शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जैवविविधतेसाठी व्यवस्थापन समित्या

By admin | Updated: August 17, 2014 00:22 IST

प्रकल्पाचे काम सुरू : २0१६ पर्यंतची मुदत

संदीप बोडवे ल्ल मालवणसिंधुदुर्गातील जैवविविधतेच्या रक्षण व संवर्धनाकरिता आता गावागावांमध्ये ‘जैवविविधता व्यवस्थापन समित्या’ स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेता या समित्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. वनविभाग व युएनडीपीच्या माध्यमातून मालवण, देवगड, वेंगुर्ला येथे जैवविविधता प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची मुदत २०१६ पर्यंत आहे. या नंतरही या प्रकल्पाचे कार्य जिल्ह्यात सुरळीत चालू राहण्याकरिता या समित्यांचा उपयोग होणार आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता नियम २००८ नुसार जैवविविधता कायदा २००२ च्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या निर्देशानुसार जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील समितीकरिता ग्रामसभेद्वारे ७ नामनिर्देशित सदस्य व सचिव म्हणून ग्रामसेवकांची नियुक्ती करावयाची आहे. याशिवाय आमंत्रित सदस्य म्हणून जैवविविधता संदर्भातील विविध विषयातील तज्ज्ञ व सरकारी विभागांमधून वन, कृषी, पशुपालन, आरोग्य, मत्स्यपालन, शिक्षण व आदिवासी विभाग यांचे प्रतिनिधी नियुक्त करता येऊ शकतात. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ याच्या कलम ४९ नुसार ग्रामसभेची उपसमिती म्हणून या समितीची स्थापना होईल.समितीद्वारे जैवविविधता कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. या समित्यांना जैवसंसाधनाच्या वापराबाबत परवानगीचा निर्णय घेण्याचा तसेच जैविक स्त्रोताच्या वापरासाठी शुल्क वसुलीचा अधिकार राहणार आहे.राष्ट्रीय जैविक विविधता प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळाने वेळोवेळी दर्शविलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे जैविक विविधता निधीचे व्यवस्थापन व वापर करणे समितीला बंधनकारक आहे. जैविक संसाधन असलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे आणि पारंपरिक ज्ञान प्राप्त करणे व लाभाच्या वाटपाची नोंद ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जैविक विविधता प्राधिकरण चेन्नई आणि महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळाला गरज भासेल तेव्हा विविध विषयावरील माहिती व मते सादर करण्याची समितीची जबाबदारी राहणार आहे.