शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

एकत्र येऊन काम केल्यास फायदा दर दिवशी लाखोंचा तोटा

By admin | Updated: January 28, 2015 00:53 IST

चिपळूण आगार : या आगारात दिवसाला ५ लाख ७८ हजार रुपयांचा, तर महिन्याला १ कोटी ७९ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.

 चिपळूण : कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चिपळूण एस. टी. आगाराला सध्या घरघर लागली आहे. या आगारात दिवसाला ५ लाख ७८ हजार रुपयांचा, तर महिन्याला १ कोटी ७९ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. नादुरुस्त गाड्या, गाड्यांच्या वेळेची अनिश्चितता, कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा, सुरक्षेची हमी नाही, सकारात्मकतेचा अभाव यामुळे हा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. एस. टी. महामंडळ तोट्यात आहे, असे सातत्याने सांगितले जाते. तोटा होत असल्याने चिपळूण आगार बंद करण्याची भूमिकाही प्रशासन पातळीवर सुरु आहे. चिपळूण आगार तोट्यात सुरू आहे. याला कारणेही अनेक आहेत. आगारात असणाऱ्या गाड्या स्वच्छ व सुव्यवस्थेत नाहीत. गाडी फलाटावर लागल्यानंतर ती वेळेवर सुटेल किंवा नियोजितस्थळी सुखरुप पोहोचेल याची हमी देता येत नाही. नादुरुस्त व गळक्या गाड्यांची वेळच्यावेळी देखभाल दुरुस्ती होत नाही. गाडीत चढल्यानंतर प्रवाशांना प्रसन्न वाटत नाही. अनेक वेळा गाडीत धूळ असते. अस्वच्छता असते व उग्रवास असतो. या कळकट वासामुळे अनेक प्रवाशांना उलट्याही होतात. गरगरु लागते. एस. टी.ने स्वच्छ व चांगल्या गाड्या पुरविल्या, त्या वेळेत सोडल्या व प्रवाशांच्या मर्जीनुसार चढउतार केले तरच एस. टी.ला भविष्यात चांगले दिवस येतील. एस. टी.चे बहुतांश कर्मचारी प्रवाशांशी सौजन्याने वागत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत असतात. तक्रार करुनही अनेकवेळा कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जाते. एखाद्या अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उगारला, तर संघटना किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या चूक करणाऱ्या कर्मचाऱ्याची पाठराखण केली जाते आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा बळी दिला जातो. चुकीचे काम करणाऱ्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रकार थांबला, तर कर्मचारीही आपले काम प्रामाणिकपणे करतील. हात दाखवा, एस. टी. थांबवा अशी योजना काढण्यात आली होती. चिपळूण आगारातून दररोज ३६ हजार किलोमीटर गाड्या चालविल्या जातात. या गाड्या भरुन गेल्या व भरुन आल्या तरच उत्पन्न वाढणार आहे. अनेक वेळा दोन - चार प्रवाशांसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास होतो. त्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नात घट होते. गाडी फलाटावरुन बाहेर पडल्यानंतर प्रवाशांच्या विनंतीनुसार थांबविली जात नाही. हात दाखवूनही गाडी पुढे नेली जाते. रिकामी असूनही गाडी न थांबवताच पुढे नेल्याने एस. टी.चा तोटा वाढतो. चालक - वाहकाने गाडी भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच एस. टी. जगणार आहे. गाड्या निर्धारित वेळेत सुटल्या तरच प्रवासी एस. टी.त बसतील. पण, तसे केले जात नाही. अशा लहान-मोठ्या अनेक तक्रारींमुळे एस. टी.ची स्थिती नाजूक बनत आहे. एस. टी. कामगार संघटनांचा प्रशासनावर दबाव राहतो. त्यामुळे प्रशासनाला काम करणे अवघड होते. प्रवाशांची विश्वासार्हता जपली गेली, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गाडीत स्वच्छता व सुरक्षितता असेल तरच प्रवासी एस. टी.ने प्रवास करतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. अन्यथा एस. टी.चा हा तोटा अधिकच वाढण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) एस. टी.च्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी गाड्यांच्या नियोजनाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काही कर्मचारी नाहक दबाव टाकतात. त्यामुळे संघटनांचा व लोकप्रतिनिधींचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव वाढतो व चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा भोगावी लागते. असे प्रकार घडत असल्याने प्रशासनात कठोर धोरण स्वीकारण्यास कोणी धजावत नाही. आमच्याकडे नवनवीन गाड्या आहेत. त्याद्वारे अनेक फेऱ्या होतात. मात्र, गाड्या धुण्यासाठी माणसे कमी असल्याने सर्वच गाड्या स्वच्छ ठेवता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. चालक - वाहकांबद्दल काही तक्रारी येतात. त्याबाबतही प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जाते. माणूसकी ठेवून आम्ही कामकाज करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी एस. टी. जगली, तरच सर्वांना किंमत राहणार आहे. याची जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवायला हवी. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तरच एस. टी.ला चांगले दिवस येतील. शेवटी प्रवासी हा आपला देव आहे. त्याला सोयी सुविधा मिळायला हव्यात. - राजेश पाथरे, स्थानकप्रमुख चिपळूण