शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकावर अवकृपा

By admin | Updated: November 16, 2014 00:24 IST

कोकण कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना बागा वाचविण्याचा सल्ला

शिवाजी गोरे / दापोलीकोकणाचे अर्थकारण योग्य दिशेला नेणारे आंबा पीक यावेळी अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंबा बागायतदारांनी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार फवारणी करून आपले नुकसान टाळणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी दिला आहे. आंबा बागायतदारांसाठी आॅक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधी महत्त्वाचा असतो. या कालावधीत आंब्याला पालवी फुटते. याच कालावधीत आंब्यावर चिकटा, करपा, बुरशीसारखे रोग पडतात. नोव्हेंबर महिना मोहोर येण्याचा कालावधी असतो. नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्यात आंब्याला मोहोर येतो. याच कालावधीत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंब्यावर विविध रोग होतात. ढगाळ व दमट वातावरण अळीला अंडी उबवण्यासाठी पोषक असते. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर करपा, चिकटा पडतो. त्याचवेळी आंब्यावर फवारणी केल्यास होणारा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी कीटकनाशक फवारुन त्यावरील रोग नष्ट करणे गरजेचे आहे. कोकणात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने याचा आंबा पिकावर नक्की परिणाम होऊ शकतो; परंतु योग्यवेळी कीटकनाशके फवारल्यास होणारा धोका टळू शकतो, असाही सल्ला डॉ. भावे यांनी दिला आहे.आंबा बागायतदारांनी औषध फवारणीला प्राधान्य द्यावे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्याने योग्यवेळी फवारणी केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. कोकणात सव्वा लाख हेक्टरवर आंब्याचे उत्पन्न घेतले जाते. तरीही अजून ग्रामीण भागातील शेतकरी आंबा बागायतीकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. ठरावीक आंबा बागायतदार शेतकरी योग्य काळजी घेऊन आपले उत्पन्न घेत आहेत. काढणीपश्चात व्यवस्थापनाचीसुद्धा शेतकऱ्याने काळजी घेणे गरजेचे आहे.