शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

नवनिर्वाचित खासदारांकडून जनतेची दिशाभूल : सावंत

By admin | Updated: June 27, 2014 17:55 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

कणकवली : देशात महायुतीचे सरकार आल्यानंतर चांगले दिवस येतील असे स्वप्न जनतेला दाखविण्यात आले होते. मात्र, नवीन सरकार सत्तेत येवून एक महिना होत आला तरी हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत नाही. याऊलट जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. तर नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत व आमदार प्रमोद जठार येथील जनतेची दिशाभूल करीत असून विकासकामांबाबत फुकाचे श्रेय घेण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, महायुतीचे सरकार आल्यानंतर दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून जनतेला दाखविण्यात आलेल्या चांगल्या दिवसांचे स्वप्न धूसर होत चाललेले आहे. तर खासदार राऊत व आमदार जठार जनतेची दिशाभूल करीत आहेत. १ जुलैपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जात पडताळणी केंद्र सुरु होणार आहे. मात्र, केंद्रशासनाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आघाडी शासनाने याबाबतचा निर्णय घेतला असून ९ जून रोजी याबाबतचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. समुद्र किनारपट्टी संरक्षणासाठी तत्कालीन केंद्रशासनाने आचारसंहितेपूर्वीच ३५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. तसेच सागरी भागातील विविध विकासकामांसाठी ५० कोटींचा निधीही आघाडी शासनाने जाहीर केला होता. मात्र, याबाबत खासदार राऊत व आमदार जठार यांच्याकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. सी वर्ल्डबाबत जनतेची जी भूमिका असेल त्याच्या पाठीशी राहण्याचा जिल्हा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. जैतापूर येथील प्रकल्प व्हावा अशी भूमिका यापूर्वी भाजपने घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प झाल्यास नवनिर्वाचित खासदार तसेच शिवसेना आपली भूमिका काय ठेवणार? हे त्यांनी प्रथम जाहीर करावे. युतीने एन्रॉनबाबतची आपली भूमिका यापूर्वी बदलल्याचेही उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपने आपली भूमिका जाहीर करावी, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)