शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमहाबळेश्वर पाणीटंचाईच्या खाईत

By admin | Updated: February 3, 2015 23:54 IST

तहान भागेना : ५७ गावे, १२२ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश, नादुरुस्त योजनांबद्दल उपाययोजना नाही

शिवाजी गोरे - दापोली --कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा योग्य नियोजन होत नसल्याने, पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हिवाळा संपताच पाणी पातळी खालावते व जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवायला लागते. कोकणच्या मिनीमहाबळेश्वरला सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दापोली तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार झाला आहे. ५७ गावे, १२२ वाड्यांचा पाणी टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.दापोली तालुक्यात टंचाई आराखड्याने उग्र रूप धारण केले असून ५७ गावे, १२२ वाड्यात फेब्रुवारीपासूनच टंचाईच्या आराखड्यावर येणार आहेत. तालुक्यातील खेर्डी-कातळवाडी, विसापूर-खातलोली, बौद्धवाडी, मांदिवली-बाईतवाडी, कवडोली-गावठाणवाडी, आतगाव-गावठाणवाडी, भाटवाडी, उटंबर-कोळीवाडा, चिंचवळ आघारी-तिवरे रहाटवाडी, ओणी-मधलीवचाडी, वरवटकरवाडी, वरवटकरवाडी नं.२, जामगे-देवाचा डोंगर, नवानगर, मुर्डी-चाचवलवाडी, तामसतीर्थ-भंडारवाडा-कोळीवाडा, करजगाव-मधलीवाडी, मुकादमवाडी, चिपळूणकरवाडी, भाटी-पूर्ववाडी, पश्चिमवाडी, भोईवाडा, उन्हवरे-गणेशवाडी, फरारे-मोगरेवाडी या ११ गावे १८ वाड्यांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. या गावांना उन्हाळ्यात दरवर्षी आपली तहान टँकरमधून मिळणाऱ्या चार हंडे पाण्यावर भागवावी लागत आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.नळपाणी योजनेतील २१ गावे, ३१ वाड्यातील नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने, टंचाई आराखड्यात त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. दापोली तालुक्यातील देवाचा डोंगर जामगे, नवानगर, भाटी, उन्हवरे, फरारे-मोगरेवाडी, ओणी, माघारी, उटंबर, आतगाव, कवडोली या गावांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. फरारे-मोगरे, भोईवाडी, ओणी-भाटी ही गाव समुद्र खाडीकिनारी असूनसुद्धा, या गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे.टंचाई आराखडा दरवर्षी तयार केला जातो. मात्र, कायमस्वरूपी तोडगा सापडलेला नाही. काही गावांना टँकरवर अवलंबून राहवे लागते. दिवसाला चार हंडे पाण्यावर जीवन जगायचे कसे, असा प्रश्न आहे. देवाचा डोंगर, जामगेवाडीला पाणीटंचाईच्या काळात १० ते १४ किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फरारे-मोगरे या गावाच्या पायथ्याशी समुद्र आहे. पाणीटंचाईने त्यांच्या घशाला कोरड पडली आहे. अनेक गावांना विंधन विहिरीवर अवलंबून राहवे लागत आहे. दापोली तालुका निसर्गसंपन्न तालुका आहे. थंड हवेचे ठिकाण, कोकणचे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून दापोलीची ओळख असली, तरी कोकणच्या ‘मिनी महाबळेश्वर’ची पाण्याची तहान प्रशासनाला भागवता आलेली नाही.आजही पाण्यासारख्या मूलभूत गरजेकडे सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, पाणीटंचाई आराखडा तयार असला तरी त्याची अंमलबजावणी शून्य आहे. शासनाच्या पाणीविषयक धोरणाची अंमलबजावणी अधिक पारदर्शकपणे व्हायला हवी, ही अपेक्षा गेली अनेकवर्षे तशीच राहिली आहे.