शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 19, 2015 23:49 IST

केंद्र, राज्यशासनाचा निषेध : वाढत्या महागाईवरून टीकाटिप्पणी

ओरोस : केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील युती सरकार महागाई कमी करण्याच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करत आहे. महागाई गगनाना भिडली असून विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांचे या थापाड्या सरकारला सोयरसुतक नाही. वाढीव महागाई आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडले.सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईला आळा घालण्यात अपयशी सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी धीरज परब, महिला अध्यक्षा भारती रावराणे, चैताली भेंडे, श्रेया देसाई, दत्ताराम गावकर, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक, अशोक रावराणे, बाळा पावसकर, माधवी दळवी, सुवर्णा मुंज यांच्यासह मनसे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष संदेश परब, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारने महागाई कमी करण्याचे सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिले होते. परंतु पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यात व्यस्त असून सामान्य जनतेकडे बघायला त्यांना वेळ नाही.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महागाईविरोधात आंदोलने छेडत आहेत. आम्ही तुम्हांला अच्छे दिन दाखविणार आहोत अशाप्रकारे वल्गना करणारे फक्त मोदी हे विदेश दौऱ्यावर आपल्या जेवणाच्या मोठ्या मेजवान्या घेत आहेत. गरीब जनता महागाईने होरपळली आहे. जतनेला दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. तूरडाळीचा दर २०० रुपयांपर्यंत पोहोचला असून तांदुळ ४० ते ८० रुपये व अन्य भाजीपाला, कांदे, बटाटे १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असे धीरज परब म्हणाले. यावेळी भारती रावराणे, धीरज परब, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक यांनी विचार मांडले. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन महागाईविरोधात शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)चैताली भेंडे : शासन जनतेची पिळवणूक करतेययावेळी महिला जिल्हाध्यक्ष चैताली भेंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महागाई विरोधी आंदोलन उभारले असून महागाई कमी होईपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असे सांगितले. काँग्रेस सत्तेवर असताना महागाई व विकासाचे गाजर दाखवणाऱ्या मोदींच्या हाती केंद्रातील सत्ता जनतेने दिली. परंतु मोदी विदेश दौऱ्यात व्यस्त आहेत. भारतातील जनतेकडे पहायला त्यांना वेळ नाही. सामान्य जनतेला डाळ, भात व जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सरकार जनतेची पिळवणूक करत आहे.गरीबाच्या तोंडाचा घास काढून घेणाऱ्या आणि महागाई कमी करण्याच्या आश्वासनांनी जनता हैराण झाली असून आता या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. थापा मारणारे आणि विकासाला खीळ घालणारे सरकार आहे. जनतेने जागृत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केले. महागाई कमी करण्याचे थापा मारत पंचपक्वांने खाण्यात दंग असलेले सरकार गरीबांकडे लक्ष देत नाही. सामान्य जनतेची सरकारला काही चिंता नाही, असा आरोप त्यांनी केला.