शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

पाझरणाऱ्या बंधाऱ्यांमधून पाणी जिरणार

By admin | Updated: October 28, 2014 00:18 IST

दर्जाहीन काम : बंधाऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची केल्यामुळे पाणी साठवण थांबणार

मंदार गोयथळे - असगोली -शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या साठवणीसाठी विविध खात्यांमार्फ त बंधारे व धरणे बांधली जातात. मात्र, यातील बहुतांश बंधारे तसेच धरणे अर्धवट व दर्जाहीन कामामुळे पाणी साठवण करण्यात कमी पडत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील बंधारे व धरणांची स्थिती पाहून समोर येत आहे.कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, पावसामुळे पृथ्वीवर जमा होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे शासनाला योग्य प्रकारे जमत नाही. त्यामुळे दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी अखेरीस ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण होते. यावर उपाययोजना म्हणून दरवर्षी कृ षी विभाग व ग्रामपंचायतमार्फत बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली जाते. यामध्ये कच्चे तसेच पक्के बंधारे बांधले जातात. काहीवेळा ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तर काही वेळा श्रमदानातूनही हे बंधारे बांधण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. सिमेंट पिशव्यांच्या व दगड मातीच्या सहाय्याने हे बंधारे घातले जातात. मात्र, प्रत्यक्षात या सर्व खटाटोपामुळे किती प्रमाणात पाणी अडवण्यात शासन प्रत्यक्षात यशस्वी ठरते हादेखील एक संशोधनाचा विषय बनला आहे. दरवर्षी पावसाळा संपताच विशेषत: ग्रामीण भागातून सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी सर्रास बंधारे बांधण्याची मोहीम राबवली जाते. मात्र, गतवर्षीपासून हे प्रमाणही काही ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यानंतर विविध मार्गाने वापरात येणारे पाणी अडवण्यासाठी कधी कधी तर येथील नागरिकांनाच पुढे सरसावावे लागत आहे. श्रमदानातून विविध ठिकाणी ग्रामीण भागातील मोक्याच्या पाणवठ्याच्या ठिकाणी हे बंधारे आजही त्या त्या ठिकाणी असणारे नागरिक बांधत आहेत.ग्रामीण भागात हे तात्पुरते बंधारे दरवर्षी पावसाळा संपताच बांधले जात असले तरीदेखील काही ठिकाणी काळ्या दगडांचा व सिमेंटचा वापर करुन पक्के बंधारे व धरणे बांधली गेली आहेत. मात्र, एकदा ही धरणे बांधून झाल्यानंतर त्याकडे शासनाने जराही ढुंकून न पाहिल्याने हे बंधारे व धरणे कोसळून पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तळवली येथील अशाच पद्धतीने काही वर्षांपूर्वी शासनाकडून बांधण्यात आलेला सिमेंटचा बंधारा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या बंधाऱ्यास गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, ढासळणाऱ्या दगडांमुळे हा बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पाणी अडवण्यास हा बंधारा कमकुवत ठरला आहे. हीच अवस्था अन्य बंधारे व धरणांच्या बाबतीत आहे. एकूण विविध ठिकाणच्या धरणांची स्थिती पाहता पाणी साठवण करण्यात आजही उदासिन असल्याचे समोर येत आहे.