शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

कोकण रेल्वेच्या ताब्यातील भूभाग ओसाडच?

By admin | Updated: May 29, 2015 23:47 IST

ढीम्म प्रशासन : वृक्षलागवड जमिनीत करण्याची घोषणा हवेत?

फुणगूस : कोकण रेल्वे सुरु होऊन एक तपाचा काळ लोटून गेला. मात्र कोकण रेल्वेने ताब्यात घेतलेली रेल्वेमार्गालगतचा बराच भूभाग ओसाड असून, वृक्षलागवडीच्या प्रतीक्षेत आहे. रेल्वे दाखल झाल्यानंतर उद्योग वाढतील, पर्यटक वाढतील आणि कोकणचा चेहरामोहरा बदलेल, अशी अपेक्षा होती. तो चेहराही बदलला नाही आणि कोकण रेल्वे मार्गाशेजारच्या ओसाड जमिनीचा चेहराही बदलला नाही.कोकणातील बहुतांश प्रदेश डोंगराळ असल्याकारणाने कोकण रेल्वेचा मार्ग बोगद्याबोगद्याने बनलेला आहे. बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेली प्रचंड माती, दगड, रॉ मटेरिअल टाकण्यासाठी परिसरातील आजूबाजूची जमीन मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून कोकण रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतली होती. टाकण्यात आलेल्या दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात वृक्षवेली गाडली गेल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली. कोकण रेल्वेच्या ताब्यात असलेल्या जमिनी आजही वृक्षाविना असल्याचे दिसून येत आहे. झाडी नसल्याकारणाने कोकणात प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात दगडमाती पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीनाल्यामध्ये जात आहे.गत सोळा ते सतरा वर्षांमध्ये कोकण रेल्वेच्या भरावाची झालेली धूप नदीपात्रात जाऊन पडल्यामुळे नदीचे पात्र बुजले असून, काठावरील लोकांना दरवर्षी पुराचा धोका भेडसावत आहे. कोकण रेल्वेच्या ताब्यातील हे दगड मातीचे ढिगारे वृक्षलागवडीशिवाय राहिल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचे दुष्परिणाम परिसरातील जनतेला भविष्यात मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांची हानी झाल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती नष्ट झाली आहे. परिसरातील जनतेला पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. ओसाड असलेल्या कोकण रेल्वेच्या ताब्यातील जमिनीवर कोकण रेल्वे प्रशासनाने चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अथवा प्रशासनाकडून लागवड करण्यायोग्य जमिनी भूमिहीन व्यक्तींना देऊन त्या विकसीत करण्यात याव्यात, असेही मत परिसरातील पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वेने आजपर्यंत विविध उपक्रमातून त्या त्या भागातील प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र नोकऱ्या सोडाच पण कोकण रेल्वेने हाती घेतलेले अनेक उपक्रम अद्याप तसेच अपूर्म अवस्थेत राहिले आहेत. हे सर्व प्रश्न कधी सोडवणार असा प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)कोकण रेल्वेला अनेक समस्यांनी घेरले असताना प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर.रेल्वेने जमिनी घेतल्या. मात्र, तेथे वृक्ष लावलेच नसल्याचा पर्यावरणतज्ज्ञांचा आक्षेप. कोकण रेल्वेने टाकलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्यांचे काय असा संतप्त सवाल. वृक्ष लावण्यासाठी होतोय आग्रह.