शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटीच्या विकासनिधीला मंत्र्यांचा लगाम

By admin | Updated: May 27, 2014 01:18 IST

वित्त सभेत ठराव : ‘तो’ निधी सदस्यांनी सुचविलेल्याच कामावर खर्च करावा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या ५० मतदारसंघातील विकासासाठी यावर्षी ठेवण्यात आलेल्या ३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी एका पत्राद्वारे लगाम घातला आहे. मात्र मंत्र्यांचे पत्र म्हणजे शासन निर्णय नाही. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघात विकास निधीची आवश्यकता असते. त्यामुळे तो निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीनुसारच खर्च व्हावा अशी मागणी वित्त समिती सभेत सदस्यांनी केली. तीन कोटी हा विकास निधी जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्याच कामावर खर्च करावा असा ठरावही यावेळी करण्यात आला. त्यामुळे या विषयावर सभागृहात चांगलीच गरमागरम चर्चा झाली. जिल्हा परिषद वित्त समितीची सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती भगवान फाटक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्य सुरेश ढवळ, रणजित देसाई, वित्त अधिकारी मारुती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. चार वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सदस्यांना आपल्या मतदारसंघात विकासकामे करता यावीत म्हणून जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातून विकासनिधी उपलब्ध करून दिला. यावर्षी सन २०१४-१५ या वर्षात ३ कोटी निधी उपलब्ध करून ेदेण्यात आला आहे. मात्र हा निधी यासाठी खर्च करू नये असे पत्र ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाला पाठविले आहे. हा विकास निधी समतोल खर्च होत नाही तसेच समाजकल्याण, महिला बालविकास व पाणीपुरवठा विभागालाही कमी निधी मिळू शकतो. या कारणास्तव त्यांनी हे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले आहे. त्याला सदस्य रणजित देसाई व सुरेश ढवळ यांनी आक्षेप घेत हा शासन निर्णय नाही, अध्यक्षांनासुद्धा राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांचेही आदेश महत्वाचे आहेत. हा विषय येत्या जिल्हा परिषद सभागृहासमोर ठेवा. मात्र हा निधी सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्या कामावर खर्च व्हावा असा ठरावही मंजूर करण्यात आला. मार्च अखेर सन २०१३-१४ चा खर्च हा शिक्षण विभागाचा ७८ टक्के, सामान्य प्रशासन ६४ टक्के, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ८९ टक्के, कृषी विभाग १०० टक्के, पशुसंवर्धन विभाग ७७ टक्के, १३ वा वित्त आयोग ९६ टक्के, ग्रामपंचायत विभाग ९९ टक्के, समाजकल्याण ९७ टक्के, महिला व बालविकास ८३ टक्के असा खर्च झाला असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)