शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

आंबा कलमांची पानझडी--देवगड हापूसची स्थिती

By admin | Updated: September 16, 2014 23:25 IST

सेंद्रीय खताचा वापर करावा..कलमांवर किटकनाशक फवारणी करावी

पुरळ : शेतीला व बागायतींना योग्य प्रमाणात पोषक असा पाऊस पडत आहे. मात्र, आंबा कलमांना मोहोर न आल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश आंबा कलमे पानझडी झाल्याचे दिसून येत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कल्टार तसेच रासायनिक खतांचाही वापर केल्याने आंबा कलमांमध्ये असमतोलपणा निर्माण झाला आहे. सेंद्रीय खतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. अन्यथा देवगड हापूस आंबा कलमांची लागवड घटू शकते.दरवर्षी सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्ये किंवा जूनमध्ये कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी येत असते. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत या कलमांना पालवी न आल्याने कलमे पानझडी झाली आहेत. कल्टारचा जास्त प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच बनावट किटकनाशके, खते यांमधून आंबा कलमांना नको असलेले घटक पुरविले जातात. यामुळे या कलमांचा समतोलपणा बिघडून कलमांना पालवी न येणे, आंबा उत्पन्न घटणे असे अनेक रोग निर्माण होतात. कृषी विभागाने यापुढे लक्ष देणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळे आज आंबा कलमांवर संशोधन करणे किंवा त्यावर लक्ष देणे हे काम करीत नसल्यानेच अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. भविष्यामध्ये देवगड हापूस आंब्याची लागवड संपुष्टात येण्याचीही चिन्हे दिसत आहेत. सध्या देवगड तालुक्यामध्ये १२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड आहे. (वार्ताहर)कलमांवर किटकनाशक फवारणी करावी देवगड हापूस आंबा कलमांची योग्य प्रमाणात व कृषी सल्ल्यानुसार मशागत व देखभाल केली पाहिजे. सध्या आंबा कलमांना पालवी न येण्याची कारणे अनेक आहेत. मात्र बागायतदारांनी कृषी सल्ल्यानुसार कलमांना किटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. सध्या पावसाळ््यामध्येही तुडतुड्यांचे कलमांवर जास्त प्रमाण आहे. यामुळे पालवी येण्यास विलंब होत आहे. या तुडतुड्यांवर किटकनाशकांची फवारणी केल्यास चांगली पालवी येऊ शकते. कलमे मोहोरल्यानंतरच फवारणी करायची असते. तशीच इतरवेळीही पालवी येण्यासाठी कलमांना फवारणी केली पाहिजे, अशी माहिती प्रकाश गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.