शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी राज्यभरात एस. टी. सेवा बंद?

By admin | Updated: September 24, 2015 23:55 IST

कामगारांचे प्रश्न, समस्या मान्य करूनही त्या सोडविल्या जात नाहीत. म्हणूनच हे धरणे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसमधील चालक व वाहक यांच्या ८ तास कामाबाबत अजूनही नियोजन झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेले नसल्याने एस. टी.चे राज्यभरातील ७५ हजार कर्मचारी येत्या २८ सप्टेंबर २०१५ला स्थानक, डेपो याठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या धरणे आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.  रत्नागिरी येथे जिल्ह्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला चव्हाण व संघटनेचे अन्य पदाधिकारी आले होते. प्रथम टप्प्यात २८ सप्टेंबरला धरणे आंदोलन होणार असून, त्यादिवशी सर्व कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काम बंद राहून एस. टी. आगारातच उभ्या राहणार काय? असे पत्रकारांनी विचारले असता सर्व कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहोत, त्यामुळे काय स्थिती निर्माण होईल, हे आता सांगता येणार नाही. चव्हाण यांच्या या उत्तरामुळे राज्यभरातील एस. टी. बस सेवा पूर्णत: विस्कळीत होणार असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात व राज्याच्या अनेक भागात अधिकाऱ्यांमार्फत चुकीच्या पध्दतीने गाड्यांचे वेळापत्रक तयार करण्यात येते, असा आरोप त्यांनी केला. चालक, वाहकांच्या कामाचे तास किती, याबाबतच्या नियमांचे पालनच होत नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या सोडल्या जात नाहीत. विभागीय कार्यालयात बसून कोणीतरी अधिकारी त्यांना वाटेल त्या पध्दतीने गाड्यांचे मार्ग ठरवून वेळापत्रक तयार करतात, त्यावेळी प्रवाशांच्या मागणीचाही विचार केला जात नाही, असा आरोप त्यांनी केला. गाडीसाठी आवश्यक वेळेची नोंद न करता वेळ कमी दाखवली जाते व किलोमीटर्स वाढवून दाखवले जातात. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काही अधिकारी आपली पाठ थोपटून घेतात. प्रवाशांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या आवश्यक आहेत. कामगारांचे प्रश्न, समस्या मान्य करूनही त्या सोडविल्या जात नाहीत. म्हणूनच हे धरणे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. एस. टी.च्या १ लाख कामगारांपैकी एस. टी. कामगार संघटनेचे राज्यात ७५ हजार कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर राज्यभर बंद आंदोलन व नंतर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)प्रवासात अकराशे कोटींची सवलतराज्य परिवहनतर्फे राज्यातील २५ दुर्बल घटकांना प्रवासात प्रतिवर्षी ११०० कोटींची सवलत दिली जात आहे. मात्र, हे सवलतीचे पैसे संबंधित खात्याकडून एस. टी.ला मिळत नाहीत. विद्यार्थी पास, मोफत प्रवास तसेच ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी प्रत्येकी ३६५ कोटींची सवलत दिली जाते. संबंधित खात्यांकडून हे पैसे मिळत नसल्याने नुकसान होत आहे.बस थांबत नाहीत...रत्नागिरी तालुक्यातील धावणाऱ्या काही एस.टी.बसेस रिकाम्या असतानाही मधल्या थांब्यांवर थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते व एस.टी.चेही नुकसान होते. रत्नागिरी रेल्वे फाट्यावर असे प्रकार सातत्याने घडत असून त्याबाबत संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे असे विचारता चव्हाण म्हणाले, असे होत असेल तर ते चुकीचेच असल्याचे त्यांनी सांगितले.