शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागासाठी शाळांमधून ‘स्नेहभोजन’ शिजणार

By admin | Updated: September 24, 2015 00:10 IST

शासनाचा निर्णय : पोषण आहार योजनेला नवा साज चढवण्याचा प्रयत्न

दापोली : लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या वाढीस उपयोगी असणारी पूरक पोषण मूल्ये प्राप्त होतील. आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्न पदार्थ्याची चव चाखता येईल. तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने शालेय पोषण आहार योजनेत लोकसहभाग वाढवण्यासाठी ‘स्नेहभोजन’ उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उपक्रम राबविण्यासंबंधी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये या उपक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सदर उपक्रम ऐच्छिक स्वरूपाचा राहील. गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जन्मशताब्दी इत्यादी तसेच लग्न समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण इत्यादी बाबी या विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीला असतील. ग्रामसभा, पालकसभा शाळा व्यवस्थापन समिती सभा यामधून या उपक्रमाची जनजागृती करावी. स्नेहभोजन या आहारामध्ये शालेय पोषण आहारासोबत मिठाई किंंवा पूरक पोषक आहाराचा समावेश करण्यात आला आहे. असा पूरक पोषक आहार विद्यार्थ्यांना नेहमी देण्यात यावा. स्नेहभोजन उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेला भोजन देण्यात यावे व भोजनात कोणत्या पदार्थांचा समावेश करणार आहे. याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व वितरकाने एकत्रित निर्णय घ्यावा. या उपक्रमांतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्य पदार्थ किंंवा आवश्यक इतर साहित्य देता येईल. पोषक आहाराचे वितरण करताना वितरक शाळेमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. देण्यात येणारा खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तसेच माध्यान्ह भोजनाच्या वेळेतच देण्यात यावे. सदर उपक्रम ज्या आठवड्यात राबविण्यात येईल. त्या आठवड्यात शासनाच्या निर्णयानुसार पूरक आहार देणे आवश्यक राहणार आहे. वितरकाने विशेष दिनाच्या औचित्याने जेवण दिले. त्या दिवशी शालेय पोषण आहार शिजवू नये. परंतु केवळ अल्पोपाहार किंंवा पूरक आहार दिल्यास त्या दिवशी पोषण आहार देणे आवश्यक राहील. स्नेहभोजन उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता शाळेने घ्यायची आहे. तसेच शाळांनी किंवा संबंधितांनी ‘स्नेहभोजन’ उपक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर सभा व बैठकीमध्ये प्रसिध्दी द्यावी. या उपक्रमाची सुरूवात या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. स्नेहभोजन उपक्रमातून शाळा व समाज यांच्यातील संबंध अधिक वृढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम योग्य आहे. (वार्ताहर)शालेय पोषण आहाराचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे. अनेक शाळांमध्ये अजूनही शालेय पोषण आहार शिजत नाही. त्यामुळे शालेय पोषण आहाराची योजना यशस्वी करण्यासाठी यामध्ये स्थानिक ग्रामस्थांनादेखील सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने ेघेतला आहे. त्यासाठी ‘स्नेहभोजन’ हा उपक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.