शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या ताब्यातील भूभाग ओसाडच?

By admin | Updated: May 29, 2015 23:47 IST

ढीम्म प्रशासन : वृक्षलागवड जमिनीत करण्याची घोषणा हवेत?

फुणगूस : कोकण रेल्वे सुरु होऊन एक तपाचा काळ लोटून गेला. मात्र कोकण रेल्वेने ताब्यात घेतलेली रेल्वेमार्गालगतचा बराच भूभाग ओसाड असून, वृक्षलागवडीच्या प्रतीक्षेत आहे. रेल्वे दाखल झाल्यानंतर उद्योग वाढतील, पर्यटक वाढतील आणि कोकणचा चेहरामोहरा बदलेल, अशी अपेक्षा होती. तो चेहराही बदलला नाही आणि कोकण रेल्वे मार्गाशेजारच्या ओसाड जमिनीचा चेहराही बदलला नाही.कोकणातील बहुतांश प्रदेश डोंगराळ असल्याकारणाने कोकण रेल्वेचा मार्ग बोगद्याबोगद्याने बनलेला आहे. बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेली प्रचंड माती, दगड, रॉ मटेरिअल टाकण्यासाठी परिसरातील आजूबाजूची जमीन मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून कोकण रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतली होती. टाकण्यात आलेल्या दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात वृक्षवेली गाडली गेल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली. कोकण रेल्वेच्या ताब्यात असलेल्या जमिनी आजही वृक्षाविना असल्याचे दिसून येत आहे. झाडी नसल्याकारणाने कोकणात प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात दगडमाती पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीनाल्यामध्ये जात आहे.गत सोळा ते सतरा वर्षांमध्ये कोकण रेल्वेच्या भरावाची झालेली धूप नदीपात्रात जाऊन पडल्यामुळे नदीचे पात्र बुजले असून, काठावरील लोकांना दरवर्षी पुराचा धोका भेडसावत आहे. कोकण रेल्वेच्या ताब्यातील हे दगड मातीचे ढिगारे वृक्षलागवडीशिवाय राहिल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचे दुष्परिणाम परिसरातील जनतेला भविष्यात मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांची हानी झाल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती नष्ट झाली आहे. परिसरातील जनतेला पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. ओसाड असलेल्या कोकण रेल्वेच्या ताब्यातील जमिनीवर कोकण रेल्वे प्रशासनाने चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अथवा प्रशासनाकडून लागवड करण्यायोग्य जमिनी भूमिहीन व्यक्तींना देऊन त्या विकसीत करण्यात याव्यात, असेही मत परिसरातील पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वेने आजपर्यंत विविध उपक्रमातून त्या त्या भागातील प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र नोकऱ्या सोडाच पण कोकण रेल्वेने हाती घेतलेले अनेक उपक्रम अद्याप तसेच अपूर्म अवस्थेत राहिले आहेत. हे सर्व प्रश्न कधी सोडवणार असा प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)कोकण रेल्वेला अनेक समस्यांनी घेरले असताना प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर.रेल्वेने जमिनी घेतल्या. मात्र, तेथे वृक्ष लावलेच नसल्याचा पर्यावरणतज्ज्ञांचा आक्षेप. कोकण रेल्वेने टाकलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्यांचे काय असा संतप्त सवाल. वृक्ष लावण्यासाठी होतोय आग्रह.