शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

फसव्या कॉल्सनी ग्राहकांची लूट

By admin | Updated: February 13, 2015 22:54 IST

ग्राहक अनभिज्ञ : आमिषांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतेय

चिपळूण : सध्या मोबाईद्वारे विविध आमिषे दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत अनेक वृत्त प्रसिद्ध होत असताना मात्र ग्राहकांमध्ये फारशी जागृती नाही. अनेकजण आजही या फसव्या आमिषांना बळी पडत आहेत.झटपट श्रीमंत होण्यासाठी किंवा आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येकजण पैशाच्या मागे आहे. त्यातच मोबाईलवर वेगवेगळे एस. एम. एस. किंवा कॉल्स येतात. त्या मधाळ बोलण्याला किंवा एस. एम. एस.ला ग्राहक भुलतात आणि पैसे भरतात. काही मिनिटांतच आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. ‘मग दातही आपलेच, ओठही आपलेच’ असल्याने इज्जत जाईल म्हणून गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांत तक्रार दिली, तर आपलेच पितळ उघडे पडणार म्हणून तिकडे कोणी फिरकत नाही.मोबाईलवर केवळ ए. टी. एम.चाच क्रमांक नाही. तर कधी कधी टि.व्ही.बाबत, कधी मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा एल. आय. सी.च्या बोनस बाबत चर्चा केली जाते. मोबाईलवरून धनादेश पाठवण्यासाठी पत्ता व अन्य तपशीलही विचारला जातो. अनेकांच्या पॉलिसी असल्याने त्याबाबत विश्वास ठेवला जातो. काहींचा क्लेम अडकलेला असल्याने ते या मोहजालात अडकतात. अनेकांना आजपर्यंत असे अनेक फोन आले आहेत. अनेकांची फसवणूक झाली, पण यात एलआयसीचा किंवा एजंटचा काही संबंध नसतो. लोक यात पुरते फसतात. अशा फसवणूकींपासून नागरिकांनी सावध राहायला हवे. आता आॅनलाईन फसवणुकीचे प्रकारही कमालीचे वाढले आहेत. या सर्व प्रकारात संबंधितांकडून अधिक चौकशी व्हायला हवी, असे सर्वांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)