शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

आंबा कलमांची पानझडी--देवगड हापूसची स्थिती

By admin | Updated: September 16, 2014 23:25 IST

सेंद्रीय खताचा वापर करावा..कलमांवर किटकनाशक फवारणी करावी

पुरळ : शेतीला व बागायतींना योग्य प्रमाणात पोषक असा पाऊस पडत आहे. मात्र, आंबा कलमांना मोहोर न आल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश आंबा कलमे पानझडी झाल्याचे दिसून येत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कल्टार तसेच रासायनिक खतांचाही वापर केल्याने आंबा कलमांमध्ये असमतोलपणा निर्माण झाला आहे. सेंद्रीय खतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. अन्यथा देवगड हापूस आंबा कलमांची लागवड घटू शकते.दरवर्षी सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्ये किंवा जूनमध्ये कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी येत असते. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत या कलमांना पालवी न आल्याने कलमे पानझडी झाली आहेत. कल्टारचा जास्त प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच बनावट किटकनाशके, खते यांमधून आंबा कलमांना नको असलेले घटक पुरविले जातात. यामुळे या कलमांचा समतोलपणा बिघडून कलमांना पालवी न येणे, आंबा उत्पन्न घटणे असे अनेक रोग निर्माण होतात. कृषी विभागाने यापुढे लक्ष देणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळे आज आंबा कलमांवर संशोधन करणे किंवा त्यावर लक्ष देणे हे काम करीत नसल्यानेच अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. भविष्यामध्ये देवगड हापूस आंब्याची लागवड संपुष्टात येण्याचीही चिन्हे दिसत आहेत. सध्या देवगड तालुक्यामध्ये १२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड आहे. (वार्ताहर)कलमांवर किटकनाशक फवारणी करावी देवगड हापूस आंबा कलमांची योग्य प्रमाणात व कृषी सल्ल्यानुसार मशागत व देखभाल केली पाहिजे. सध्या आंबा कलमांना पालवी न येण्याची कारणे अनेक आहेत. मात्र बागायतदारांनी कृषी सल्ल्यानुसार कलमांना किटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. सध्या पावसाळ््यामध्येही तुडतुड्यांचे कलमांवर जास्त प्रमाण आहे. यामुळे पालवी येण्यास विलंब होत आहे. या तुडतुड्यांवर किटकनाशकांची फवारणी केल्यास चांगली पालवी येऊ शकते. कलमे मोहोरल्यानंतरच फवारणी करायची असते. तशीच इतरवेळीही पालवी येण्यासाठी कलमांना फवारणी केली पाहिजे, अशी माहिती प्रकाश गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.