शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

एम. एच. मरिगौंडा --कृषिक्रांतीचे शिलेदार

By admin | Updated: September 20, 2015 23:42 IST

शास्त्रशुध्द फळबागांची निर्मिती

वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्न पदार्थामध्ये वनस्पतींचे सर्व घटक अन्न म्हणून स्विकारले गेले आहेत. गाजर, बीट, कंदमुळे ही मुळे जशी आहारात वापरली जातात. तशीच पाने ही देखील अन्न म्हणून वापरली जातात. तृणधान्य ही तर प्रमुख अन्नघटक बनली आहेत. विविध जीवनसत्वे, क्षार यासाठी फळांचा वापर मानवी संस्कृतीचा जेव्हापासूनचा इतिहास माहिती आहे तेव्हापासून दिसून येतो. ‘शबरीची बोरे’ हे रामायणातील महत्वाचे प्रकरण आहे. फळांचे महत्व शालेय शिक्षणापासून आपणास शिकवले जाते. या फळांचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने फळबागांची निर्मिती करण्याचे यशस्वी प्रयत्न करणारे आणि भारतात फलोद्यान शास्त्र विकसित करणारे असे फलोद्यान शास्त्राचे जनक म्हणजे डॉ. एम. एच. मरिगांैडा. डॉ. मरिगौंडा यांचा जन्म ८ आॅगस्ट, १९१६ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वनस्पतीशास्त्राची एम. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर सन १९४२मध्ये त्यांची सहाय्यक उद्यान अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. शासकीय उद्यानाचे अधीक्षक रावबहाद्दूर एच. सी. जावराया यांच्या देखरेखीखाली ते लालबाग उद्यानाचे काम पाहू लागले. त्यांच्या कामातील प्रगती पाहून सन १९४७मध्ये फलोद्यानाचे सखोल प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना रॉयल बोटॅनिकल गार्डन, इंग्लंड येथे पाठवण्यात आले. सहा महिने तेथील उद्यानांचा अभ्यास करून ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी प्रसिध्द हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर लगेच सन १९५१मध्ये ते भारतात परत आले. परत येताच त्यांना पदोन्नत करून उद्यान उपअधीक्षकाचे पद देण्यात आले आणि थोड्याच दिवसात ते लालबाग उद्यानाचे अधीक्षक बनले. सन १९६३मध्ये त्यांना फलोद्यान विभागाचे म्हैसूर राज्याचे संचालक बनवण्यात आले. त्याकाळी फलोद्यान विभाग हा अत्यंत दुर्लक्षित होता. म्हैसूर राज्यात फलोद्यान क्षेत्राचा त्यांनी मोठया प्रमाणात प्रसार केला. एवढंच नव्हे तर त्यांनी लोकांना फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहितही केले. त्यापूर्वी कृषी विभागांतर्गत फलोद्यान विभाग होता. मात्र, मारिगौंडा यांनी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून फलोद्यान विभागाची स्वतंत्र निर्मिती केली. त्यांनी फलोद्यानासाठी चतु:सूत्री तयार केली. पूर्ण राज्यात ३८० ठिकाणी फळबागा आणि रोपवाटिका तयार केल्या. या रोपवाटिका केवळ रोपवाटिका नव्हत्या तर नवीन वाणांची निर्मिती करणारी केंद्रे होती. फळांच्या लागवडीची आणि संगोपनाची नवी तंत्रे निर्माण करणारी केंद्रे बनली. विषेशत: नारळाच्या नव्या वाणांची निर्मिती मोठया प्रमाणात करण्यात आली. बेल्लार आणि कन्नमंगल या केंद्रांनी केलेल्या कार्यामुळे डॉ. मारिगौंडा यांचे नाव भारतभर झाले. फळबागांच्या प्रयोगासाठी मारिगांैडा यांनी रोपवाटिकांबरोबर प्लँट प्रोटेक्शन, लॅबोरेटरी, मृद संधारण प्रयोगशाळा आणि बीज चाचणी प्रयोगशाळांची लालबाग उद्यानात स्थापना केली. फळांचे मोठया प्रमाणावर उत्पादन झाल्यावर त्यांचे जतन करणे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे असते. फळातून अनावश्यक पाणी काढून टाकण्याचे तंत्र आणि यंत्र विकसित केले. त्यांनी विविध वाण स्वत: तयार केले आणि जनतेपर्यंत पोहोचवले. जिरायती शेतीत फळबागा लावण्यासाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहित केले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर उत्तम उत्पादन देणाऱ्या अनेक फळबागा निर्माण करून समाजासमोर आदर्श उभा केला. आपोआपच शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले आणि हळूहळू शेतकऱ्यांचा फळबागांकडे ओढा वाढू लागला.कोणत्या फळबागेत कोणते आंतरपीक घ्यावे हे स्वत: प्रयोग करून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या या अजोड कामगिरीमुळे कर्नाटक फळांचे राज्य बनले. भरपूर उत्पादन देणारे ‘मलिका’ आंबा बाण त्यांच्याच काळात प्रसिध्द झाले. सन १९७६ला ते सेवानिवृत्त झाले आणि सन १९९२ला निधन होईपर्यंत बेंगलोर येथे वास्तव्य केले, मात्र, अखेरच्या श्वासापर्यंत ग्रामविकास आणि फलोद्यान क्षेत्रात ते कार्यरत राहिले.- डॉ. व्ही. एन. शिंदेउपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर