शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

सासू-सून ओवासली एकाचवेळी

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

शिवापूर येथील प्रकार : बेळणेकर कुटुंबामध्ये दुर्मीळ क्षण

माणगाव : हिंदू संस्कृतीतील रितीरिवाजाप्रमाणे पहिल्याच वर्षी नवीन जोडपे गौरी गणपतीला ओवासणी करतात. वंश वेल वाढावी, या भावनेतून ही परंपरा फार वर्षांपासून चालत आली आहे. शिवापूर येथील बेळणेकर कुटुंबीय नोकरी धंद्यानिमित्त मुुंबईला स्थायिक झाले आणि सुरेखा बेळणेकर यांनी तब्बल ३५ वर्षांनंतर सुनेसोबत ओवासणी केली. सासू सुनेने एकाचवेळी ओवासणे, हा तसा दुर्मीळ मानला जाणारा क्षण असतो. प्रत्येक घराण्याच्या मूळ घरामध्ये गौरी पूजन करून त्या घराण्यातील सुहासिनी ओवासणे हा सौभाग्याचे लेणे म्हणून वाण वाटतात. आजकाल सुरू झालेल्या विभक्त कुटुंब पद्धतीला एकत्र आणणारा हा सण आहे. कुटुंबातील विभक्त झालेल्या परस्परांतील दुरावा कमी करण्याचे काम या सणामुळे होत आहे. शिवापूर येथील सुरेखा भगवान बेळणेकर यांचे १९८९ साली लग्न झाल्यानंतर काही कारणास्तव ओवासणे राहून गेले. त्यानंतर आज तब्बल ३५ वर्षांनी सुरेखा बेळणेकर यांनी सुनेसोबत ओवासण्याचा कार्यक्रम केला. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी ओवासणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर मुहूर्त काढावा लागतो. एखाद्या वेळीस मूल झाल्यास त्याला ओवासता येत नाही. दोन मुले झाल्यानंतर ओवासता येते, अशा प्रत्येक गावात विविध रुढी परंपरा आहेत. त्यांचे पालन आजही केले जाते. अशा रुढीपरंपरांमुळेच सुरेखा यांची राहिलेली ओवासणी सून शीतल उमेश बेळणेकर यांच्यासोबत धार्मिक वातावरणात पार पडली. सासू-सून एकाचवेळी ओवासण्याचा हा अपवादात्मक घडणारा प्रसंग आहे. (प्रतिनिधी)