांच्या हातात जिल्हा कॉँग्रेसची सूत्र दिल्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आत्मविश्वास व काम करण्यास उर्जा मिळेल, असा विश्वास खेतले यांनी व्यक्त केला आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)दांडगा संपर्क, मागे युवक कार्यकर्त्यांची फळी.जिल्हाध्यक्षपदाची धुरा नीलेश राणेंकडे देणे गरजेचे.जिल्हा काँग्रेस सक्षम नेतृत्वाच्या प्रतीक्षेत.कार्यकर्त्यांना आत्मविश्वास, काम करण्याची ऊर्जा मिळेल.