शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

कृषी कार्यालयाचा गलथान कारभार

By admin | Updated: June 27, 2014 00:42 IST

राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी : मालवण तालुक्यात लष्करी अळींचा प्रादुर्भाव

मालवण : तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना भातपीक संरक्षणासाठी दिली जाणारी रोगप्रतिबंधक औषधे व किटकनाशके तालुका कृषी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे अद्याप तालुक्यात न आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना भातशेतीवर पडलेल्या लष्करी अळी व करपा रोगाशी सामना करावा लागत आहे. याबाबत शासनस्तरावर चौकशी करण्यात यावी, अशा प्रकारची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही डॉन्टस यांनी केले आहे. मालवण तालुक्यात किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी जमिनीवर भाताची पेरणी केली होती. त्याची रोपे उगवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस लांबणीवर पडल्याने या भातशेतीवर लष्करी अळीचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातशेती पूर्ण धोक्यात आली आहे. लष्करी अळी व करपा रोगाशी मुकाबला करण्यासाठी शासनाच्यावतीने गेली काही वर्षे तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत पंचायत समितीमार्फत भातपीक संरक्षणासाठी रोगप्रतिबंधक औषधांचे नियोजन केले जायचे. मात्र, पंचायत समितीकडील ही योजना तालुका कृषी कार्यालयाकडे हस्तांतरीत केली गेली. शेतकऱ्यांना रोगप्रतिबंधक औषधांचे वाटप योग्य वेळेत व्हावे याची जबाबदारी तालुका कृषी कार्यालयाची असताना तालुका कृषी कार्यालयाने आपली बेपर्वाई वृत्ती दाखविल्याने शेतकऱ्यांना लष्करी अळी व करपा रोगांशी सामना करावा लागत आहे. मालवण तालुक्यातील वराड, पेंडूर, तळगाव या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणीही भातशेत जमिनीवर लष्करी अळी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र, तालुका कृषी कार्यालयाने रोगप्रतिबंधक औषधे शेतकऱ्यांना दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉटस यांनी वराड, पेंडूर या गावचा दौरा करून भातशेतीची पाहणी केली असता भातशेतीवर लष्करी अळी व करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत डॉन्टस यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित खते, औषधे व किटकनाशकांची मागणी कणकवली येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे सांगण्यात आले. तालुका कृषी कार्यालयाने वेळेत औषधांची मागणी केली असती तर आज शेतकऱ्यांवर ही पाळी आली नसती अशी प्रतिक्रिया डॉन्टस यांनी व्यक्त करून कृषी कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभार आणि तहान लागताच विहीर खोदण्याच्या वृत्तीमुळे शेतकरी अडचणीत आले असल्याचे डॉन्टस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)