शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कातकरी समाज स्वीकारू लागला स्थानिक संस्कृती

By admin | Updated: September 23, 2016 00:39 IST

सामाजिक स्थित्यंतर : गणेशोत्सवात उत्साहाने सहभाग, प्रस्थापितही खूश

गुरुप्रसाद मांजरेकर --मिठबांव --भटकंती करणारा म्हणून परिचित असलेल्या कातकरी समाजातही स्थित्यंतर होत असून सामाजिक बदलासोबत हा समाज स्थानिक संस्कृती अंगीकारू लागला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सामाजिक स्थित्यंतराची अनुभूती येत असून प्रस्थापित समाजही त्यामुळे खुश दिसत आहे. महाराष्ट्र हे राज्य विविधतेने नटलेले राज्य आहे. नैसर्गिक विविधतेबरोबरच भौगोलिक परिस्थितीनुसार समाजामध्येही विविधता आढळून येते. भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असणारा महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे. भौतिक सुुविधांपासून स्थैर्य मिळवून भटकंती करणारे समाजही आता स्थिरावू लागले आहेत. हे समाज जेथे स्थिरावतात तेथील संस्कृतीही स्वीकारत आहेत. हे कातकरी समाजाने दाखवून दिले आहे. कोकणात गणेशोत्सव हा प्रमुख उत्सव समजला जातो. रंकापासून रावांपर्यंत आबालवृद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशोत्सवाला कोकणात वेगळेच स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना त्याद्वारे सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाद्वारे सुरु केलेल्या सामाजिक सुधारणात कातकरी समाजही सहभागी झाला आहे. हे चित्र देवगड तालुक्यातील मुणगे या गावी गणेशोत्सवाच्या कालावधीत दिसले. मुणगे-तळी येथील कातकरी वस्तीवर संतोष निकम यांच्यासह तेथे असलेल्या १२ कुटुंबांनी यावर्षी गणेशचतुर्थीदिवशी प्रथमच श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. येथे २१ दिवस गणेशोत्सव साजरा होत आहे. या २१ दिवसात बाप्पांचे नित्यपूजन होत आहे. त्या निमित्ताने आरती, नैवेद्य, प्रसाद, भजन हे कार्यक्रम होत आहेत. साहजिकच या वस्तीला एकप्रकारे महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत मुणगे गावात मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, होत असल्याचे दिसून येते. या उत्सवाची प्रत्यक्ष अनुभूती हा समाज घेत आहे. मुणगे गावातील भजन मंडळेही या गणेश चरणी सेवा अर्पण करीत आहेत. या उत्सवाचे पावित्र्य पाळून समाजातील नागरिकांनी श्री भगवती हायस्कूल व नजीकच्या कारिवणेवाडी शाळेत आपली मुले पाठवून विद्येच्या या देवतेचे पूजन करण्यात प्रारंभ केला आहे.जागा उपलब्ध झाल्याने स्थैर्यकातकरी समाज हा भटकंती करणारा समाज म्हणून ओळखला जातो. जंगलात मिळणारी कंदमुळे, मांस यावरच हा समाज आजपर्यंत आपली गुजराण करत आला आहे. मुणगे गावात मोठ्या प्रमाणावर कातकरी बांधव वास्तव्यास आहेत. चरितार्थासाठी शेतमजुरी व इतर छोेटीमोठी कामे करण्यासाठी विविध ठिकाणी विखुरला होता. त्यांना मुणगे-तळी येथे शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याने निकम कुटुंबिय याठिकाणी वसती करून आहे. नारळाची झापे व गवताच्या सहाय्याने साकारलेली कातकरी बांधवांची घरे, पाण्यासाठी तळी व शासनाकडून उपलब्ध करुन विंधन विहीर वीजेसाठी सौर ऊर्जा दिव्यांचा उजेड हे या वस्तीचे ऐश्वर्य होय.