शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

कृषी कार्यालयाचा गलथान कारभार

By admin | Updated: June 27, 2014 00:42 IST

राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी : मालवण तालुक्यात लष्करी अळींचा प्रादुर्भाव

मालवण : तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना भातपीक संरक्षणासाठी दिली जाणारी रोगप्रतिबंधक औषधे व किटकनाशके तालुका कृषी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे अद्याप तालुक्यात न आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना भातशेतीवर पडलेल्या लष्करी अळी व करपा रोगाशी सामना करावा लागत आहे. याबाबत शासनस्तरावर चौकशी करण्यात यावी, अशा प्रकारची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही डॉन्टस यांनी केले आहे. मालवण तालुक्यात किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी जमिनीवर भाताची पेरणी केली होती. त्याची रोपे उगवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस लांबणीवर पडल्याने या भातशेतीवर लष्करी अळीचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातशेती पूर्ण धोक्यात आली आहे. लष्करी अळी व करपा रोगाशी मुकाबला करण्यासाठी शासनाच्यावतीने गेली काही वर्षे तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत पंचायत समितीमार्फत भातपीक संरक्षणासाठी रोगप्रतिबंधक औषधांचे नियोजन केले जायचे. मात्र, पंचायत समितीकडील ही योजना तालुका कृषी कार्यालयाकडे हस्तांतरीत केली गेली. शेतकऱ्यांना रोगप्रतिबंधक औषधांचे वाटप योग्य वेळेत व्हावे याची जबाबदारी तालुका कृषी कार्यालयाची असताना तालुका कृषी कार्यालयाने आपली बेपर्वाई वृत्ती दाखविल्याने शेतकऱ्यांना लष्करी अळी व करपा रोगांशी सामना करावा लागत आहे. मालवण तालुक्यातील वराड, पेंडूर, तळगाव या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणीही भातशेत जमिनीवर लष्करी अळी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र, तालुका कृषी कार्यालयाने रोगप्रतिबंधक औषधे शेतकऱ्यांना दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉटस यांनी वराड, पेंडूर या गावचा दौरा करून भातशेतीची पाहणी केली असता भातशेतीवर लष्करी अळी व करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत डॉन्टस यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित खते, औषधे व किटकनाशकांची मागणी कणकवली येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे सांगण्यात आले. तालुका कृषी कार्यालयाने वेळेत औषधांची मागणी केली असती तर आज शेतकऱ्यांवर ही पाळी आली नसती अशी प्रतिक्रिया डॉन्टस यांनी व्यक्त करून कृषी कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभार आणि तहान लागताच विहीर खोदण्याच्या वृत्तीमुळे शेतकरी अडचणीत आले असल्याचे डॉन्टस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)