शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

कोट्यवधींचा निधी पडून

By admin | Updated: September 26, 2014 23:32 IST

ई टेंडरिंग रखडले : ४४ वाड्यांच्या योजनांवर परिणाम

रहिम दलाल -रत्नागिरी -ग्रामपंचायतींकडून ई - टेंडरिंगची कामे वेळेवर होत नसल्याने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील ४४ वाड्यांची कामे रखडली आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़ केंद्र शासनाने भारत निर्माण कार्यक्रमाचे नामकरण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असे केले़ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आणि तांडे यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या़या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३९९ वाड्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता़ त्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ३२६ वाड्या आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये ७३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे़ यामधील सुमारे १०० कामे पूर्ण झाली असून, २५३ कामे सुरु आहेत़ अजूनही ४४ ग्रामपंचायतींकडून कामांचे ई-टेंडरिंग करण्यात आलेले नाहीत़ या कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया करावी लागते़ त्यासाठी ही निविदा ई-टेंडरिंगने काढणे आवश्यक आहे़ मात्र, अनेक ग्रामपंचायतींकडून ई-टेंडरिंगचे काम वेळेवर होत नसल्याने निविदा प्रक्रियेला वेळ लागत असल्याने ही कामे अडकली आहेत़ त्यामुळे या कार्यक्रमाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़जिल्ह्यातील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे रखडल्याने ई-टेंडरिंग करण्याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतींना वेळोवेळी कळविण्यात आले आहे़ मात्र, ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करीत आहे़ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे इ टेडरिंगपध्दतीचा वापर होणार आहे.