शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

कोट्यवधींचा निधी पडून

By admin | Updated: September 26, 2014 23:32 IST

ई टेंडरिंग रखडले : ४४ वाड्यांच्या योजनांवर परिणाम

रहिम दलाल -रत्नागिरी -ग्रामपंचायतींकडून ई - टेंडरिंगची कामे वेळेवर होत नसल्याने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील ४४ वाड्यांची कामे रखडली आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़ केंद्र शासनाने भारत निर्माण कार्यक्रमाचे नामकरण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असे केले़ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आणि तांडे यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या़या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३९९ वाड्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता़ त्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ३२६ वाड्या आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये ७३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे़ यामधील सुमारे १०० कामे पूर्ण झाली असून, २५३ कामे सुरु आहेत़ अजूनही ४४ ग्रामपंचायतींकडून कामांचे ई-टेंडरिंग करण्यात आलेले नाहीत़ या कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया करावी लागते़ त्यासाठी ही निविदा ई-टेंडरिंगने काढणे आवश्यक आहे़ मात्र, अनेक ग्रामपंचायतींकडून ई-टेंडरिंगचे काम वेळेवर होत नसल्याने निविदा प्रक्रियेला वेळ लागत असल्याने ही कामे अडकली आहेत़ त्यामुळे या कार्यक्रमाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़जिल्ह्यातील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे रखडल्याने ई-टेंडरिंग करण्याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतींना वेळोवेळी कळविण्यात आले आहे़ मात्र, ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करीत आहे़ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे इ टेडरिंगपध्दतीचा वापर होणार आहे.