शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मनसेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 19, 2015 23:49 IST

केंद्र, राज्यशासनाचा निषेध : वाढत्या महागाईवरून टीकाटिप्पणी

ओरोस : केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील युती सरकार महागाई कमी करण्याच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करत आहे. महागाई गगनाना भिडली असून विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांचे या थापाड्या सरकारला सोयरसुतक नाही. वाढीव महागाई आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडले.सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईला आळा घालण्यात अपयशी सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी धीरज परब, महिला अध्यक्षा भारती रावराणे, चैताली भेंडे, श्रेया देसाई, दत्ताराम गावकर, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक, अशोक रावराणे, बाळा पावसकर, माधवी दळवी, सुवर्णा मुंज यांच्यासह मनसे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष संदेश परब, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारने महागाई कमी करण्याचे सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिले होते. परंतु पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यात व्यस्त असून सामान्य जनतेकडे बघायला त्यांना वेळ नाही.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महागाईविरोधात आंदोलने छेडत आहेत. आम्ही तुम्हांला अच्छे दिन दाखविणार आहोत अशाप्रकारे वल्गना करणारे फक्त मोदी हे विदेश दौऱ्यावर आपल्या जेवणाच्या मोठ्या मेजवान्या घेत आहेत. गरीब जनता महागाईने होरपळली आहे. जतनेला दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. तूरडाळीचा दर २०० रुपयांपर्यंत पोहोचला असून तांदुळ ४० ते ८० रुपये व अन्य भाजीपाला, कांदे, बटाटे १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असे धीरज परब म्हणाले. यावेळी भारती रावराणे, धीरज परब, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक यांनी विचार मांडले. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन महागाईविरोधात शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)चैताली भेंडे : शासन जनतेची पिळवणूक करतेययावेळी महिला जिल्हाध्यक्ष चैताली भेंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महागाई विरोधी आंदोलन उभारले असून महागाई कमी होईपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असे सांगितले. काँग्रेस सत्तेवर असताना महागाई व विकासाचे गाजर दाखवणाऱ्या मोदींच्या हाती केंद्रातील सत्ता जनतेने दिली. परंतु मोदी विदेश दौऱ्यात व्यस्त आहेत. भारतातील जनतेकडे पहायला त्यांना वेळ नाही. सामान्य जनतेला डाळ, भात व जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सरकार जनतेची पिळवणूक करत आहे.गरीबाच्या तोंडाचा घास काढून घेणाऱ्या आणि महागाई कमी करण्याच्या आश्वासनांनी जनता हैराण झाली असून आता या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. थापा मारणारे आणि विकासाला खीळ घालणारे सरकार आहे. जनतेने जागृत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केले. महागाई कमी करण्याचे थापा मारत पंचपक्वांने खाण्यात दंग असलेले सरकार गरीबांकडे लक्ष देत नाही. सामान्य जनतेची सरकारला काही चिंता नाही, असा आरोप त्यांनी केला.