शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 5, 2015 00:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : विविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

ओरोस : विविध मागण्यांसाठी जीवन प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सामूहिक रजेवर जात जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करा, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सर्व योजना बंद असल्याने जनतेला पाणी न मिळाल्याने गैरसोय होत आहे. ४ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलनाबरोबर ७ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन या प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. पाणी योजना बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्राधिकरणामध्ये अभियांत्रिकी सवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी कायमस्वारूपी सेवेत आहेत. या जीवन प्राधिकरणच्या धोरणानुसार पाणीपुरवठा व जलनि:सारण योजनेवरील प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने आस्थापना, हत्यारे, अवजारे यांच्या खर्चापोटी १७.५ टक्के इतके शुल्क आकारणे अनिवार्य असून ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उत्पन्नाशी निगडीत हवे. या शुल्कातून कर्मचाऱ्यांच्या वेतनभत्यापोटीचा खर्च भागवला जातो. कर्मचाऱ्यांना वेतन व भत्याच्या खर्चासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. कर्मचाऱ्यांचे वेतनभत्ते, निवृत्ती वेतनाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुढे आहे. ग्रामिण पाणी पुरवठ्याची कामे जिल्हा परिषदकडे कार्यन्वयनासाठी हस्तांतरीत झाली. नगरोत्थान इत्यादी नागरी योेजनांची कामे नागरी संस्थांकडे हस्तांतरीत झाली आहेत. जीवन प्राधिकरणकडील योजना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाना हस्तांतरीत झाल्या. परंतु कर्मचारीवर्ग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेच राहिला. या कर्मचाऱ्यांच्या वेतन निवृत्त वेतन भत्यासाठीचा खर्च महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला भरावा लागत आहे. या प्रश्नी पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने मुख्यमंत्र्यांकडे आढावा बैठक आयोजित केली होती. जलसंपदा खात्यातील पाच महामंडळे या मंडळाला विशेषबाब म्हणून कर्मचाऱ्यांना विशेष वेतन व भत्याचे दायित्व शासनानेच स्वीकारावे अशी मागणी केली आहे. प्राधिकरणाकडे ११ हजार कर्मचाऱ्यांपैकी ६३५१ कर्मचारी असून त्यापैकी १०५५ कर्मचारी सध्यस्थितीत वेतनमानानुसार वेतनभत्ते व निवृत्ती वेतनाचे वाढीत्व व दरमहा २९.५४ असून मर्जीप्रमाणे दरमहा उत्पन्न ९ कोटी विचारात घेता २०.५४ कोटी रूपये दरमहा व वार्षिक २४६.४८ कोटी इतकी तूट आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उत्पन्न मिळण्याचे सर्व मार्ग शासनाने बंद केल्याने शासनास तूट भरून काढणे अत्यावश्यक आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव ठेवला असून याप्रश्नी शासनाने न्याय द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)दीपक केसरकर : योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनविविध प्रश्नांबाबत जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्यांबाबत माहिती दिली. यावेळी केसरकर यांंनी लवकरच पाणीपुरवठा मंत्री, वित्तमंत्री यांंच्यासमवेत बैठक बोलावून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी उपस्थित होते.