शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

एलईडी बल्बचे होणार साम्राज्य

By admin | Updated: November 5, 2015 00:19 IST

विजेची बचत : राज्यात १ लाख ६२ हजार ग्राहकांना लाभ

राजापूर : वीज बचतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्बचे वाटप करण्यात आल्याने भविष्यात राज्यात एलईडी बल्बचेच साम्राज्य निर्माण होणार आहे.एकीकडे विजेचा अमर्यादीत वापर तर दुसरीकडे वीज निर्मितीची मर्यादीत साधने यामुळे महाराष्ट्र राज्यासहित देशाला वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सर्वत्र सीएफएल किंंवा आयसीएल बल्बच्या वापरामुळे ज्या प्रमाणात वीज खर्च होत होती त्यापेक्षा खूपच कमी वीज ही एईडीमुळे खर्च होत आहे. जवळपास ८० टक्के वीजबचत या बल्बच्या वापरामुळे होते. राज्यात वीज पुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचे राज्यात १ कोटी ६२ लाख ६१ हजार ४२० ग्राहक आहेत. त्यांना १६ हजार ६५७ दशलक्ष युनिट वीज लागते व एकूण वापराच्या १९.४५ टक्के वीज वापर या ग्राहकांकडून होतो. आजवर बहुतांशी ग्राहकांनी सीएफएल किंंवा आसीएल बल्बचाच वापर केला आहे व अजून देखील तो चालूच आहे. त्यामुळे विजेचा जास्त वापर होतो. एलईडी बल्बमुळे एकूण ८० टक्के विजेची बचत होते. त्यामुळे प्रतिनग ४०० रुपयांना विक्री होत असलेले एलईडी बल्ब ग्राहकांना सवलतीच्या दरात १०० रुपये प्रती नग उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना हे बल्ब प्राप्त होतील. या बल्बचे २५ हजार तास जीवनमान असून, हा बल्ब ७ वॅटचा असणार आहे. त्याला ३ वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी असेल. प्रत्येक वीज ग्राहकाला चालू वीज देयके दाखवून हे बल्ब खरेदी करता येतील तसेच प्रती बल्ब १० रुपये भरुन उर्वरीत रक्कम वीज देयकात १० हप्त्यात भरण्याची सुविधा देखील महावितरणने दिली आहे. त्यामुळे या बल्बकडे ग्राहकांचा प्रचंड ओढा आहे. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात या बल्बची खरेदी ग्राहकांनी केली आहे. भविष्यात संपूर्ण राज्य एलईडी बल्बने झगमगून जाणार आहे. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. (प्रतिनिधी)आगामी संकट : आत्तापासूनच उपाययोजनाआगामी काळात येणारे विजेचे संकट ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे या संकटाला रोखण्यासाठी आत्तापासूनच शासनाने प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे शासनाकडून एलईडी बल्बचे वितरण सुरु करण्यात आले आहे.माफक किंमतएलईडी बल्बची किंमत माफक आहे. तसेच त्यापासून वीजबचतही होणार आहे. पर्यायाने वीजबिलातही कित्येक पटीने अधिक बचत होणार आहे.