शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

एलईडी बल्बचे होणार साम्राज्य

By admin | Updated: November 5, 2015 00:19 IST

विजेची बचत : राज्यात १ लाख ६२ हजार ग्राहकांना लाभ

राजापूर : वीज बचतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्बचे वाटप करण्यात आल्याने भविष्यात राज्यात एलईडी बल्बचेच साम्राज्य निर्माण होणार आहे.एकीकडे विजेचा अमर्यादीत वापर तर दुसरीकडे वीज निर्मितीची मर्यादीत साधने यामुळे महाराष्ट्र राज्यासहित देशाला वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सर्वत्र सीएफएल किंंवा आयसीएल बल्बच्या वापरामुळे ज्या प्रमाणात वीज खर्च होत होती त्यापेक्षा खूपच कमी वीज ही एईडीमुळे खर्च होत आहे. जवळपास ८० टक्के वीजबचत या बल्बच्या वापरामुळे होते. राज्यात वीज पुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचे राज्यात १ कोटी ६२ लाख ६१ हजार ४२० ग्राहक आहेत. त्यांना १६ हजार ६५७ दशलक्ष युनिट वीज लागते व एकूण वापराच्या १९.४५ टक्के वीज वापर या ग्राहकांकडून होतो. आजवर बहुतांशी ग्राहकांनी सीएफएल किंंवा आसीएल बल्बचाच वापर केला आहे व अजून देखील तो चालूच आहे. त्यामुळे विजेचा जास्त वापर होतो. एलईडी बल्बमुळे एकूण ८० टक्के विजेची बचत होते. त्यामुळे प्रतिनग ४०० रुपयांना विक्री होत असलेले एलईडी बल्ब ग्राहकांना सवलतीच्या दरात १०० रुपये प्रती नग उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना हे बल्ब प्राप्त होतील. या बल्बचे २५ हजार तास जीवनमान असून, हा बल्ब ७ वॅटचा असणार आहे. त्याला ३ वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी असेल. प्रत्येक वीज ग्राहकाला चालू वीज देयके दाखवून हे बल्ब खरेदी करता येतील तसेच प्रती बल्ब १० रुपये भरुन उर्वरीत रक्कम वीज देयकात १० हप्त्यात भरण्याची सुविधा देखील महावितरणने दिली आहे. त्यामुळे या बल्बकडे ग्राहकांचा प्रचंड ओढा आहे. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात या बल्बची खरेदी ग्राहकांनी केली आहे. भविष्यात संपूर्ण राज्य एलईडी बल्बने झगमगून जाणार आहे. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. (प्रतिनिधी)आगामी संकट : आत्तापासूनच उपाययोजनाआगामी काळात येणारे विजेचे संकट ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे या संकटाला रोखण्यासाठी आत्तापासूनच शासनाने प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे शासनाकडून एलईडी बल्बचे वितरण सुरु करण्यात आले आहे.माफक किंमतएलईडी बल्बची किंमत माफक आहे. तसेच त्यापासून वीजबचतही होणार आहे. पर्यायाने वीजबिलातही कित्येक पटीने अधिक बचत होणार आहे.