शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

कुडाळ एमआयडीसीला घरघर सिंधुदुर्ग जिल्ह्यात

By admin | Updated: December 25, 2014 00:01 IST

‘जिल्हा उद्योग मित्र’ मध्ये उद्योगांसंदर्भात विविध समस्यांवर चर्चा होते. मात्र,

तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांच्या प्रयत्नातून सन १९७६-७७ साली कुडाळ येथे एमआयडीसी उभारण्यात आली. सुरुवातीला या ठिकाणी वायमन गार्डन, मेल्ट्रॉन यासारख्या कंपन्यांनी मोठे कारखाने उभारले होते. त्याकाळी जिल्हाभरातून कुडाळ एमआयडीसीमध्ये लोक कामाला येत. परंतु काही वर्षातच येथील उद्योग, कारखाने बंद पडू लागले. याची प्रमुख कारणे म्हणजे मुंबई-गोवा शहरांची झपाट्याने होणारी वाढ, मालाची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची समस्या, कामगारांची कमी उपलब्धता आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची एमआयडीसी विषयी उदासिनता. मोठे उद्योग बंद पडू लागल्याने त्यावर आधारीत लघु उद्योगही संकटात आले. मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुकीची समस्या, पर्यटन जिल्हा असल्याने पर्यावरणास घातक उद्योगांना असलेला विरोध, एमआयडीसीकडून उद्योजकांना मिळणारे असहकार्य यामुळे येथील उद्योगांना पुन्हा उर्जितावस्था मिळण्याची शक्यता धूसरच आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून येथील नैसर्गिक साधन संपत्तीवरील उद्योग-व्यवसायांना चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये काजू, आंबा, फणस, कोकम, जांभूळ, मत्स्य या व अशा घटकांवर आधारीत उद्योगांना प्रशासनाने प्रोत्साहन आणि मदत देणे आवश्यक आहे. जिल्ह्याला समृद्ध असा समुद्रकिनारा लाभल्याने येथे मत्स्य व्यवसायही आता जोर धरू लागला असून येथील मत्स्योत्पादन देशभरात आणि परदेशातही निर्यात होत आहे. मात्र, याचे प्रमाण कमीच असून मत्स्य व्यवसायवाढीसाठी चालना मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरेल.‘जिल्हा उद्योग मित्र’ मध्ये उद्योगांसंदर्भात विविध समस्यांवर चर्चा होते. मात्र, समस्या निराकरणासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. केवळ समन्वयाचे काम केले जाते. त्यामुळे या समस्या सोडविण्याकरिता कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उद्योजकांमधून उपस्थित होत आहे. रजनीकांत कदम