शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जिल्हाभरात आणखी १०० शाळा धोकादायक

By admin | Updated: January 4, 2016 00:44 IST

जिल्हा परिषद : ३१ शाळांना मिळणार वर्गखोल्या

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १३१ प्राथमिक शाळा मोडकळीस आल्या असून, त्या धोकादायक स्थितीत आहेत. मोडकळीस आलेल्या शाळांपैकी ३१ शाळांच्या निर्लेखनानंतर त्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन वर्गखोल्याही मंजूर करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या १३१ इमारतींची स्थिती धोकादायक असून त्या कधीही कोसळतील, अशा अवस्थेत आहेत़ या शाळा कोसळून मोठी प्राणहानी होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ आतापर्यंत सर्वशिक्षा अभियानातून कोट्यवधी रुपये खर्चून शेकडो शाळांना नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, वर्गखोल्या बांधकामासाठी सर्वशिक्षा अभियानातून अनुदान देणे बंद झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा या जुन्या आहेत. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही शाळांत तर विद्यार्थी आणि शिक्षक जीव मुठीत धरून राहत आहेत.मोडकळीस आलेल्या १३१ शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आले होते़ यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या तालुक्यातून आलेले ४७ शाळांचे निर्लेखनाचे प्रस्ताव परिषद रत्नागिरी बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आले आहेत़. चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर या तालुक्यातील ८४ शाळांचे निर्लेखनाचे प्रस्ताव चिपळूण बांधकाम विभागाला निर्लेखनासाठी प्राप्त झाले होते. मोडकळीस आलेल्या ३१ प्राथमिक शाळांच्या इमारतींचे निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी काही शाळांचे निर्लेखनही करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित शाळांचे निर्लेखन कधी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. निर्लेखन मंजूर करण्यात आलेल्या शाळांसाठी वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून बांधकामांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित मोडकळीस आलेल्या १०० शाळांचे निर्लेखन करुन त्यांचे बांधकाम कधी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता जर या बांधकामाला सुरुवात झाली तर ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकते, असे म्हटले जात आहे. (शहर वार्ताहर)लक्ष द्यावे : शिक्षक-विद्यार्थ्यांचा जीव मुठीतशासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, विद्यार्थी जेथे शिक्षणाचे धडे घेत आहेत, त्याच इमारतींची दुरवस्था झाल्याने विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत धरुन शाळेत बसतात. त्यामुळे शासनाने मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष देऊन भविष्यात होणारी प्राणहानी व वित्तहानी टाळावी. पावसाळ्यात दुरुस्तीपावसाळा एक महिन्यावर आला की, शाळा दुरुस्तीचा विषय चर्चेत येतो. शिक्षण विभागाने आतापासूनच उर्वरित शाळांनाही निधी द्यावा आणि शाळांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.