शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

नमो गुरूजींच्या तासांमुळे शिक्षकांची होणार धावपळ

By admin | Updated: September 4, 2014 23:20 IST

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विविध माध्यमाव्दारे थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विविध माध्यमाव्दारे थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्र पाठवून ३ हजार ६६० शाळेतील शिक्षकांना दुपारी ३ ते ३.४५ या वेळेत शाळेत हजर राहत रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून मोदी यांचे भाषण ऐकविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांची चांगलीच धावपळ होणार आहे. दरवर्षी पाच सप्टेंबरला जिल्हा परिषदेचा शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम होत असतो. याच दिवशी गावागावात शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडत असतो. या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत असते. मात्र, यंदा दुपारच्या सत्रात पंतप्रधान मोदी एकाच वेळी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याने शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सकाळी नगरजवळ होणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षकांना थेट नेमणुकीची शाळा गाठावी लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवावे लागणार आहे. हा कार्यक्रम सक्तीचा नसला तरी त्याचा अहवाल शिक्षण विभाग जमा करणार आहे. यामुळे शिक्षकांना शाळेत उपस्थित रहावेच लागणार आहे.जिल्ह्यात ३ हजार ६६० शाळा आहेत. या पैकी बहुतांशी काळात टिव्ही अथवा संगणक सुविधा उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी ही सुविधा नाही, त्या ठिकाणी रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)