शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

एलईडी बल्बचे होणार साम्राज्य

By admin | Updated: November 5, 2015 00:19 IST

विजेची बचत : राज्यात १ लाख ६२ हजार ग्राहकांना लाभ

राजापूर : वीज बचतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्बचे वाटप करण्यात आल्याने भविष्यात राज्यात एलईडी बल्बचेच साम्राज्य निर्माण होणार आहे.एकीकडे विजेचा अमर्यादीत वापर तर दुसरीकडे वीज निर्मितीची मर्यादीत साधने यामुळे महाराष्ट्र राज्यासहित देशाला वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सर्वत्र सीएफएल किंंवा आयसीएल बल्बच्या वापरामुळे ज्या प्रमाणात वीज खर्च होत होती त्यापेक्षा खूपच कमी वीज ही एईडीमुळे खर्च होत आहे. जवळपास ८० टक्के वीजबचत या बल्बच्या वापरामुळे होते. राज्यात वीज पुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचे राज्यात १ कोटी ६२ लाख ६१ हजार ४२० ग्राहक आहेत. त्यांना १६ हजार ६५७ दशलक्ष युनिट वीज लागते व एकूण वापराच्या १९.४५ टक्के वीज वापर या ग्राहकांकडून होतो. आजवर बहुतांशी ग्राहकांनी सीएफएल किंंवा आसीएल बल्बचाच वापर केला आहे व अजून देखील तो चालूच आहे. त्यामुळे विजेचा जास्त वापर होतो. एलईडी बल्बमुळे एकूण ८० टक्के विजेची बचत होते. त्यामुळे प्रतिनग ४०० रुपयांना विक्री होत असलेले एलईडी बल्ब ग्राहकांना सवलतीच्या दरात १०० रुपये प्रती नग उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना हे बल्ब प्राप्त होतील. या बल्बचे २५ हजार तास जीवनमान असून, हा बल्ब ७ वॅटचा असणार आहे. त्याला ३ वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी असेल. प्रत्येक वीज ग्राहकाला चालू वीज देयके दाखवून हे बल्ब खरेदी करता येतील तसेच प्रती बल्ब १० रुपये भरुन उर्वरीत रक्कम वीज देयकात १० हप्त्यात भरण्याची सुविधा देखील महावितरणने दिली आहे. त्यामुळे या बल्बकडे ग्राहकांचा प्रचंड ओढा आहे. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात या बल्बची खरेदी ग्राहकांनी केली आहे. भविष्यात संपूर्ण राज्य एलईडी बल्बने झगमगून जाणार आहे. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. (प्रतिनिधी)आगामी संकट : आत्तापासूनच उपाययोजनाआगामी काळात येणारे विजेचे संकट ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे या संकटाला रोखण्यासाठी आत्तापासूनच शासनाने प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे शासनाकडून एलईडी बल्बचे वितरण सुरु करण्यात आले आहे.माफक किंमतएलईडी बल्बची किंमत माफक आहे. तसेच त्यापासून वीजबचतही होणार आहे. पर्यायाने वीजबिलातही कित्येक पटीने अधिक बचत होणार आहे.