शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संगीत तानसेनने केली घोर निराशा

By admin | Updated: January 23, 2015 23:34 IST

स्पर्धेतले नाटक : संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य आघाड्यांवर कमी

५४व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत धन्य ते गायनी कळा’ हे सादर झालेले सहावे नाटक. हे नाटक मन्वंतर कला मंडळ, वसई या संस्थेने सादर केले.नाटकाची सुरुवात ‘सरस्वती माते वंदन तुजला’ या नांदीने झाली. नांदीपासूनच नाटक खाली घसरु लागले.दशरथ राऊत (तानसेन) हे तानसेनाच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकले नाहीत. ‘सं. धन्य ते गायनी कळा’ हे नाटक म्हणजे संगीत सम्राट तानसेनाच्या जीवनावर आधारलेली कथा.दशरथ राऊत (तानसेन) हे त्यांच्या वयाचा विचार करता ज्येष्ठ नागरिक असावेत, असे वाटले. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात तानसेनाचा रुबाब दिसला नाही. तानसेन रचित ज्या चीजा नाटकात होत्या, त्या वेगवेगळ्या तालात बांधलेल्या होत्या. ते ताल सांभाळताना, दशरथ राऊत (तानसेन) बऱ्याचदा रागविस्तारात अडकत होते. तालावर प्रभूत्व दिसले नाही. बऱ्याचशा चीजा, आड लयीत, वेगवेगळ्या मात्रात उठणाऱ्या होत्या. पण ताल सांभाळताना त्यांची चूक होत होती.पल्लवी नेरकर (पूर्णा) यासुद्धा अभिनयात कमी पडल्या. चीजा गाण्याचा प्रयत्न चांगला होता. पण गळ्यातून तान चांगली जात नव्हती.मंजिरी म्हसकर (रुपवती) यांनी आपली भूमिका सुंदर साकार केली. इतर कलाकारांनी आपल्या परीने भूमिका वठविण्याचा प्रयत्न केला. पण, तो फारसा यशस्वी झाला नाही.‘धन्य ते गायनी कळा’ हे नाटकाचे नाव. परंतु एकाचेही गाणे धन्य करणारे नव्हते. नेपथ्य सुंदर होते. प्रकाश योजनेत गोंधळ होत होता. वेशभूषा, रंगभूषा आकर्षक वाटले. कॉलर माईक कुठे लावावे याचे भान ठेवले नाही.प्रमुख भूमिका पडल्यामुळे बाकीची पात्रही आपला प्रभाव पाडू शकली नाहीत. दशरथ राऊत (तानसेन) दुसऱ्या अंकाच्या शेवटी मुलतानी रागाच्या तराण्याने शब्द विसरल्यामुळे तो तराणा आॅर्गनवर वाजवून दाखवण्यात आला व नंतर त्यांनी तो गायला. ही गोष्ट खूपच दुर्दैवी होती. संगीत साथ ठीक होते. पार्श्वसंगीत मात्र फारसे आकर्षक वाटले नाही.या नाटकाने रसिकांची घोर निराशा झाली. याचे कारण म्हणजे दिग्दर्शनसुद्धा कमी पडले. हृदयनाथ कडू (दिग्दर्शक) यांनी नाटक उभारण्याकडे फारसे लक्ष दिलेले नसल्याचे जाणवले.आपण स्पर्धेत उतरत आहोत, याचा विचार कोणीच केलेला नसावा, असे वाटले. वसई (मुंंबई) कडील भागातून असे नाटक सादर होईल, असे वाटले नव्हते. सर्वच आघाड्यांवर नाटक बीनसल्यामुळे रसिकांना हे नाटक म्हणजे एक तालीम वाटली. या सर्व कलाकारांनी आपण संगीत नाटकात भूमिका करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे. हे भान मात्र या नाटकामध्ये कोठेही पाहायला मिळाले नाही. राज्य नाट्यस्पर्धासंध्या सुर्वे