शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

आंबा पिकावर अवकृपा

By admin | Updated: November 16, 2014 00:24 IST

कोकण कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना बागा वाचविण्याचा सल्ला

शिवाजी गोरे / दापोलीकोकणाचे अर्थकारण योग्य दिशेला नेणारे आंबा पीक यावेळी अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंबा बागायतदारांनी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार फवारणी करून आपले नुकसान टाळणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी दिला आहे. आंबा बागायतदारांसाठी आॅक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधी महत्त्वाचा असतो. या कालावधीत आंब्याला पालवी फुटते. याच कालावधीत आंब्यावर चिकटा, करपा, बुरशीसारखे रोग पडतात. नोव्हेंबर महिना मोहोर येण्याचा कालावधी असतो. नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्यात आंब्याला मोहोर येतो. याच कालावधीत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंब्यावर विविध रोग होतात. ढगाळ व दमट वातावरण अळीला अंडी उबवण्यासाठी पोषक असते. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर करपा, चिकटा पडतो. त्याचवेळी आंब्यावर फवारणी केल्यास होणारा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी कीटकनाशक फवारुन त्यावरील रोग नष्ट करणे गरजेचे आहे. कोकणात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने याचा आंबा पिकावर नक्की परिणाम होऊ शकतो; परंतु योग्यवेळी कीटकनाशके फवारल्यास होणारा धोका टळू शकतो, असाही सल्ला डॉ. भावे यांनी दिला आहे.आंबा बागायतदारांनी औषध फवारणीला प्राधान्य द्यावे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्याने योग्यवेळी फवारणी केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. कोकणात सव्वा लाख हेक्टरवर आंब्याचे उत्पन्न घेतले जाते. तरीही अजून ग्रामीण भागातील शेतकरी आंबा बागायतीकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. ठरावीक आंबा बागायतदार शेतकरी योग्य काळजी घेऊन आपले उत्पन्न घेत आहेत. काढणीपश्चात व्यवस्थापनाचीसुद्धा शेतकऱ्याने काळजी घेणे गरजेचे आहे.