शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

आंबा कलमांची पानझडी--देवगड हापूसची स्थिती

By admin | Updated: September 16, 2014 23:25 IST

सेंद्रीय खताचा वापर करावा..कलमांवर किटकनाशक फवारणी करावी

पुरळ : शेतीला व बागायतींना योग्य प्रमाणात पोषक असा पाऊस पडत आहे. मात्र, आंबा कलमांना मोहोर न आल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश आंबा कलमे पानझडी झाल्याचे दिसून येत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कल्टार तसेच रासायनिक खतांचाही वापर केल्याने आंबा कलमांमध्ये असमतोलपणा निर्माण झाला आहे. सेंद्रीय खतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. अन्यथा देवगड हापूस आंबा कलमांची लागवड घटू शकते.दरवर्षी सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्ये किंवा जूनमध्ये कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी येत असते. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत या कलमांना पालवी न आल्याने कलमे पानझडी झाली आहेत. कल्टारचा जास्त प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच बनावट किटकनाशके, खते यांमधून आंबा कलमांना नको असलेले घटक पुरविले जातात. यामुळे या कलमांचा समतोलपणा बिघडून कलमांना पालवी न येणे, आंबा उत्पन्न घटणे असे अनेक रोग निर्माण होतात. कृषी विभागाने यापुढे लक्ष देणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळे आज आंबा कलमांवर संशोधन करणे किंवा त्यावर लक्ष देणे हे काम करीत नसल्यानेच अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. भविष्यामध्ये देवगड हापूस आंब्याची लागवड संपुष्टात येण्याचीही चिन्हे दिसत आहेत. सध्या देवगड तालुक्यामध्ये १२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड आहे. (वार्ताहर)कलमांवर किटकनाशक फवारणी करावी देवगड हापूस आंबा कलमांची योग्य प्रमाणात व कृषी सल्ल्यानुसार मशागत व देखभाल केली पाहिजे. सध्या आंबा कलमांना पालवी न येण्याची कारणे अनेक आहेत. मात्र बागायतदारांनी कृषी सल्ल्यानुसार कलमांना किटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. सध्या पावसाळ््यामध्येही तुडतुड्यांचे कलमांवर जास्त प्रमाण आहे. यामुळे पालवी येण्यास विलंब होत आहे. या तुडतुड्यांवर किटकनाशकांची फवारणी केल्यास चांगली पालवी येऊ शकते. कलमे मोहोरल्यानंतरच फवारणी करायची असते. तशीच इतरवेळीही पालवी येण्यासाठी कलमांना फवारणी केली पाहिजे, अशी माहिती प्रकाश गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.