शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांचे गोडवे भाजपात नाराजी

By admin | Updated: May 27, 2014 01:18 IST

श्रेयवादातून शिवसेना-भाजपात कुरबुरी : विनायक राऊत भारावले

  कणकवली : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष अद्याप ओसरलेला नाही. तोपर्यंत श्रेयवादातून शिवसेना-भाजपात कुरबुरी सुरू झाली आहे. खासदार राऊत यांनी आमदार केसरकरांना पालकमंत्री जाहीर करून टाकल्याने भाजपाच्या गोटात नाराजी पसरली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला भाजपाचे पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने ही वादाची किनार गडदपणे दिसून आली. या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातून शिवसेना आणि भाजपाने एकदिलाने काम केले. मोदी लाटेसोबत या एकत्रित कामाचेही चीज झाले. त्याचबरोबर सावंतवाडीतून आमदार दीपक केसरकर यांनी ऐनवेळी दिलेला मदतीचा हात मोलाचा ठरला. खासदार राऊत यांनी विजयी होऊन सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर भाजपाने केलेल्या मदतीची आठवण करण्यापेक्षा आमदार केसरकर यांच्या मदतीने भारावून जात चक्क पुढील पालकमंत्री केसरकर होणार असल्याचे जाहीर करून टाकले. मात्र, केंद्रात स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांच्या कार्यकर्त्यांना हे वक्तव्य तितकेसे रूचलेले नाही. आमदार जठार यांच्याकडे भावी पालकमंत्री म्हणून पाहत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी मदतीचा हात दिला असला तरी आम्हीही खूप घाम गाळलाय असे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सावंतवाडी मतदारसंघावर भाजपाचा दावा सांगितला. कोकणातील सहा मतदारसंघापैकी चार शिवसेनेकडे आणि भाजपाकडील दोन विधानसभा मतदारसंघ हे गणित आता बदलून तीन-तीन असे करावे, अशी काळसेकर यांची मागणी आहे. बदलेल्या स्थितीनुसार सावंतवाडी मतदारसंघ भाजपाकडे हवा असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने राज्यात अमाप यश मिळवल्याने सिंधुदुर्गातील शिवसैनिकही जोरावर आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीने नेमकी ताकद जास्त कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रात भाजपाच्या नरेंद्र मोदींना ताकद दिली पाहिजे तर स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून जाणे आवश्यक होते. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी जीवाचे रान केले. मात्र, आता गरज सरो वैद्य मरो असा प्रकार काही ठिकाणी दिसून येत आहे. भाजपाची नाराजी कालच्या उदध्व ठाकरेंच्या दौर्‍यात स्पष्टपणे दिसून आली. स्थानिक आमदार प्रमोद जठार जिल्ह्यात असतानाही ठाकरेंच्या स्वागताला दिसलेले नाहीत. जिल्ह्यांतर्गत सेना-भाजपातील ही नाराजी सोडविण्यासाठी अद्याप कोणी नेता पुढे आलेला नाही. ही नाराजी आताच न मिटवल्यास मोदी लाटेचा प्रभाव विरून आगामी विधानसभा निवडणुकीत युतीला फटका बसण्याचीच जास्त शक्यता आहे. (प्रतिनिधी)